Satara Jilha Polkhol by AAM ADMI PARTY Satara

Satara Jilha Polkhol by AAM ADMI PARTY Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satara Jilha Polkhol by AAM ADMI PARTY Satara, Social service, Satara.

  Day #
15/08/2025

Day #

28/09/2020

*छोटी गोष्ट पण डोंगरा एवढी*
*आपल्या सुख,दुःखात सदैव बरोबर रहाणारी *आपली माणसं*

*कोरोना विषाणूच्या साथीमुळे छोट्या उद्योजकांचे , शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात अनेक छोटे, मोठे व्यवसाय कायमचे बंद होऊ शकतात.*

*अशा वेळेस सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की मार्ट, मॉल आणि मोठ्या स्टोअर ऐवजी आपल्या पालेभाज्या आणि किराणा माल आपल्या स्थानिक दुकानातून खरेदी करा.*

*याच स्थानिक आणि छोट्या व्यावसायिकांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आपल्याला जीवावर उधार होऊन घरपोच सेवा दिली आहे. तसेच काही वेळा ज्या लोकांची आर्थिक अडचण होती त्यांना सुध्दा उधार देऊन सांभाळून घेतले आहे.*

*या संकट काळात मॉल, मार्ट, स्टोअर्स वाले आपल्या मदतीला कधीही येत नाहीत. मोठ्या कंपनी,मॉल, मार्ट पूर्णत व्यावसायिक आहेत, त्यांचाकडे फक्त फायद्याचे गणित असते माणुसकी आणि त्यांचा काही एक संबध नसतो.*

*कदाचित त्यांच्याकडे काही वस्तू स्वस्त पण मिळतील, पण सुरवातीला जम बसविण्यासाठी ,लोकांना भुलवण्यासाठी ते असे प्रयोग करतात.*
*पण आजपर्यंत......आपलेपणा, आपुलकी, मदत ही आपल्या स्थानिक व्यवसायकडूनच मिळाली आहे आणि सदैव मिळत ही राहणार आहे*

*आपली खरेदी अशा रितीने करा की त्या पैशांचा उपयोग छोट्या,स्थानिक व्यावसायिकांना ,शेतकऱ्यांना झाला पाहिजे की ज्यांना खरोखरंच आवश्यकता आहे. त्यामुळे नक्कीच सर्वसामान्य लोकांची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत होईल.*

*या जागतिक आर्थिक संकटाच्यावेळी केवळ समाजातील विविध घटकांकडूनच या स्थानिक, छोट्या दुकानदारांना, शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या व्यवसायात जिवंत ठेवण्याची शक्ती मिळू शकते आणि त्यांची प्रगती झाली तर आपली पण प्रगती निश्चितच आहे.*

*आपल्या सकारात्मक समर्थनामुळे,चळवळीमुळे समाजातील या घटकासाठी ताकद मिळेल आणि ही चळवळ स्वतःपुर्ती न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवणे आपली जबाबदारी आहे.*

*शेतकरी, सर्वसामान्य छोटे व्यावसायिक यांच्याकडे पैसे आले तर तो पैसा बाजारात इतरत्र फिरतो त्यामुळे देशाची, सर्वांची प्रगती होऊ शकते.*

*छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल करू शकतात आपल्या एकट्यामुळे काय बदल होणार हा विचार करू नका फक्त स्वतःपासून सुरवात करा कर्तव्य म्हणून फरक नक्कीच जाणवेल.*
🙏🏻
राजेंद्र चोरगे ,वसंत जोशी
सवयभान
मीच माझ्या सातारकरांचा रक्षक.

26/09/2020

*सातारकर यांना*
*विनम्र निवेदन.*

*कैलास स्मशान भुमी संगमाहुली येथे आज सर्वं अग्निकुंडा मध्ये अंत्यसंस्कार झाले असून,अंत्यसंस्कार साठी आज दि.26/9/20 रोजी एकही अग्निकुंड शिल्लक नाही.*

*उद्या दि 27/9/20 सकाळ पासून पूर्वतत अंत्यसंस्कार सुरू होतील.*

*तरी कृपया अंत्यसंस्कार साठी मार्गदर्शन पाहिजे असलेस 9422603625 जगदिप ,8208579006 बंडू या फोन वर माहीती घ्यावी. ही विनंती.*

*तसदीबद्दल क्षमस्व*
*राजेंद्र चोरगे.*
*श्री बालाजी ट्रस्ट, सातारा*

20/09/2020

*साताऱ्यातील सर्व नवरात्रोत्सव मंडळ पदाधिकारी व दुर्गा भक्ताना विनम्र आवाहन.*🙏🏻
----------------------------------------------------------
*सातारकरांच्या रक्षणासाठी*

*दुर्गात्सवात करुया सकंल्प कोरोनारुपी राक्षसाच्या वधाचा.*🙏🏻

*मागील ७ महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे.*

*सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. आर्थिक,मानसिक, सामाजिक,कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे.*

*दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत आणि जी परिस्थिती भारताची आहे तीच परिस्थिती सातारा जिल्ह्याची आहे.*रुग्णांची संख्या वाढत आहे,हॉस्पिटल, बेड,ऑक्सिजन मिळत नाहीत, मृतांची संख्या वाढत आहे.*

*व्यवसाय, उद्योगधंदे, कोलमडून पडले आहेत.* *बेरोजगारी वाढतच आहे. अनेक नोकरदारांच्या आहेत त्या नोकऱ्यापण जात आहेत.*

*त्यात हे संकट सर्वांनाच नवीन असलेने प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग सुचवत आहेत, जागतिक पातळी ते गाव पातळी पर्यंत सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसत आहे.*

*आशा परिस्थितीत आपण आपल्या सातारा शहराच्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही कडक नियम, मनापेक्षा, परंपरे पेक्षा वेगळे सर्वांनी राबवण्याची व पाळण्याची गरज आहे. फक्त आपल्यासाठी नाही तर कुटुंबाच्या, जनतेच्या रक्षणासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील आणि त्यांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे मला वाटते.*

*काही दिवसांनी नवरात्रोत्सव येत आहे या दुर्गात्सवात कोरोना या विषाणूजन्य राक्षसाचा वध करण्याचा सकंल्प करत दुर्गादेवीचे स्वागत करूयात.*

*यावर्षी साताऱ्यातील दुर्गात्सव हा निरोगी साताऱ्यासाठी समर्पित करूयात.*

*त्यासाठी आपणास सामाजिक बधंने राखत 'एक वॉर्ड, एक मडंळ संकल्पना' राबविली तर नक्कीच येथून पुढचे सर्व सण, उत्सव तसेच येणारी दिवाळी आनंदाने व उत्साहाने साजरी करता येईल.*

*यापूर्वी एक 'गाव, एक गणपती' योजना होती तसंच साताऱ्यात एक पेठ,एक दुर्गादेवी उत्सव मडंळ' असं काही संयुक्त संकल्पना निर्माण करू.*

*यासाठी दुर्गामाता भक्त, नवरात्रोत्सव मंडळ,पदाधिकारी या सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे फक्त मंडळ म्हणून नव्हे तर निरोगी सातारा म्हणून हे करावं लागेल, असं मला वाटतंय.*

*त्यासाठी कटिबद्ध व्हावं लागेल आणि मनोभावे म्हणावं लागेल की*

*अंबामाता की जय.. दुर्गामाता की जय*

*सवयभान अभियान*
*'मीच माझ्या सातारकरांचा रक्षक'* 🙏🏻

05/09/2020

*आजचा शिक्षक, सध्य स्थिती आणि सुधारणा*

*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः II*

*भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसोबतच शिक्षण/ विद्या यांची देखील नितांत गरज असते. किंबहुना ज्ञानाच्या माध्यमातून मानव आपल्या गरजा भागवू शकतो. शिक्षण हा जागतिक सभ्यतेचा पाया समजला जातो. भारतीय संस्कृतीत ‘ज्ञानदान’ हे सर्वोत्तम दान समजले जाते. हे दान देणाऱ्या साधकाला देखील आपण पूजनीय मानतो. म्हणूनच जगात शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. महासत्ता अमेरिकेचा पाया रचणारे थोमस जेफरसन, स्वतंत्र भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता म. गांधी या सर्वांनी ज्ञानाला आणि ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाला कायमच सर्वोच्च स्थान दिले होते. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांना देखील आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद लाभले होते. जसे सैनिक आपल्या राष्ट्रासाठी कार्य करत असतो तसेच शिक्षक राष्ट्रकार्य करीत असतो. अशा या पवित्र शिक्षकी पेशाला स्वतंत्र भारतात सर्वोत्तम स्थान मिळणे अपेक्षित होते, मात्र गेली अनेक वर्षे आपल्याकडे याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.*

