महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर पूर्व तालुका

  • Home
  • India
  • Palghar
  • महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर पूर्व तालुका

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर पूर्व तालुका Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर पूर्व तालुका, Political organisation, At/post/manor tal/palghar, maharastra, Palghar.

होय, हे मीच केलंय
07/10/2019

होय, हे मीच केलंय

जे काम  #आमदाराला जमलं नाही ते कामविकास योद्धा हडपसर  #मनसेचे उमेदवार नगरसेवक  #वसंत_तात्या_मोरे यांनी करून दाखवलं वर्षा...
24/09/2019

जे काम #आमदाराला जमलं नाही ते काम
विकास योद्धा हडपसर #मनसेचे उमेदवार नगरसेवक #वसंत_तात्या_मोरे यांनी करून दाखवलं वर्षाला ३०लाख रुपये महानगरपालिकेला देणारा नगरसेवक आमदार झाल्यावर काय करू शकतो विचार करा
निशाणी रेल्वे इंजिन 🚂👈

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज  आज दि. 21 सप्टेंबर 2019अखेर मनसेचे निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब.पालघर जिल्ह्यातील सर्व विध...
22/09/2019

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज

आज दि. 21 सप्टेंबर 2019

अखेर मनसेचे निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब.

पालघर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मनसे ताकदीने लढवणार - कुंदन संखे, पालघर जिल्हाध्यक्ष

पालघर, 21 - महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्ण कुंज येथे काल झालेल्या नेते व पदाधिकारी यांच्या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून तयारीला लागा हा आदेशच पदाधिका-यांना दिला आहे. त्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अत्यंत तातडीची बैठक पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या अध्यक्षतेत आज बोईसर येथील मनसे कार्यालयात पार पडली. मन सैनिकात उत्साह असून मनसे रिंगणात उतरल्याने निवडणुकीचे गणिते बदलणार असल्या चे जाणकारांचे मत आहे.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात तीव्र प्रचार केला होता. त्यावेळी मनसे लोकसभेत शक्ती खर्च न करता येत्या विधानसभेवर लक्ष केंद्रीत करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. त्या प्रमाणे
मनसेचंही अखेर विधानसभा निवडणूक लढण्याचं निश्चित झालंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतू विधानसभेच्या 288 पैकी किमान 100 जागा लढणार असल्याचे मनसे कडून सांगण्यात येतेय. त्या पार्श्वभूमीवर आज संखे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या सदर बैठकीचा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे संखे यांनी सांगितले. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे कडून नालासोपारा व बोईसर मतदार संघात चांगली मत घेऊन मुसंडी मारली होती. सध्या शिवसेना भाजपा युतीच्या विरोधात वातावरण असून, आघाडी देखील विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरल्याने मनसे पक्षाला खूप पोषक चित्र आहे. तसेच राज ठाकरे हे कोण कोणते मुद्दे घेऊन विरोधकांची हजेरी घेतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

पालघर जिल्ह्यातील विधानसभा लढविण्या संदर्भात कुंदन संखे यांची मोर्चे बांधणी सुरूच होती. सर्वसामान्य जनतेच्या न्यायी मागण्यांसाठी मनसेने वेळोवेळी आंदोलने केल्याचे संखे यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपला कल मनसे उमेदवारांनाच देईल असा विश्वास संखे यांनी व्यक्त केला. मनसे निवडणूक लढणार असल्याने प्रस्थापितांना धडकी भरली असून, मनसेचा फटका कोणाला बसतो ही उत्सुकता असणार आहे. आजची बैठक पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होऊन, वाडा, जव्हार, तलासरी, विक्रमगड आणि पालघर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हा आहे खरा नेता...नाशिकच्या जनतेने आता तरी ओळखाव राज साहेब हे पोटटिडकिने बोलतात नाशिक बद्दल खोटी आश्वासन नाही देत नाशिक ...
02/05/2019

हा आहे खरा नेता...नाशिकच्या जनतेने आता तरी ओळखाव राज साहेब हे पोटटिडकिने बोलतात नाशिक बद्दल खोटी आश्वासन नाही देत
नाशिक येथे विराट सभेमध्ये सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी नाशिक येतील बर्डे वाडी खोडाला तालुका त्रंबकेश्वर या गावातील महिला पाण्यासाठी वणवण फिरत होत्या आणि आपला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढताना चे विडिओ दाखवला होता.

मा. राजसाहेबांनी काल त्वरित मनसे सरचिरणीस आणि कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना आदेश देऊन त्या गावामध्ये २००० लिटर पाण्याच्या टाक्या देऊन सदर गावामध्ये पाण्याचे टँकर्स १ मे २०१९ पासून पाऊस पडे पर्यंत देण्यास सांगितले आहे.
Raj Thackeray MNS Adhikrut

राज ठाकरेंनी आधीच सूचित केलेला धोका? यूपी-बिहारींचा थेट राज्यातील 'ओबीसीं'च्या आरक्षणावर दावामुंबई : महाराष्ट्र नवनिर्मा...
19/09/2018

राज ठाकरेंनी आधीच सूचित केलेला धोका? यूपी-बिहारींचा थेट राज्यातील 'ओबीसीं'च्या आरक्षणावर दावा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये वाढत जाणारे लोंढे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण आणि त्यामुळे भविष्यात घडू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नेहमीच जाहीर भाष्य केलं आहे. परंतु, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या एका संभाव्य धोक्याला अजून एक पुरावा मिळाला आहे.

कारण, काल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातील यूपी – बिहारींचा महाराष्ट्रातील ओबीसी म्हणून समावेश करावा अशी लेखी विनंती केली. त्यावेळी त्यांच्यासोबत यूपी – बिहारींच शिष्टमंडळ सुद्धा सोबत होत. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या प्रतिनिधींनी या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर ‘संजय निरुपम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा सुद्धा दिल्या.

राज्यात अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, त्यांच्या हाताला अजूनही काहीच लागलेलं नाही, जे इथले मूळचे मराठी रहिवासी आहेत. याच परप्रांतीय लोंढ्यांनी मराठा आरक्षणात सुद्धा हौदोस घालून मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होत. त्यात ओबीसी समाजात आधीच शेकडो अंतर्गत जातींचा समावेश असताना, उत्तर प्रदेशातील आणि बिहारमधील मागासवर्गीयांना सुद्धा महाराष्ट्रातील ओबीसींच्या कोट्यात सामावून घ्यावे अशी मागणी करणे म्हणजे थेट स्थानिकांच्या हक्कांवर दावा ठोकून यूपी – बिहारमधील ते आमचं आणि महाराष्ट्रातील ते सुद्धा आमचंच असा प्रयत्न सुरु झाला आहे.

दरम्यान, राज्यातील यूपी – बिहारींचे हे प्रयत्न केवळ राजकारणापुरताच न पाहता भविष्यात मतपेटी वाढविण्यासाठी कोणतीही घटनाबाह्य आश्वासनं दिली गेल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी अनेक समाजांना आरक्षणाची अशीच तुफान आश्वासनं दिली गेली होती, परंतु वास्तवात एकही पूर्ण झालेलं नाही. विशेष म्हणजे संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कृपाशंकर सिंग यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने काय डाळ शिजली असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे केवळ काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी निरुपम हे करत आहेत, असं समजून गप्प राहण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे मनसे अध्यक्षांनी बोलून दाखविलेला संभाव्य धोका महाराष्ट्राने वेळीच ओळखणे महत्वाचे आहे.

*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर जिल्ह्या दत्तक योजने मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्...
05/08/2018

*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर जिल्ह्या दत्तक योजने मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले*

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात , वह्या वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , क्रीडा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , १० वी १२ वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर असे अनेक कार्यक्रम आयोजित करीत असतो .
परंतु बरेच विद्यार्थी आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण अर्धवट सोडून देतात व मोल मजुरी करतात अश्या मुलांची समजूत घालून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मनवीसे तर्फे आज दि.५ ऑगस्ट २०१८ रोजी वारंगडे ( मान ) ता. जि. पालघर येथिल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आज करण्यात आले व त्यांना पुन्हा शैक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला . ह्या प्रसंगी मनवीसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी , उपजिल्हा अध्यक्ष धीरज गावड , उपशहर अध्यक्ष पालघर उदय माने, उपतालुका अध्यक्ष जालीम तडवी , अनिकेत पवार , विभाग अध्यक्ष तन्मय संखे , ग्रा. प.सदस्य चेतन चुरी , ग्रामस्थ किरण चुरी , राहुल चुरी , अशोक लिलका , सुनिल साने , निलेश चुरी , अतुल पाटील , संदीप भावर , अशोक धोडी , प्रणय पाटील , ज्योतेश धोडी , सागर धोडी, सत्यम मिश्रा , जिग्नेश बुरकर ह्यांसोबत कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

*पालघर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक...**"ओला दुष्काळ" जाहीर करण्याची केली मागणी*पालघर, - पूरजन्य परिस्थित...
19/07/2018

*पालघर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक...*

*"ओला दुष्काळ" जाहीर करण्याची केली मागणी*

पालघर, - पूरजन्य परिस्थितीच्या पाश्वभूमीवर
पालघर जिल्ह्यात "ओला दुष्काळ" जाहीर करा ही मागणी करीत, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर
पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वा खालील मनसे शिष्टमंडळाने आज पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शेतकरी, मच्छीमार, आदिवासी बांधव आणि सर्व सामान्य जनतेचे विविध प्रश्नांवर प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी पालघर आणि मनसेचे शिष्टमंडळ यांच्यात विस्तृत चर्चा झाली. स्थानिक कामगार भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करावी, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, जिंदाल बंदर, मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्ग या विनाशकारी प्रकल्पामुळे सर्वसामान्य जनता, भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी बांधव देशोधडीला लागणार असल्याने, अशा विनाशकारी प्रकल्पास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तीव्र विरोध असल्याचे आज पुन्हा जाहीर केले.

तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नवीन पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रकल्प ग्रसतांना लाभ व रोजगार दिला गेला नाही. ३ व ४ अणुऊर्जा प्रकल्पातून नोकरीसाठी कॉल येतात पण प्रकल्पग्रसतांना नोकरीत मुद्दाम डावलुन त्या ऐवजी परप्रांतीयांना नोकरीत सर्रास सामावले जात असल्याची गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांचा निदर्शनास आणून दिली.

रेशनिंग मधील धान्य पुरवठ्यात मोठया प्रमाणात होत असलेला काळा बाजार व दलालांची घुसखोरी रोखून कायदेशीर कारवाई करणे बाबत मागणी केली. आदिवासी "उत्थान पॅकेजची योग्य अंमलबजावणी करून, आदिवासी बांधवांचे स्थलांत्तर कसे रोखता येईल यावर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत असे सांगून, पालघर जिल्ह्यातील रिलायन्सच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना, २०१३ भूसंपादन कायद्या नुसार बाजार भावाच्या उच्चतम मूल्यानुसारच नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.

परंतु, रिलायन्स कंपनीने मनमानीपणे आणि मुजोरपणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दर दिला असून, एकाच गावात भिन्न भिन्न दर दिले गेलेले आहेत या बाबत आपण अत्यंत गंभीरपणे याचा जाब संबंधितांना विचारणे गरजेचे आहे. जेणेकरून, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा मनसे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

जिल्ह्यातील प्रलंबित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्‍न मच्छीमार संस्थांना वीज अनुदानात वाढ करणे, मच्छीमार संस्थांना उद्योगात न मोडता शेतीमध्ये घेणे यासम मच्छीमार बांधवांचे विविध प्रश्न व त्यावर उपाययोजना त्वरित कराव्यात या बाबत विनंती करून, स्थानिकांच्या उप जिवीकेचे साधन असलेला रेती व्यवसाया बाबत आपल्या स्तरावर योग्य धोरण राबवील्यास स्थानिकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पालघरच्या जिल्हा प्रशासनाने गाजावाजा करीत रोजगार मेळावा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले याचा जाब विचारीत, जिल्हा प्रशासनाने स्थानिक बेरोजगारांची फसवणूक केली असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.

मूलभूत नागरी सोयीसुविधा आणि पायाभूत सोयीसुविधांच्या उपाययोजनेवर आपले प्रशासन जर गंभीर नसेल, तर मनसे आता आक्रमकरित्या प्रश्न हाताळणार असल्याचे मनसे शिष्टमंडळाने जाहीर केले.

मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील भात पिके पाण्याखाली गेल्याने पेरण्या कुजून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे पावसामुळे दोन ते तीन वेळा वाहून गेले. त्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला असून, त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे विदारक चित्र स्पष्ट करून, पालघर जिल्ह्यातील हवालदिल बळीराजाच्या पुनर्वसनासाठी येत्या सात दिवसांत "ओला दुष्काळ" जाहीर करून, बळीराजासाठी विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे या प्रकारची आग्रही आणि प्रमुख मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी आणि मनसे शिष्टमंडळ यांच्यात साधक बाधक चर्चा होऊन, नुकसान झालेल्या भात पिकाचे आणि नुकसानग्रस्त सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला दिले असल्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. तसेच, स्थानिक बेरोजगारांबाबत लवकरच एक बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच, विविध प्रकल्पांना मनसेचा असलेला विरोध सरकार स्तरावर कळविण्यात येईल व या बाबत योग्य ती दखल घेण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरेंनी दिली. जनतेचे प्रश्न आपल्या समोर मांडून, या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशिलपणे व नैतिक जबाबदारीने कामे पार पाडावीत अशी रास्त अपेक्षा पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी यावेळी व्यक्त केली.

पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वा खाली मनसे शिष्टमंडळासोबत उपजिल्हाध्यक्ष अनंत दळवी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, वाडा तालुकाध्यक्ष कांती ठाकरे, तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत, पालघर शहराध्यक्षा गीता संखे, मनवीसे उपजिल्हा अध्यक्ष धीरज गावड, वाडा तालुका सचिव देवेंद्र भानुशाली, उपतालुका अध्यक्ष मंगेश घरत, चेतन संखे, शिवाजी रेंबाळकर, विशाल जाधव विभाग अध्यक्ष विजय अतकरी, वैभव घरत, वैभव किणी, पालघर शहर सचिव शैलेश हरमळकर, उपशहर अध्यक्ष उदय माने, मनवीसे बोईसर विधानसभा सचिव विजय गांगुर्डे, मनवीसे तालुका अध्यक्ष धीरज पाटील, मनवीसे बोईसर शहर अध्यक्ष ललितेश संखे, मनविसे विभाग अध्यक्ष वैभव नाईक, तन्मय संखे, विनायक कोळस्कर, रत्नदीप एडवनकर, गणेश घोलप, आकाश भोईर, सुनिल पाटील, नयन पाटील, रत्नदीप पाखरे, सुनिल निकम, मंगेश बोरकर, सौरभ संखे यासंह जिह्यातील महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

02/07/2018

पुणे : 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यानाचं' उद्घाटन प्रसंगी मा. राजसाहेब म्हणाले कि, "मी हे अभिमानाने सांगतो कि माझे सर्व नगरसेवक उत्तम काम करतात."
हा बडेजाव नाही तर हे वास्तव आहे.

नवी मुंबईतील नगरसेवकांना विनंती आहे, कि त्यांनी पुणे कात्रज येथे जाऊन मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी १२ वर्षात जे काम त्यांच्या प्रभागात केलय त्याची माहिती घ्यावी, त्याचा अभ्यास करावा. या चित्रफितीत सहा महिन्यात उभं केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यानाचा उल्लेख आहे.

१२ वर्षात जर एखादा विरोधी पक्षातील नगरसेवक एवढं प्रचंड काम उभे करू शकतो. तर नवी मुंबईतील सत्ताधारी नगरसेवक काम करण्यात का अपयशी ठरतात हा प्रश्न आहेच.

*१४जून मा.राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस एक असा नेता ज्याच्याकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे निश्चित ध्येय आहे. महाराष्ट...
14/06/2018

*१४जून मा.राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस एक असा नेता ज्याच्याकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे निश्चित ध्येय आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी तरूणांना,शेतकरी बांधवांना ईथल्या मराठी व्यावसायिकांना,मराठी उद्योजकांना कायमच पाठींबा देणारं महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व आपले विचार परखडपणे मांडणारा मराठी मनाचा हा नेता राजसाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी ७० वर्षाचे आजोबा ते ५ वर्षांचे लहान मुले ही आतुर असतात. निवडणुकी पुर्वी जाहीरनामे न मांडता ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन महाराष्ट्राचा विकास कृती आराखडा जनतेसमोर मांडणारा विकासाचे,नवनव्या कल्पना, अशा अनेक विविध क्षेत्रातील विविध विषयांवर अभ्यास करणारा माझाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचे एकमेव आशास्थान मा. राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!आई जंगदबा तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!!*
*म्हणूनच मा.राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण ही मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील व्हा..आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य होऊ ईच्छित असाल तर कृपया* *www.maharashtrasainik.com या संकेतस्थळावर नोंदणी करून सभासद व्हा.*
अथवा ९२११७८७७७७ आपले नाव आपल्या शहराचे जिल्ह्याचे नाव एस.एम.एस व्दारे पाठवा*
*मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील व्हा!*

13/06/2018

*मनसे जिल्हा मेळावा 2018*

महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना पालघर जिल्हा मेळावा शुक्रवार दि.१५ जून २०१८ रोजी पालघर येथील लायंस क्लब हॉल येथे दू. ०३:०० वा आयोजित केला आहे.
राजसाहेबांचा पालघर दौरा पार पडल्या नंतर मागील महीना भरात पक्षांतर्गत खुप काही घडामोडी घडल्या,परंतु साहेबांनी पक्ष बांधनी सम्बंधी काही ठोस निर्णय घेतले. जिल्हा आणि तालुका स्तरीय नियुक्तया ही केल्या, त्याच विषया ला अनुसरुन पक्ष संघटन मजबूत करने हेतुने रिक्त असलेली पदे नियुक्ति नियोजन,पक्ष प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या सभासदाना मार्गदर्शन आणि मनसैनिकांचे मनोबल ऊँचवन्या साठि ह्या जिल्हा मेळावा चे आयोजन साहेबांनी पुन्हा एकदा जबाबदारी दिलेले नवनिर्वाचित पालघर लोकसभा अध्यक्ष श्री कुंदन संखे यांनी केले आहे .तरी आपण सर्वानी मोठ्या संखेने उपस्थित रहावे ही विनंती.

समीर मोरे
अध्यक्ष, पालघर तालुका
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

*महाविज वितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात मनसेचे ठिय्या आंदोलन*  *पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला  भेडसावणाऱ्या वीज ...
13/06/2018

*महाविज वितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात मनसेचे ठिय्या आंदोलन*

*पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या वीज प्रश्नांवर मनसे आक्रमक*

पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, व्यापारी, गृहिणी, शेतकरी, लघुउधोजक यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या वीज वितरण सेवेचा अक्षरशः बोजवारा उडालेला असून जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत वेळी-अवेळी होणार खंडित वीज पुरवठा, लोंबकळनाऱ्या वीज वहिनी, जीर्ण झालेले खांब, निकामी ट्रान्सफार्मर बदलण्यास लागणारा वेळ, चुकीची बिले, रिडींग न घेता पाठविण्यात येणारी बिले, आदिवासी ग्रामीण भागात झालेली विदारक परिस्थिती, अर्ज करूनही वीज मीटर न मिळणे अश्या अनेक प्रश्नांवर मनसेचे पालघर लोकसभा जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे ह्यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता ह्यांच्या कार्यालयात भेट घेतली, ह्या चर्चे करीता अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता, तालुका निहाय सहाय्यक अभियंता व प्रमुख अधिकारी उपस्थित होते चर्चे दरम्यान उडवा उडावी ची उत्तरे मिळताच मनसे आक्रमक होऊन त्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले व सर्व संबंधित अधिकाऱ्याना जमिनीवर बसवून चर्चा करण्यास भाग पाडले. तलासरी, डहाणू , वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा सोबत शहरी भागातील बोईसर, पालघर येथील विविध समस्यांवर चर्चा झाली. अधीक्षक अभियंता ह्यांनी सर्व समस्या जाणून ह्यावर लवकरात लवकर जातीने लक्ष घालून आपल्या अधिकाऱ्या आदेश देतो असे लेखी आश्वासन दिले ह्यावेळी मनसेचे पालघर लोकसभा जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, उपजिल्हा अध्यक्ष अनंत दळवी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाअध्यक्ष भावेश चुरी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, डहाणू तालुका अध्यक्ष उमेश गोवारी, जव्हार तालुका अध्यक्ष गोपाळ वझरे, तलासरी तालुका अध्यक्ष सुनील ईभान, वाडा तालुका अध्यक्ष क्रांतीकुमार ठाकरे, तालुका सचिव देवेंद्र भानुशाली, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत, महिलासेना पालघर शहर गीता संखे, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष धीरज गावड, उपतालुका अध्यक्ष चेतन संखे, शिवाजी रेंबाळकर, सागर शिंदे, राजेश इभाड, रवींद्र जाधव, दिलीप सांबरे, प्रवीण रावरे, विभाग अध्यक्ष विजय अतकरी, वैभव संखे प्रकाश चापके, नारायण डबके, उपशहर अध्यक्ष पालघर उदय माने, रत्नदीप पाखरे, हेमंत घोडके, विजय कचरे, विद्यार्थी सेना बोईसर शहर अध्यक्ष ललितेश संखे, विभाग अध्यक्ष तन्मय संखे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13/06/2018

