माझा सातारा

माझा सातारा साताऱ्यावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकासाठी
(242)

05/03/2026
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मुंबईहून पुण्याकडे (बारामतीकडे) येत असताना लँडिंग करताना अपघात झाला.
28/01/2026

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मुंबईहून पुण्याकडे (बारामतीकडे) येत असताना लँडिंग करताना अपघात झाला.

साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार; कार्याध्यक्षांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन, संमेलनाची प्रतिमा मलीनराज्यातील प्रतिष्...
03/01/2026

साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार; कार्याध्यक्षांच्या तोंडाला काळे फासून आंदोलन, संमेलनाची प्रतिमा मलीन

राज्यातील प्रतिष्ठित साहित्य संमेलनाला आज लज्जास्पद गालबोट लागले. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला थेट काळे फासण्यात आल्याने संपूर्ण संमेलन परिसरात एकच खळबळ उडाली. साहित्य, विचार आणि अभिव्यक्तीचे व्यासपीठ असलेल्या संमेलनात घडलेल्या या हिंसक आणि असंस्कृत कृत्यामुळे साहित्यविश्वात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आंदोलक संदीप जाधव याने नियोजनबद्ध गनिमी कावा करत संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश केला आणि अचानकपणे विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले. हा प्रकार इतक्या झपाट्याने घडला की उपस्थित सुरक्षा यंत्रणांनाही काही क्षण परिस्थितीचा अंदाज घेता आला नाही. कार्यक्रम सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे संमेलनाची शिस्त, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काळे फासण्यासाठी वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास झाला. घटनेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती असून तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. एका साहित्यिक कार्यक्रमात अशा प्रकारे केमिकलचा वापर होणे हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलक संदीप जाधव याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आंदोलनामागील नेमका उद्देश, नियोजन आणि संभाव्य सहकारी यांचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेने संमेलनाच्या सुरक्षेवर तसेच आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

साहित्यिक विचारमंथनाच्या मंचावर अशा प्रकारचे अराजक, हिंसक आंदोलन होणे हे लोकशाही मूल्यांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काळीमा फासणारे असल्याची तीव्र प्रतिक्रिया विविध साहित्यिक, विचारवंत आणि उपस्थित नागरिकांकडून उमटत आहे. साहित्य संमेलनासारख्या सुसंस्कृत व्यासपीठाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

"स्त्री, तिचं शरीर आणि एक वेगळं दृष्टिकोन"स्त्रीच्या योनी आणि स्तनांबद्दल पुरुषांच्या आकर्षणाची मानसिकता ही एक गंभीर गोष...
30/12/2025

"स्त्री, तिचं शरीर आणि एक वेगळं दृष्टिकोन"
स्त्रीच्या योनी आणि स्तनांबद्दल पुरुषांच्या आकर्षणाची मानसिकता ही एक गंभीर गोष्ट आहे. हे आकर्षण कधी प्रेम म्हणून समजलं जातं, तर कधी केवळ शरीराची भूक म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी मला देखील असे विचार आले होते. घरच्यांनी माझ्यासाठी प्रीती नावाची मुलगी पाहिली, आणि आमचं लग्न ठरलं.

शुरुवातीला प्रीतीचं सुंदर, सुडौल शरीर पाहून आकर्षित होणं हे खूप नैसर्गिक होतं. पण मनात एक प्रश्न सतत होताच:
"हे प्रेम तिच्यावर आहे की तिच्या शरीरावर?"

सुरुवातीचं लग्नसंस्कार आणि संगमाचे क्षण आनंददायी होते. पण जेव्हा प्रीती काही वेळा नकार देई, तेव्हा मला खूप त्रास होई, आणि काही दिवस आमचं बोलणंही बंद होई. मात्र जेव्हा आम्ही जवळ येत होतो, तेव्हा सगळं व्यवस्थित होई.

काही महिन्यांनंतर प्रीती गर्भवती झाली. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. पुढे कळलं की तिचं नॉर्मल डिलीव्हरी करणं कठीण होतं. ऑपरेशनचा विचार मनात होता, पण काही डॉक्टरांनी सांगितलं की योग्य काळजी घेतली तर नॉर्मल डिलीव्हरी होऊ शकते.

९ मार्चला तिला रुग्णालयात दाखल केलं. डिलीव्हरीच्या वेळी ती वेदनेने तडफडत होती, तिच्या पल्स कमी होऊ लागल्या, आणि ती बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी मला बोलावलं आणि परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी सांगितलं की मी तिला मोटिवेट करावं.

मी तिला धीर देण्यासाठी तिच्या समोर उभा राहिलो. तिथे माझ्या डोळ्यासमोर माझी पत्नी नग्न अवस्थेत होती. तिच्या योनीतून बाळ बाहेर येत होतं. त्या क्षणी मला जाणवलं की जे शरीराचा मोह मला नेहमी वाटायचा, त्याचा एक वेगळा अर्थ समोर आला होता.

बाळ बाहेर आलं, आणि डॉक्टरांनी त्याला प्रीतीच्या स्तनावर ठेवून त्याला उष्णता दिली. हीच ती जागा होती, जिथे जन्म आणि पोषण दोन्हीचं एकत्र दर्शन होतं.

त्या दिवसानंतर माझ्या पत्नीबद्दलचा दृष्टिकोन बदलला. ती फक्त शरीर नव्हे, ती एक स्त्री आहे, जी एका नवीन जीवाला जन्म देण्यासाठी प्रचंड वेदना सहन करते. त्या क्षणी मी तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणं शिकलो.

याशिवाय माझ्या आईबद्दलचा आदरही अनेक पटींनी वाढला. मला जाणवलं की माझ्या जन्मासाठी तिने किती वेदना सहन केल्या असतील.

मुलांनो, जो आपल्या पत्नीला फक्त संभोगाचं साधन समजतो, त्याने एकदा तरी प्रसुतीच्या वेळी तिला पाहावं. तो क्षण तुम्हाला स्त्रीचं खरं महत्व शिकवेल.

आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका 😊

© Silent Killer (Sandeep Chavan)

® Common Man Think

नोट: लेख कॉपी पेस्ट करताना credit डिलिट करू नये अन्यथा कार्यवाही केली जाईल

#स्त्रीचा_त्याग #आईचा_आदर #खरं_प्रेम #जीवनाचं_खरं_तत्त्व

सलमान काकानु  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
28/12/2025

सलमान काकानु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

खडतर दऱ्याखोऱ्यांत, मुसळधार पावसात, विजांच्या कडकडाटात उभे असलेले ते मावळे —त्यांच्या हातात शस्त्रं होती, पण मनात भीती न...
26/12/2025

खडतर दऱ्याखोऱ्यांत, मुसळधार पावसात, विजांच्या कडकडाटात उभे असलेले ते मावळे —
त्यांच्या हातात शस्त्रं होती, पण मनात भीती नव्हती.
कारण त्यांनी आधीच एक निर्णय घेतला होता… “स्वतःपेक्षा स्वराज्य मोठं.”

त्यांनी ‘मरण’ निवडलं;
कारण गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वाभिमानासाठी मरायला ते तयार होते.
प्रत्येक पाऊल रक्तानं ओथंबलेलं होतं,
पण प्रत्येक श्वासात स्वराज्याचं स्वप्न जिवंत होतं.

या मातीला आज जे स्वातंत्र्य लाभलं,
ते सहज मिळालेलं नाही.
ते मिळालं आहे अशा हजारो अज्ञात मावळ्यांच्या
त्यागातून, वेदनांतून आणि न झुकणाऱ्या निर्धारातून.

त्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही,
कधी आपली कहाणी लिहून ठेवली नाही.
इतिहासानं त्यांची नावं कदाचित विसरली असतील,
पण स्वराज्याच्या प्रत्येक श्वासात त्यांचा त्याग आजही जिवंत आहे.

