06/06/2026
आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते, आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
समाजहितासाठी अखंड कार्य करणारे, आगरी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या जाण्याने आगरी समाजाची मोठी हानी झाली असून निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो व साळवी परिवारास तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली...