जय महाराष्ट्र
महाराष्ट्र स्वाभिमान सूर्य आदरणीय श्री. राजसाहेब ठकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माणासाठी माहिती तंत्रञान विभाग, मनसे कटीबद्ध आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रञानचळवळ निर्माण करणे व माहिती तंत्रञान क्षेत्रात मराठी टक्का वाढवणे हा विभागाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्धेश आहे. माहिती तंत्रञान विभागाच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणारे मराठी युवक / युवती यांच्या सामाजिक , रोजगारविषयक प्रश्नां
ची सोडवणूक करणे हे आमचे प्रमुख काम आहे. यान्वये व्यसनमुक्ती, नोकरीचे प्रश्न , माहिती तंत्रञान कार्माचारांच्या वाहतूक समस्या , सामाजिक प्रश्न, आय . टी/ आय ती इ एस . आस्थापनेचे प्रश्न, महिला सुरक्षितता , कामाचे तास असे अनेक प्रश्न विभागाच्या माध्यामतून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
उच्चशिक्षणाचा स्तर, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रात लागणाऱ्या कौश्ल्यामधील तफावत, उचाशिक्षणाचा न पेलवणारा खर्च , तांत्रिक विद्यापीठे व आय . टी.आस्थाप्नेमाधील विसंवाद तसेच शासनाचे माहिती तंत्रञान धोरण इ. बाबतीत या क्षेत्रातील तज्ञांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे.
माहिती तंत्रञानाचे फायदे ग्रामीण भागातील बांधवाना वहावेत यासाठी प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन त्यांना माहिती देणे असे उपक्रम देखील विभागातर्फे राबविले गेले आहेत. नोकरीबरोबर व्यवसाय करण्याकडे देखील मराठी माणसाने तयारी ठेवावी यासाठी विशेष प्रयत्न विभागाद्वारे सुरु आहेत.
जय हिंद .. जय महाराष्ट्र