BLOG – ‘दगलबाज’ राज!

प्रबोधनकार ठाकरे यांची एक अत्यंत गाजलेली पुस्तिका आहे. १९२६मध्ये प्रकाशित झालेल्या त्या पुस्तिकेचं शीर्षक आहे – ‘दगलबाज शिवाजी’. या शीर्षकामुळे त्याकाळी वाद झाला होता. पुढे ‘माझी जीवनगाथा’ या आपल्या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी या शीर्षकामागची भूमिका सांगताना लिहून ठेवलंय की, ” (महाभारतातला) अर्जुन ‘बगलबाज’ होता. कर्तव्याला बगल मारून (रणांगणातून) पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’. दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले? ”

हा किस्सा आठवायचं कारण इतकंच की, काल शिवाजी पार्कच्या जाहीर सभेतलं राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे त्यांच्या इरसाल मुत्सद्देगिरीचा नमुनाच होता. एका बाजूला- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन गुजरातचा विकास-पाहणी दौरा करणारे राज ठाकरे, २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींना राजकीय पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे आणि दुस-या बाजूला काल शिवाजी पार्कवर जमलेल्या लाखांच्या जनसमुदायासमोर बोलताना ‘मोदीमुक्त भारतासाठी सर्वच्या सर्व विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन करणारे राज ठाकरे पाहून राजकीय पंडित पण अवाक झाले असतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत असं जाहीर वक्तव्य करणारे राज ठाकरे ‘मोदीमुक्त’ भारताची जाहीर घोषणा करण्यापर्यंत कसे बदलले, का बदलले या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच कालच्या त्यांच्या तब्बल एक तास २० मिनिटांच्या भाषणात दिली आणि विशेष म्हणजे त्यांची ही संपूर्ण मांडणी ठोस अभ्यासावर, निरीक्षणांवर आधारित होती. एरवी पुरोगामी वर्तुळातच ज्या विषयांवर-मुद्द्यांवर चर्चा होताना दिसते, ते मुद्दे राज यांनी प्रथमच राजकीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आणले. त्यामुळेच कदाचित, त्यांच्या वैचारिक विरोधकांनाही त्यांची ही मांडणी भावल्याचं (समाज माध्यमांमध्ये) दिसतंय.

पत्रकार निरंजन टकले यांनी शोधपत्रकारिता करुन देशापुढे आणलेलं जस्टिस बी. एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समाजस्मृतीतून विस्मरणाच्या वाटेवर असतानाच या प्रकरणाच्या खटल्यासंबंधीची अत्यंत वेगळी व महत्वाची माहिती राज यांनी मांडली. “जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांची बदल्या केल्या” ही राज यांनी उघड केलेली बाब निश्चितच खळबळजनक आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेला स्वत:च्या मुठीतच ठेवू इच्छिणा-या सरकारचं राक्षसीरुप दाखवणारी आहे. हुकूमशाही मनोवृत्तीचं मोदी-शहांचं नेतृत्व आणि भाजपचं सरकार गेली चार वर्षं न्यायव्यवस्था तसंच पत्रकारिता या लोकशाहीच्या दोन स्तंभांनाच धडका देत असल्याचं सांगायलाही राज विसरले नाहीत. मोदी-शहा ही जोडी हिटलरच्या प्रचारतंत्राचा वापर करत असल्याचं फक्त सांगून राज थांबले नाहीत, तर त्यांनी त्याची अनेक उदाहरणंही दिली.