आज आपण मोकळेपणाने उभं राहू शकतो,
मत मांडू शकतो, स्वप्न पाहू शकतो —
कारण कुणीतरी त्या काळात
डोकं झुकवण्याऐवजी तलवार उचलली होती.

म्हणूनच,
स्वराज्य अनुभवताना केवळ अभिमान नाही,
तर कृतज्ञतेचीही भावना मनात ठेवूया.

अशा प्रत्येक मावळ्याला कृतज्ञ अभिवादन! 🚩



माधवरावांच्या मृत्यूनंतर सती जाऊ नये म्हणून अनेकांनी रमाबाईंना विनविले. त्या सर्वाना, 'ईश्वरी सत्ता प्रमाण सती जाणे हा ध...
25/12/2025

माधवरावांच्या मृत्यूनंतर सती जाऊ नये म्हणून अनेकांनी रमाबाईंना विनविले. त्या सर्वाना, 'ईश्वरी सत्ता प्रमाण सती जाणे हा धर्म आपला आम्हास चवदा इंद्र होईजोपर्यंत स्वर्गवास लाभ होतो' एवढेच रमाबाईंनी सांगितले.

महायात्रेला निघाल्यावर त्यांनी स्वतःचे दागिने व मोहोरा दान केल्या. सामान्य चाकरांनासुद्धा किमान एक मोहोर दान केली. नंतर धर्मशास्त्रानुसार विधिपूर्वक सती गेल्या. उभयता पतीपत्नींच्या उत्तरकार्याचा खर्च १२८ - रोख रु. ५८, ५१६ आ. ६ आणि जामदारखान्यापैकी १२,५२४ रुपयांचे कापड मिळून ७१,०४० रु. ६ आणे. सुमारे १ लाख रु. रमाबाईंनी सती जाताना दानधर्म केला. तो ६०,६५० रु. धर्मादाय, २१,९५० रु. बक्षीस, १६,७८० रु. इनाम व देणगी, ६२० रु. धर्मादाय इनाम. याखेरीज गजदानार्थ आंबारीसुद्धा भवानी नावाचा हत्ती दिला.

रमाबाईंच्या सहगमनावर लिहिलेल्या पोवाड्याचा काही भाग अॅक्वर्थ व शाळीग्राम यांच्या 'ऐतिहासिक पोवाडे' मध्ये उपलब्ध आहे. सहगमनाबद्दल जेम्स फोर्बस म्हणतो. 'आपली सारी धनदौलत आणि जडजवाहीर तिने आपल्या नाते-वाईकांना वाटून टाकले आणि माधवरावांच्या शवाबरोबर ती स्मशानात गेली. तेथे सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर मोठ्या आश्चर्यकारक संथपणे आणि धैर्याने ती चितेवर चढली आणि स्वतःच्या हाताने तिने त्या चंदनाच्या चितेला अग्नी लावला नंतर ब्राह्मणांनी चितेत तूप व सुगंधी तेले ओतली.'

- पेशवे घराण्याचा इतिहास, प्रमोद ओक

१)पाटेश्वर(देगांव)डोंगररांग : बामणोलीजिल्हा : साताराउंची :3025 फूट  # सातारा शहरापासून १४ किमीवर असलेल्या डोंगरावर पाटेश...
25/12/2025

१)पाटेश्वर(देगांव)
डोंगररांग : बामणोली
जिल्हा : सातारा
उंची :3025 फूट
# सातारा शहरापासून १४ किमीवर असलेल्या डोंगरावर पाटेश्वराचे अप्रतिम मंदिर व लेणी आहेत. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये, मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित "शिवपिंडी"आहेत. येथे बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे ४ फूट उंचीच्या पिंडी पाहायला मिळतात.
--------------------------------------
२)जानाई मळाई देवस्थान (खिंडवाडी)
#सातारा शहरापासुन 11 कि.मी. वर खिंडवाडी गवात जानाई मळाई देवीचा डोंगर आहे. अजिंक्यतारा किल्ला व जानाई मळाई यांच्या मधल्या या खिंडीला खिंडवाडी म्हणतात. या खिंडीचा इतिहास म्हणजे रामदास स्वामी व महाराजांची भेट या खिंडीत व्हायची.
--------------------------------------
३)अजिंक्यतारा(सातारचा किल्ला)
प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : सातारा,बामणोली
जिल्हा : सातारा
श्रेणी : सोपी
उंची :3300 फूट(300 मीटर)

