28/03/2022
आज ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी भेट घेऊन कुशिवली गावात तनिष स्टोन क्रशर कंपनी असून कंपनीच्या स्फोटामुळे कुशिवली गावांतील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या शेकडो ग्रामस्थांच्या घरांना तडे पडले आहेत. तसेच विहिरी व बोरिंगचे पाणी पूर्णपणे नाहीसे झाले आहे. त्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
या विषयावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांनी पत्र दिले. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी लगेचच अंबरनाथ तहसीलदार माने मॅडम यांना संपर्क साधून क्रशर कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर तहसीलदार यांनी सांगितले की, क्रशर कंपनी बंद करण्यासाठी शासनास अहवाल दिला आहे. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी तहसीलदारांना कुशिवली गावाची पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
Jayant Patil - जयंत पाटील Ajit Pawar Nationalist Congress Party - NCP Supriya Sule Jitendra Awhad