*शिक्षकांची सद्यस्थिती :*
*संत कबिरांचे ‘ गुरुबिन कोन बताये राह’ वचन आपल्याला शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाते, मात्र शिक्षकी पेशातील पवित्रता समाजात पाळल्याचे दिसून येत नाही. शिक्षकांना त्यांचे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सोडून त्यांना अन्य कामे सरकारकडून, समाजाकडून सोपवली जातात. निवडणूक यंत्रणेमध्ये त्यांचा सहभाग घेतला जातो. लोकसंख्या गणन करण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील त्यांचा सहभाग घेतला जातो. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये शिक्षकांना शिक्षकेतर कामे सोपवण्यात येवू नयेत असे सांगितले आहे, मात्र याच कायद्यामध्ये जनसंख्या गणन, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, संसद यांचेसाठी निवडणूक यंत्रणा यांसाठी अपवाद करण्यात आले आहे. याबाबत मा. ना. उच्च न्यायालय सो यांनी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, पण त्यांचे पालन आपल्याकडे केले जात नाही. मुळातच, शिक्षकांकडे येणाऱ्या भावी पिढीला घडवण्याचे काम असते, त्यामुळे हे कार्य अविरत असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना ज्ञानदाना व्यतिरिक्त इतर कामे देणे हे नवीन आलेल्या रोपट्यांना मशागतीनंतर मध्येच वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे आहे.*
*शिक्षकपेशा ही अत्यंत अवघड अशी जबाबदारी असते. अत्यंत कमी लोक हे पवित्र कार्य स्विकारतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात देखील शिक्षकांचे बहुमुल्य योगदान होते यावरूनच शिक्षक हा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंगभूत हिस्सा आहे हे लक्षात येईल. मात्र, विद्यमान स्थितीत शिक्षकी पेशाला व्यवसायातील शेवटचा मार्ग म्हणून पाहिले जाते. आजकालचा युवक भविष्यात मी शिक्षक होईन असे म्हणत नाही. शिक्षकांना वेळेवर मानधन दिले जात नाही, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली प्रगती होते, त्यांनाच योग्य सन्मान न देता त्यांचेकडून शिक्षकेतर कामे करून घेतली जातात. भारतामध्ये हीन वागणूक मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जसे हाल होतात तसेच हाल शिक्षकांचे होत आहेत. कोरोना काळात देखील शिक्षकांना जिल्हा सीमेवर वाहतूक संदर्भातील कामे दिली गेली होती. नव्याने येणारी तंत्रज्ञानाच्या युगातील यंत्रे शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. याचे कारण मानवी बुद्धिमत्तेतील विवेक हा यंत्रांना येवू शकत नाही.*

*शिक्षकांची स्थिती सुधारण्याचे काही उपाय :*
*शिक्षकांची आर्थिक, सामाजिक, मानसिक अशी सर्वांगीण स्थिती सुधारण्यासाठी केवळ शासन स्तरावरूनच नाही तर समाजाकडून देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकारने शिक्षकांना शिक्षकेतर कामे न सोपवता त्यांना त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यात मदत करणे गरजेचे आहे. समाजाने देखील शिक्षकी पेशाला मानाचे स्थान दिले पाहिजे, जेणेकरून शिक्षकी पेशाकडे एक राष्ट्रकार्य समजून ते करण्यासाठी आजचा तरुण सरसावेल. बी.एड., डी.एड., यासारख्या परीक्षांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील परीक्षांसारखा समान न्याय मिळणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासक्रमामध्ये जास्त सामाजिक ज्ञान,प्रात्यक्षिक परीक्षेवर भर,प्रवेश परिक्षेची कठीण पातळी वाढविणे गरजेचे आहे.*
*शिक्षक असलेलाच व्यक्ती शिक्षण मंत्री होणे आवश्यक आहे, जेणेकरून शिक्षणातील समस्यांचे निराकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. सरकार आर्थिक बजेट मधील केवळ दोन टक्के हिस्सा शिक्षणाकडे सोपवते, वास्तविक पाहता, याला संरक्षण खात्याइतकेच महत्त्व प्राप्त होणे हे संयुक्तिक आहे. येणारी पिढी जर ज्ञान संपन्न असेल तर त्याचा भविष्यात चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणूनच शिक्षण या विषयाकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आजच्या शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांना योग्य तो मानसन्मान मिळालाच पाहिजे हा संकल्प सर्वांनी केला तरच खऱ्या अर्थाने शिक्षकदिन आपण साजरा केला असे म्हणू शकतो.*

*श्री. राजेंद्र मधुकर चोरगे,*
*अध्यक्ष*
*गुरुकुल शिक्षण संस्था, सातारा*

Address

Satara
415002

Telephone

7757054271

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara Jilha Polkhol by AAM ADMI PARTY Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category