या किल्ल्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेने जाता येत नाही. सातारा शहरातुन कुठूनही हा किल्ला नजरेस पडतो. अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी.
२७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली.
--------------------------------------
४)यवतेश्वर देवस्थान
कास पठाराकडे जाताना डोंगरावर एक छोट गाव आहे ते म्हणजे यवतेश्वर.या गावात एक अतिप्राचीन महादेवाच मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या आवारात दोन सुंदर सुबक नंदी आहेत. हे असे फार आढळत नाही.
--------------------------------------
5)कास पठार(पुष्पपठार)
सातारा जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेले ठिकाण म्हणजे कास पठार. सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखले जाते.या कास पठाराला आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते.
कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर आहे. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. --------------------------------------

जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...
25/12/2025

जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते.

गाव:
जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.

शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या सय्यद बडा नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बडाशी दोन हात करून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.

या प्रसंगी जिवा महालाचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच

यांची समाधी आहे. दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता. आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवतात. जिवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता. सैयद बडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडला होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या प्रसंगावरून पडली

🙏✨☀️

समर्थ बोहल्यावरुन पळाले ही सत्य घटना आहे. परंतु ते स्वतःमध्ये काही कमी होती म्हणून अथवा त्यांचे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीव...
23/12/2025

समर्थ बोहल्यावरुन पळाले ही सत्य घटना आहे. परंतु ते स्वतःमध्ये काही कमी होती म्हणून अथवा त्यांचे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीवर प्रेम होते म्हणून अथवा कोणालाही फसवायच्या उद्देशाने पळालेले नाहीत. समर्थांचा फक्त त्यांच्या जातीमुळे विनाकारण द्वेष करणाऱ्या अनेक संघटना महाराष्ट्रात आहेत ज्यांनी अनेक वावड्या उठवलेल्या आहेत ज्या अत्यंत निंदनीय आहेत व त्यांच्यात काही तथ्य नाही.

समर्थांचा जन्म १६०८ साली आजच्या जालना जिल्ह्यातील जांब ह्या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे मुळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी वडिलांच्या झालेल्या अकाली निधनानंतर नारायण अबोल झाला आणि ईश्वर चिंतनात वेळ व्यतीत करु लागला. त्यातून ध्यानधारणा आणि अध्यात्माची ओढ निर्माण झाली. त्यांनी संन्यासी होण्याचा निर्णय लहानपणीच घेतला, परंतु हिंदू धर्मात आईच्या संमतीशिवाय संन्यास घेता येत नाही. आईला विचारुन सुद्धा आईने संन्यास घेण्यास नकार दिल्याने समर्थ नाराज झाले.

त्या काळी सर्व समाजात बालविवाह होत असत त्यामुळे आईने वयाच्या १२व्या वर्षी समर्थांचे लग्न ठरवले. पण मनाची घालमेल कमी होईना, रामाची ओढ स्वस्थ बसू देईना. म्हणून लग्नात बोहल्यावर गुरुजींनी सावधान म्हणताच रामदास पळून टाकळीला आले व पुढील १२ वर्षे त्यांनी तिथे साधना केली. तत्क्षणी मुलीच्या घरच्यांना तो अपमान वाटला असेल पण आयुष्यभर फसवल्याची भावना निर्माण होण्यापेक्षा क्षणाचा अपेक्षाभंग मोठा आहे काय?

