श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी

  • Home
  • India
  • Walgaon
  • श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी

श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी, Social service, MSH-6, Walgaon.

श्री गाडगे महाराजांच्या दशसुत्रीनुसार वृध्दाश्रम परीसरामध्ये सेवाकार्य राबविण्याचा छोटासा प्रयत्न, आपली साथ गरजेची आहे. हे स्थळ अमरावती शहरापासून ८ कीमी अंतरावर आहे. आपल्या काही सुचना असल्यास अथवा आमच्या कामात काही त्रुटी/चुक आढळल्यास नक्की कळवा.

आज २३ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेला जागवणारा आहे. संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्या...
23/02/2026

आज २३ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेला जागवणारा आहे. संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा विचार करताना आपण एका अशा संताच स्मरण करतो, ज्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली आणि धर्माला मानवतेचा अर्थ दिला. ते केवळ कीर्तनकार नव्हते, तर ते चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आयुष्यभर समाजातील अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याविरुद्ध झुंज दिली.

२३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेले हे डेबूजी पुढे संपूर्ण महाराष्ट्राचे ‘गाडगे बाबा’ झाले. अंगात चिंध्यांचा सदरा, हातात झाडू, कानात फुटकी कवडी आणि डोक्यावर फुटलेले खापर हेच त्यांचे दागिने होते. ते ज्या गावात जात, त्या गावात प्रथम स्वच्छता करीत. ‘देवळात जाण्यापूर्वी गाव स्वच्छ करा’ हा त्यांचा ठाम संदेश होता. त्यांच्या मते स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यांनी कीर्तनातून लोकांना विचार करायला शिकवले. देवासाठी नवस बोलण्याऐवजी भुकेल्याला अन्न द्या, मंदिर उभारण्यापेक्षा शाळा उभारा, जातीभेद विसरून माणसाला माणूस म्हणून वागवा, हा त्यांचा आग्रह होता.

त्या काळात संपर्काची आधुनिक साधने नव्हती. ना दूरध्वनीची सोय, ना प्रसारमाध्यमांचा व्याप. तरीही त्यांच्या कार्याची कीर्ती दूरदूर पसरली. त्यांच्या विचारांमुळे आणि कृतीमुळे अनेक समाजसुधारक त्यांच्याशी जिव्हाळ्याने जोडले गेले. शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्ण संबंध होते. शिक्षण हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, या विचारावर दोघांचाही ठाम विश्वास होता. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला गाडगे बाबांनी नैतिक पाठबळ दिले. गरीब आणि वंचित मुलांनी शिक्षण घ्यावे, हा दोघांचाही ध्यास होता.

त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशीही त्यांचे विचारांचे नाते होते. ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती आणि कीर्तनातून लोकजागृती हे दोघांच्या कार्याचे समान धागे होते. दोघेही संत परंपरेतून आले, पण त्यांची भक्ती ही समाजहितासाठी झटणारी होती. गावागावांत फिरून लोकांना जागे करणे, समाजातील दोषांवर थेट भाष्य करणे आणि कृतीतून आदर्श घालून देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.

आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक व्यक्तिमत्त्व असलेल्या मेहेर बाबा यांच्याशीही गाडगे बाबांचे स्नेहसंबंध होते. जरी दोघांची कार्यपद्धती वेगळी असली, तरी माणसाच्या अंत:करणातील शुद्धतेवर दोघांचाही भर होता. मानवतेचा संदेश हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता.

सेवेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर टेरेसा यांच्याविषयीही गाडगे बाबांना आदर होता. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन दुःखी आणि निराधारांची सेवा करणे हा समान धागा या सर्व समाजसुधारकांना जोडणारा होता.

त्या काळात संवादाची साधने नसतानाही विचारांची देवाणघेवाण प्रत्यक्ष भेटींमधून, परस्पर आदरातून आणि कार्याच्या प्रेरणेतून होत होती. हीच त्या काळातील खरी सामाजिक एकात्मता होती.

गाडगे बाबांचे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातेही अत्यंत आदरपूर्ण होते. समतेचा आणि स्वाभिमानाचा लढा या दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी लढला. अस्पृश्यता, अज्ञान आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य त्यांनी समाजाला दिले. त्यामुळे गाडगे बाबा हे केवळ वारकरी संत नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे वाहक होते.

