Adv Vinod Ambhore Dudhagaonkar

Adv Vinod Ambhore Dudhagaonkar Law & Social

23/04/2026

शाक्यनगरी, परभणी. भीमजयंती महोत्सव 2026

23/04/2026

पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

23/04/2026

कायदा व सुव्यवस्थे च्या मर्यादेत संविधानिक भारत बंद आंदोलन.
जाति आधारित जनगणना, ओबीसी हक्कांचे संरक्षण, TET रद्द करावी, UGC बिल लागु करावे, मतदान बॅलेट पेपर वर घेण्यात यावे तसेच शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या, विविध मागण्यांसाठी भारत मुक्ति मोर्चा व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (OBC) मोर्चा यांच्या वतीने देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

या आंदोलनाला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत ओबीसी, एससी व एसटी समाजाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

यानिमित्ताने परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र जातीनिहाय कॉलम समाविष्ट करण्यात यावा.

एससी, एसटी व ओबीसी समाजाच्या हितासाठी मजबूत यूजीसी इक्विटी रेग्युलेशन तातडीने लागू करावे.

सन 2011 पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TET परीक्षेतून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी.

ॲड विनोद अंभोरे, गौतम जडे सह आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेऊन सांगीतले की, ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे ही मोठी फसवणूक आहे. तसेच शैक्षणिक धोरणांमध्येही दुर्बल घटकांच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, वरील मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र व व्यापक करण्यात येईल. आंदोलन पूर्णतः संवैधानिक व शांततापूर्ण मार्गानेच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदर निवेदन जिल्हाधिकारी, परभणी यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून, प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बाळासाहेब लंगोटे पाटील, गौतम जडे, सुभाष साडेगावकर, ॲड विनोद अंभोरे, मुंजाजी भाले, बबन भंडारे, ॲड संदेश वाघमारे, टी टी सुभेदार, ॲड कांचन बनसोडे, विठ्ठल साखरे, पांढरे, क्रांतिकर ढगे, भारत लांडगे, मुकूंद हणवते इत्यादी.

माननीय, "सिबू सोरेन" माजी मुख्यमंंञी. तथा,संस्थापक झारखंड मुक्ती मोर्चा. भावपूर्ण आदरांजली...बहुजन मुक्ती पार्टी, महाराष...
04/08/2025

माननीय, "सिबू सोरेन" माजी मुख्यमंंञी. तथा,
संस्थापक झारखंड मुक्ती मोर्चा.
भावपूर्ण आदरांजली...
बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र राज्य.

अ‍ॅड. विनोद अंभोरे,
प्रदेश कार्याध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी.

02/08/2025

अखेर गुन्हा (FIR) नोंद झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सोमनाथ सूर्यवंशी मृ्त्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला.

महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख वकील म्हणून काम पाहिले.

सुप्रीम कोर्टात हि सोबत अ‍ॅड.भोंबर्डे साहेब व इतर वकील यांनी काम पहिले, माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. याकारिता परभणीतिल आंबेडकरी वकिलानी या प्रकरणात सुप्रीम कोर्टा प्रयंत सर्व सहयोग केला.

त्याबद्दल अ‍ॅड.भोंबर्डे साहेब, सर्वोच्च न्यायालय यानी फोन करूण अभार व अभिनंदन व्यक्त केले.

EVM च्या जोरावर भडव्यांच्या अवलादी, बहुजनांच्या उरावर बसल्यामुळे..RSS व BJP द्वारा संविधान व बहुजन महापुरुषांची अवमानना ...
01/02/2025

EVM च्या जोरावर भडव्यांच्या अवलादी, बहुजनांच्या उरावर बसल्यामुळे..

RSS व BJP द्वारा संविधान व बहुजन महापुरुषांची अवमानना केल्या जात आहे..

26 जानेवारी रोजी पंजाब राज्यात अमृतसर येथील संविधान ची नासधूस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आवमान, व त्याअगोदर 10 डिसेंबर रोजी परभणी (महा.) मध्ये संविधान ची नासधूस विडंबन.
त्याअगोदर दिल्लीत ब्राह्मणवाद्यानी संविधान जाळले.
अशा घटना जाणिवपूर्वक घडवल्या जातं आहेत,
देशपातळीवर बहुजन मुक्ती पार्टी याचा निषेध करीत आहे

9 एप्रिल 2025 रोजी जेल भरो आंदोलनं करणारं आहोत...! व 1 जुलै 2025 रोजी भारत बंद..!

मी नागवंशी च आहे, याची जाणीव करून देणारा "तंगलान"
09/09/2024

मी नागवंशी च आहे, याची जाणीव करून देणारा "तंगलान"

दिल्ली येथील संसद भावना समोरील म जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापूरुष्यांचे पुतळे केंद्र ...
10/08/2024

दिल्ली येथील संसद भावना समोरील म जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापूरुष्यांचे पुतळे केंद्र सरकारने हटवल्याच्या निषेधार्थ, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन.दिनांक- 09.08.2024

जय संविधान...!
04/08/2024

जय संविधान...!