समर्थांनी उभ्या आयुष्यात संसार केला नाही. "चिंता करितो विश्वाची" म्हणणाऱ्या समर्थांनी फक्त लोककल्याण हा एकच हेतू मनात ठेवला आणि आयुष्यभर रामाची सेवा केली. लोकांना बहुमुल्य मनाचे श्लोक दिले, हिंदू देवतांच्या आरत्या दिल्या, अतुलनीय असा दासबोध दिला. अशा थोर संताच्या जीवनावरुन राजकारण होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे व महाराष्ट्रातील राजकारणाच्या घसरलेल्या पातळीची निदर्शक आहे.

#मराठी

Joseph Cyril Bamford यांनी इंग्लंडमध्ये 1945 मध्ये युनायटेड किंगडममध्ये (इंग्लंड) सुरू झाली आणि त्याचे मुख्यालय Rocester...
23/12/2025

Joseph Cyril Bamford यांनी इंग्लंडमध्ये 1945 मध्ये युनायटेड किंगडममध्ये (इंग्लंड) सुरू झाली आणि त्याचे मुख्यालय Rocester, Staffordshire येथे आहे. JCB हा त्याचाच शॉर्टफॉर्म.

जगभरात २२+ फॅक्टरीज, १५०+ देशांमध्ये विक्री, १४,०००+ कर्मचारी अशी ही कंपनी विस्तारलेली आहे.

जेसीबी ही कंपनी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही मशिन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

भारतात या JCB चे प्रमुख काम निवडून आलेल्या उमेदवारांवरती गुलाल उधळणे असे आहे. 🙆🏻‍♂️🙆🏻😂😅

जोसेफ साहेबांच्या आत्म्यास मुक्ती मिळो. 🌺🫡

साताऱ्याचे 'रांगोळी वाले आजोबा' हरपले; भोळेभाबडे व्यक्तिमत्व श्री. चारुदत्त यांचे अल्पशा आजाराने निधनसातारा शहरातील एक अ...
18/12/2025

साताऱ्याचे 'रांगोळी वाले आजोबा' हरपले; भोळेभाबडे व्यक्तिमत्व श्री. चारुदत्त यांचे अल्पशा आजाराने निधन

सातारा शहरातील एक अत्यंत आगळेवेगळे आणि आपल्या भोळ्याभाबड्या स्वभावासाठी परिचित असणारे व्यक्तिमत्व, श्री. चारुदत्त (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सातारकरांनी एका निस्सीम आनंदी आणि सदैव हसमुख चेहऱ्याला गमावले आहे.

श्री. चारुदत्त हे साताऱ्यातील सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे किंवा विविध कार्यालयांच्या बाहेर अत्यंत आवडीने आणि हौसेने रांगोळी काढण्यासाठी ओळखले जात असत. कोणत्याही कार्यक्रमात स्वतःहून पुढाकार घेऊन रांगोळी काढणे हा त्यांचा जणू नित्यक्रमच होता. आपल्या कलेचा आनंद इतरांना देण्यातच त्यांनी धन्यता मानली. रांगोळी काढल्यानंतर बक्षीस म्हणून ते हक्काने पैशांची मागणी करत असत. मात्र, कोणी पैसे दिले तर त्यांना होणारा आनंद जितका निखळ असे, तितकाच कोणी पैसे दिले नाहीत तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधी मावळत नसे. 'दिले तर आनंद, नाही दिले तरी सदैव हसतमुख' हा त्यांचा बाणा अनेकांना थक्क करत असे.

समाजात अनेक व्यक्ती येतात आणि जातात, परंतु आपल्या साधेपणाने, कलेने आणि निस्वार्थ वृत्तीने लोकांच्या स्मरणात राहणारी माणसे विरळच असतात. श्री. चारुदत्त हे त्यापैकीच एक होते. साताऱ्याच्या रस्त्यांवर आणि कार्यक्रमांमध्ये दिसणारा हा उत्साही चेहरा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सातारकरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Address

Satara
Satara
415001

Telephone

7020805300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to माझा सातारा:

Share