12/06/2026
🚨
शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! महसूल न्यायालयातील 'तारीख पे तारीख' आता बंद!🚨
महसूल विभागाच्या (Revenue Department) कामकाजाबाबत आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांबाबत (उदा. जमिनीचे फेरफार, अपिले, वाद) राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अत्यंत कडक आणि नवीन नियमावली (SOP) लागू केली आहे.
आता महसूल अधिकाऱ्यांना आणि न्यायालयांना या नव्या नियमांनुसारच काम करावे लागेल:
✅ सर्व निकाल आता फक्त 'मराठीत': महसूल न्यायालयातील सर्व सुनावण्या आणि अंतिम निकाल आता सक्तीने 'मराठी' भाषेतच द्यावे लागतील. जेणेकरून सर्वसामान्यांना आपला निकाल सहज वाचता येईल.
✅ ८ आठवड्यांत अंतिम निकाल: सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ८ आठवड्यांच्या आत सविस्तर आणि योग्य कारणे दिलेला निकाल देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
✅ तारीख पे तारीख बंद: प्रकरणाच्या सुनावणीत आता वारंवार तारखा मिळणार नाहीत! योग्य कारण असेल तरच फक्त 'एकदाच' पुढील तारीख (Adjournment) दिली जाईल. तसेच अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान २ दिवस (मंगळवार व शुक्रवार) सुनावणी घेणे सक्तीचे केले आहे.
✅ डिजिटल आणि ऑनलाईन निकाल: महसूल न्यायालयाचे सर्व निकाल आता 'e-QJ Court' या ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करावे लागतील आणि त्यावर अधिकाऱ्यांची 'डिजिटल स्वाक्षरी' असणे अनिवार्य असेल.
✅ मंत्रालयाच्या फेऱ्या वाचणार:शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण किंवा वापरात बदल (Change of Use) करण्यासाठी आता थेट मंत्रालयात जाण्याची गरज नाही. हे सर्व अधिकार आता 'जिल्हाधिकारी' (Collector) आणि 'विभागीय आयुक्त' यांना देण्यात आले आहेत.
या कडक नियमांमुळे आता जमिनीचे आणि महसुलाचे वाद वेगाने सुटण्यास मोठी मदत होणार आहे! ही अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकांना आणि ग्रुपवर नक्की SHARE करा. 📢
महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या अशाच महत्त्वाच्या प्रशासकीय अपडेट्ससाठी आपला कट्टा नक्की फॉलो करा:
👉