दि. १५ ऑगस्ट १९४७ ला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले.त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ ला साहित्यसम्राट महान कामगा...
01/08/2024

दि. १५ ऑगस्ट १९४७ ला तथाकथित स्वातंत्र्य मिळाले.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ ला साहित्यसम्राट महान कामगार नेते लोकप्रबोधनकार
सत्यशोधक अण्णा भाऊ साठेंनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला. हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी मुंबईत काढला. हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी आझाद मैदानावर काढला. हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा त्यांनी पडत्या पावसात काढला. त्यावेळी जेवढा पाऊस पडला-जेवढी पावसाची नोंद झाली - तेवढा मोठा पाऊस आणि तेवढी पावसाची नोंद अद्यापही मुंबईत झाली नाही. हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा- कम्युनिस्टांनी विरोध
करुन सुध्दा काढण्यात आला. हा स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा- पोलिसांनी विरोध करुन देखील काढण्यात आला. शेवटी तर कम्युनिष्टांनी फतवा काढला की, अण्णाभाऊ
साठेंच्या “स्वातंत्र्याच्या निषेध मोर्चात” कामगारांनी सहभागी होऊ नये. तरी देखील अण्णा भाऊ साठेंच्या निषेध मोर्चात २०,००० च्या वर लोक उपस्थित होते. शेवटी तर कम्युनिष्टांनी कामगारांना आप-आपल्या गिरण्यांपुढे स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचा आदेश दिला. जेणेकरुन लोक अण्णाभाऊ साठेंच्या स्वातंत्र्याच्या निषेध मोर्चात सहभागी होणार नाहीत. तरी देखील अण्णा भाऊ साठेंनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला. तोही महाराष्ट्राच्या राजधानीत - मुंबईत काढला - पडत्या पावसात मोर्चा काढला- मशाल मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व अण्णाभाऊ साठे आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शाहीर अमर शेख यांनी केले. या स्वातंत्र्याच्या निषेध मोर्चाची घोषणा होती- “यह आझादी झूठी है। देश की जनता भूखी है।” अण्णाभाऊ साठेंच्या सर्व घोषणा मराठीत आहेत- केवळ एवढीच घोषणा हिंदीत आहे - कारण हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे.

अण्णाभाऊ साठेंना १५ ऑगस्ट १९४७ चे स्वातंत्र्य मान्य नव्हते. कारण त्यांना माहीत होते की, हे स्वातंत्र्य नसून सत्तेचे हस्तांतरण आहे. याचा अर्थ अण्णाभाऊ साठे देखील युरेशियन ब्राम्हणाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नव्हते. जर अण्णाभाऊ साठे युरेशियन ब्राम्हणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी असते किंवा त्यांना युरेशियन ब्राम्हणांचे स्वातंत्र्याचे आंदोलन मान्य असते तर त्यांनी त्याचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी- स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढलाच नसता- परंतु त्यांनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला. कारण १५ ऑगस्ट १९४७ चे स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते- का, मान्य नव्हते? कारण ते केवळ युरेशियन ब्राम्हणांचे स्वातंत्र्य होते, ब्राम्हणेत्तरांचे नव्हते. ज्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा काढला - त्यावेळी काही पत्रकारांनी अण्णाभाऊ साठेंना घेरले व काही प्रश्न विचारले-

पत्रकारांचा प्रश्न :-
अहो अण्णाभाऊ साठे, काल तर भारताला स्वातंत्र्य
मिळाले आहे आणि आज तुम्ही स्वातंत्र्याचा निषेध मोर्चा
काढताय याचे कारण काय ?

अण्णाभाऊ साठे:-
काल जे स्वातंत्र्य मिळाले त्याने आम्ही नाही स्वतंत्र
झालो तर ते स्वतंत्र झाले. आता या वाक्यातील “आम्ही" म्हणजे कोण- तर भारतातील ब्राम्हणेत्तर लोक, शूद्रातिशूद्र लोक, शोषित-पीडित लोक होय. आणि “ते” म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य. अण्णाभाऊ साठे हिंदी भाषेतून मोठ्या आवेषाने पत्रकारांना सांगतात

“अरे कल जो आझादी मिली, उससे वे आझाद हुए हम नही । हम तो आज भी गुलाम है, भूखे कंगाल है।”

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, १५ ऑगस्ट १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळाले ते ब्राम्हणेत्तरांचे स्वातंत्र्य नाही. १५ ऑगस्ट ला ब्राम्हण स्वतंत्र झाला आणि ब्राम्हणेत्तर भारत गुलामच राहिला आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी १५ ऑगस्ट १९४७ ला संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करीत होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी
म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्याचा जाहीर निषेध मोर्चा काढून ब्राम्हणेत्तरांना तुम्ही स्वतंत्र नाहीत याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हे धाडस करणे म्हणजे देशाच्या विरोधात उभे ठाकण्याचे काम होते ते त्यांनी केले. त्यावेळी त्यांना शत्रूकडून गद्दार, देशद्रोही घोषित करण्याची शक्यता होती. तरी देखील त्यांनी कशाचीही पर्वा न करता युरेशियन ब्राम्हणांच्या नाकावर टिच्चून, त्यांचा स्वातंत्र्याच्या मशाल मोर्चा
काढून निषेध केला. हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा धाडसी कार्यक्रम म्हणूनच मूलनिवासी इतिहासात याची नोंद होईल.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा...!

Address

Bhim Nagar, Parbhani TQ. Dist. Parbhani
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Vinod Ambhore Dudhagaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share