६ डिसेंबरला बाबासाहेबांच महापरीनिर्वाण झालं आणि गाडगे बाबांनी अन्न पाणी सोडल. आपल्या सहविचारवंताच्या जाण्याने ते अंतर्बाह्य व्यथित झाले. १४ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबरला वलगांव येथील पेढी नदीच्या तिरावर चालत्या गाडीमध्ये बाबांनी देह सोडला आणि एका युगाचा अंत झाला. त्या प्रसंगी ग.दी. माडगुळकर यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत भावना व्यक्त केल्या त्या पुढीलप्रमाणे-
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट राउळीची घाट निनादली
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनी पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठासी
संतमाळेतील मणी शेवटला आज ओघळला, एकाएकी

गाडगे बाबा म्हणजे संत परंपरेतील असा तेजस्वी दीप, ज्याने स्वतः जळून समाजाला प्रकाश दिला. त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करूया. स्वच्छता, समता, शिक्षण, सेवा आणि मानवता हेच त्यांचे खरे स्मारक आहे. त्यांच्या आयुष्याने शिकवले की खरा धर्म म्हणजे माणसासाठी जगणे आणि माणसाला उभे करणे.

-अवकाश कैलासराव बोरसे

23/12/2025
20/06/2025

🙏🏻
14/04/2025

🙏🏻

अमरावती: श्री गाडगे महाराज वृद्धाश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीवलगांव येथील सोहळ्यात बाबासाहेबांचे वि...
14/04/2025

अमरावती: श्री गाडगे महाराज वृद्धाश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वलगांव येथील सोहळ्यात बाबासाहेबांचे विचार आणि गाडगे बाबांशी ऋणानुबंधांना उजाळा

अमरावती, दि. १३ एप्रिल २०२५: वलगांव (ता. अमरावती) येथील श्री गाडगे महाराज वृद्धाश्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यात बाबासाहेबांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे विचार तसेच राष्ट्रसंत गाडगे बाबांशी त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध यांना उजाळा देण्यात आला.

वृद्धाश्रमाच्या सभागृहात सकाळी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. प्रदीप रंगारी यांनी सूत्रसंचालन करताना बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदान आणि सामाजिक क्रांतीतील योगदानाचा गौरव केला. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करत त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प घेतला.

याप्रसंगी वलगांवचे सरपंच सुधीर उगले यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करताना त्यांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित केली. ते म्हणाले, "बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण, आत्मसन्मान आणि संघर्षाचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले तरच खऱ्या अर्थाने सामाजिक समता साध्य होईल." त्यांनी तरुणांना बाबासाहेबांचे साहित्य वाचण्याचे आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. कैलास बोरसे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्यातील वैचारिक आणि सामाजिक नाते उलगडून सांगितले. ते म्हणाले, "बाबासाहेबांनी संविधानाद्वारे देशाला समानतेची दिशा दिली, तर गाडगे बाबांनी अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध लढा दिला. या दोन थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत." तसेच त्यांनी वृद्धाश्रमात राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा उल्लेख करत बाबासाहेब आणि गाडगे बाबांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला वलगांवचे सरपंच सुधीर उगले, वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. कैलास बोरसे, नितीन शिरभाते, डॉ. प्रफुल्ल चहाकार, अवकाश बोरसे, अश्विन वाकोडे, प्रदीप रंगारी, आकाश गजभिये, मयूर मेश्राम, सुरज हजारे, रणजीत रंगारी, अंकुश रंगारी, अश्विन मेश्राम, सुयोग अढाऊ, संदीप सोनवणे, प्रतिक कापसेकर, प्रविण गजभिये, श्रीकांत डोंगरे, आयुष पळसपगार, रोहन जाटे, अक्षय गडलिंग, अमित वाडेकर, सुहाक काळपांडे, सुमित तायडे, नवनीत रंगारी, अमर साबळे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा केली, तर काहींनी त्यांच्या कार्याला उजाळा देणारी काव्य पाठने सादर केली.

कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी संपुर्ण आयुष्य वेचणारे बाबा आमटे यांना पुण्यतिथीनिमित्य विनम्र अभिवादन...
08/02/2025

कुष्ठरोग्यांच्या सुश्रुषेसाठी संपुर्ण आयुष्य वेचणारे बाबा आमटे यांना पुण्यतिथीनिमित्य विनम्र अभिवादन...

Address

MSH-6
Walgaon
444801

Telephone

+918888433286

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम तथा निर्वाण भूमी:

Share

Category