22/03/2026
" २२ मार्च १९२० माणगाव येथील अस्पृश्यांची परिषद "
माणगाव यथे जी परिषद झाली त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते व प्रमुख पाहुणे राजश्री शाहू महाराज होते,
सदर परिषद तीन गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण होती . एक गोष्ट हि कि, सदर परिषदेत अस्पृश्य समाजातील विशेषता महार लोकांना जी हजेरी लावली जात होती व त्या हजेरीच्या पोटी त्यांच्याकडून विनामुल्य काम करून घेतले जात होते, तसेच चोरी वगैरे नाहक आरोपाखाली त्यांच्यावर जुलूम केला जात होता, त्याचे वर्णन स्वतःच्या अनुभवातून खुद्द शाहू महाराजांनी केले व हि हजेरी रद्द करण्यात आल्याची पहिली घोषणा त्यांनी केली.
दुसरी वैशिष्यपूर्ण गोष्ट हि कि, त्यांनी महार आदी लोकांनी म्हारकीची ,गुलामगिरीची कामे सोडावीत , असा उपदेश केला व त्यांच्या वतनाचे रुपांतर रायताव्यात करावे असे जाहीर केले.
तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट हि कि, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिजात पुढारपणाची अशी घोषणा केली कि, " हेच तुमचे खरे पुढारी आहेत ; ते तुमचाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतील अशा प्रकारचे त्यांच्या अंगी गुण आहेत . "
अशी पहिली घोषणा करणारे शाहू महाराज , भारतातील नव्हे तर जगातीलही या बाबतीतील एकमेव द्रष्टे पुरुष होत. आपल्या राजेशाही मुकुटाची फिकीर न बाळगता , अस्सल पुढारीपपणाचा मुकुट स्वहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोईवर ठेवून मोठ्या आत्मीयतेने जाहीररीत्या त्यांना तो अर्पण केला होता.
शाहू महाराज म्हणाले पुढारपणाच्या कसोटयांबद्दल व्यवहारीपणाच्या व अनुभवांच्या कसोटीतून माणगावच्या परिषदेत त्यांनी सवाल केला ." पक्ष्यांमध्ये चतुष्पादाचा पुढारी कधी झाला आहे काय ? आणि चतुष्पादांचा पुढारी कधी एखादा पक्षी बनला आहे
काय ?" पुढारीपणाची पुढे छाननी करतांना , माणगावच्या परिषदेत ते सांगतात :
" आमच्यापैकी काही आप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात . आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेला पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. जे क्षत्रियांनासुद्ध शुद्र मानून त्यांना विष्ठेपेक्षाही अस्पृश्य मानतात व स्पर्श झाला म्हणजे जे स्वतःची शुद्धी करून घेतात असे पुढारी काय कामाचे ?"
शाहू महाराजांनी दिलदारपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केलेले वर्णन , भीमरावने ,
प्रदीर्घ विद्याभ्यासाने , शिलसंवर्धनाने , कळकळीने, जनहितासाठी निर्भयपणे लढून यथार्थ करून दाखविले .
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
.......सविता राजेंद्र बाविस्कर ........