जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.

  • Home
  • India
  • Palghar
  • जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.

जिल्हा माहिती कार्यालय,पालघर. Official page of District Information Office, , Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

02/06/2026

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026

आजअखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल;मंगळवारी छाननी

पालघर,दि.1(जिमाका): महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.
00000000

28/05/2026
28/05/2026

मच्छीमारांनो सावधान..!
१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

पालघर, दि.28(जिमाका):- ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मच्छीमारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.
या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजोत्पादन काळ असतो, त्यामुळे या बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला मोठा वाव मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होते.
मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या आदेशानुसार, ही पावसाळी मासेमारी बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मे २०२६ पूर्वीच आपापल्या बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले असून, १ जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या क्षेत्राबाहेर खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे धोरण व मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले आहे. जर बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली, तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नौकामालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.
000000000

20/05/2026

'जनगणना २०२७'च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची नोंदणी होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे येणारे प्रगणक (‘प्रगती’ आणि ‘विकास’) यांना योग्य ती माहिती द्या. ते नेमके कोणते प्रश्न विचारणार आहे, याची संपूर्ण यादी जाणून घ्या.

#जनगणना२०२७
#आमचीजनगणना_आमचाविकास


#विकसितभारत२०४७

मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणारजखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार...आदिवासी विकास मंत्र...
19/05/2026

मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार

जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार
...आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

पालघर, दि. १९ मे २०२६ : धानीवरी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व स्वीकारणार असून, जखमींवरील उपचारांचा १०० टक्के खर्च शासन उचलणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

अंत्यसंस्कारासाठी डॉ हेमंत सवरा, आमदार सर्व श्री. राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
बापूगाव व लाखातपाडा येथील आदिवासी कुटुंब साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमासाठी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना धानीवरी परिसरा मध्ये झालेल्या अपघातात एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पैकी १२ जणांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.यामध्ये बापूगाव व लाखातपाडा येथील १२ तर वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या १७ जणांवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून, औषधे, शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व वैद्यकीय खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.
“कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आदिवासी विकास विभाग या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची तात्काळ दखल घेत मदतीची घोषणा केल्याचे सांगताना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके म्हणाले की, जिल्हाधिकारी, आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बाधित कुटुंबांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांच्या गरजा आणि समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे.
“ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. हा आघात विसरणे शक्य नाही; मात्र या संकटाचा सामना करण्याची शक्ती सर्वांना लाभो,” अशा भावना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केल्या.

19/05/2026

पालकमंत्री गणेश नाईक यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची केली विचारपूस

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत तसेच शासनाकडून संपूर्ण उपचार करण्यात येणार

....पालकमंत्री गणेश नाईक

पालघर, दि. १८ : शासन जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल तसेच अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली .
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी गावाच्या हद्दीतील गेटीपाडा येथे झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना वेळीच उपचार उपलब्ध करून दिला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर राबविले.
या पार्श्वभूमीवर वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री Ganesh Naik यांनी वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि प्रशासनाकडून उपचार व्यवस्थेची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

18/05/2026

प्रसिद्धीपत्रक

धानीवारीजवळील भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाचे निवेदन; १३ जणांचा मृत्यू

पालघर, दि. १८ मे २०२६ : आज सायंकाळी अंदाजे ४:०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना धानीवारी गावाच्या हद्दीत घडली.

प्राथमिक माहितीनुसार, साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणारे अंदाजे ३० ते ४० प्रवासी घेऊन जाणारा आयशर टेम्पो (नोंदणी क्रमांक MH 48 DC 7474) मुंबई-गुजरात मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने (नोंदणी क्रमांक NL 01 AC 9118) नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. तसेच एक मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH 04 EM 8425) देखील या अपघातात सापडली.

या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली आहे. बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले.

१४ जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1. सुरेश रत्ना लाखात
2. पांडू गणपत लाखात
3. काळू गोविंद लाखात
4. सुनील अर्जुन दांडेकर
5. चिमा गोविंद कुरहाडा
6. नमिता विठ्ठल दांडेकर
7. सारिका संतोष लाखात
8. आयुष सिताराम लाखात
9. सागर नामदेव शेंडे
10. वंदना शिवराम वळवी
11. सलोनी शिवराम वळवी
12. अजय अहाडी
13. रियांशी संतोष लाखात

जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत.

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पालघर जिल्हा प्रशासन

16/05/2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा दावा खोटा आहे. सरकार किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून सर्व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.



13/05/2026

उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा सोशल मीडियावर करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.


शासनाने कोणताही राज्यव्यापी बंद जाहीर केलेला नाही. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये विविध उपाययोजना तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Address

Palghar
401404

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912525255333

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय,पालघर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.:

Share