24/08/2024
देवगावमधील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, कोटकर वस्ती शाळा, डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय यांना मुलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे लेखी पत्र दिले आहे.
--------------------------------------
प्रति,
विषय - शाळा/अंगणवाडीमधील मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणेबाबत...
महोदय,
महाराष्ट्रातील बदलापूरमधील शाळकरी मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने सर्वच पालकांची काळजी वाढली आहे. पालक अत्यंत विश्वासाने आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. मात्र आता मुलं शाळेतच सुरक्षित नसल्याची भावना तयार झाली आहे. याला काही कारणंही आहेत. पालक मुलांना ज्या शाळेत काही तास पाठवतात, तेथे कोण येतं, त्यांच्या मुलांसोबत काय करतं याबाबत अनभिज्ञता असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूरची घटना अशा अत्याचाराची पहिली घटना नाही. याआधीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र, असं असूनही मुलांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हे मुलांच्या सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष आहे. किमान बदलापूर घटनेनंतर तरी आपण जागृक होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.
स्वतः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत ५ टक्क्यांची तरतुद केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि शाळांनी मिळून तातडीने यावर अंमलबजावणी करावी. या मागणीनंतरही या उपाययोजना झाल्या नाही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड होऊन कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला संबंधित शाळा आणि ग्रामपंचायत जबाबदार असेल आणि सजग नागरिकांचा सर्वाधिक आक्रोश त्यांच्यावरच व्यक्त होईल, याची कृपया नोंद घ्यावी.
कळावे,
सजग नागरिक मंच, देवगाव
प्रवीण शिंदे, सुरज रोहम, कुणाल रोहम, संजय देशमुख, कोटकर गणेश, विजया रोहम, प्रमोद शिंदे, सुनिल लामखडे, शंकर कोटकर, अरविंद कोटकर, अंबादास कोटकर, मुकुंद शिंदे, वैभव नालकर, संतोष सोनवणे, रविंद्र लामखडे, विशाल पावसे, संतोष पानसरे, संतोष पानसरे, माधुरी लामखडे, वैभव कोटकर, शंकर पावसे, एकनाथ कोटकर, गणेश पावसे, सोमेश्वर कोटकर, सोमनाथ भवर, रेवन शिंदे, वनिता बस्ते, चेतन पावसे, रवी रोहम, सुनिता शिंदे, सुरेश रोहम, संतोष देशमुख, अनंत चत्तर