भारतात जन्माला येऊन कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारणारा अभिनेता अक्षयकुमार याच्या पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमांना भाजपने आर्थिक पाठबळ पुरवल्याचं उदाहरण यासंदर्भात खूप महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या काही पत्रकारांवर सरकारी यंत्रणांकडून टाकला गेलेला दबाव याबाबतही राज ठाकरे बोलले. मीडियाला नियंत्रित करण्याचं भाजप सरकारचं धोरण स्पष्ट करताना राज य़ांनी “मेट्रोच्या विरोधात कोणत्याही बातम्या द्यायच्या नाहीत असे सक्त आदेश आहेत असं मला काही पत्रकारांनी सांगितलं” असंही बेधडकपणे सांगून टाकलं. भाजप सरकार केवळ मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत नाहीए तर, जनतेला सरकारी माहिती उपलब्धच होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत असल्याचंही राज यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं ते बेरोजगारांच्या नोंदणीचं. बेरोजगारांची नोंदणीच करायची नाही असा आदेश केंद्र सरकारने काढल्यामुळे नक्की किती बेरोजगार आहेत याचा आकडा कधीच कळणार नाही, असं राज म्हणाले. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या घोषणा – आश्वासनं देणा-या सरकारचं पितळ उघडं करणारा हा मुद्दा आहे.

मंत्रालयात आत्महत्या करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची केसस्टडी मांडत राज यांनी राज्यातील शेतजमीन विक्रीतील दलालांचा भांडाफोड केला. वसईतील वनजमिनींवर हजारो अनधिकृत चाळी बांधणा-या परप्रांतीयांच्या रॅकेटचाही त्यांनी पुराव्यांसह उल्लेख केला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंवर टीका करताना आपलं कोणतंही टीकास्त्र वाया जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता राज यांनी कालच्या भाषणात घेतली. नोटबंदी, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या फसव्या घोषणांपासून ते ५५० कोटींची राफेल विमानं खरेदी करण्यासाठी १६०० कोटी रुपये मोजणा-या भाजप सरकार आणि अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप यांचं साटंलोटंपर्यंतच्या अनेक गोष्टींचा राज यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला, पण खरा राजकीय षटकार ठोकला तो राममंदिराच्या मुद्द्यावरुन नजीकच्या भविष्यात देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा भाजपचा डाव आहे, हे सांगून. “राम मंदिर मलाही हवंय, पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झालं तरी चालेल”, हे राज यांचं म्हणणं त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची साक्ष देणारं आहे. भाजपचं बनावट धर्मांध राजकारण आणि कांग्रेसची बेगडी धर्मनिरपेक्षता या दोन्हींपेक्षा माझी भूमिका वेगळी असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न राज यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करुन राज थांबले नाहीत, काँग्रेसविरोधात मोदींनी ज्या प्रतिमांचा वापर केला त्या प्रतिमांना मराठी समाजमनातून उखडून टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पंडित नेहरुंवर टीका करताना एरवी भाजपसह देशातील समस्त उजव्या राजकीय पक्षांना जवळचे भासणारे आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल हेसुद्धा महाराष्ट्रविरोधी होते, असा मुद्दा राज य़ांनी आचार्य अत्रेंच्या अग्रलेखाचा हवाला देऊन मांडला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी नेहरूंवर वल्लभभाई पटेलांचा दबाव होता, असं सांगत “जी मुंबई गुजरातच्या हातातून गेली ती परत मिळवण्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प आहे”, अशी मांडणी करत राज यांनी बुलेट ट्रेनला असलेला त्यांचा विरोध पुन्हा एकदा ठामपणे अधोरिखित केला.

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना इंदिरा गांधींच्या काँग्रेसविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करताना दुस-या स्वातंत्र्याची हाक दिली होती. १९७७मध्ये आलेलं जनता सरकार हे जेपींच्या नवनिर्माण आंदोलनातून जन्मलेलं होतं. त्यानंतर ४२ वर्षांनी मोदींच्या भाजप सरकारविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन करत तिस-या स्वातंत्र्याची हाक राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या या हाकेला इतर पक्ष प्रतिसाद देतील का? २०१९मध्ये खरोखरच भाजपचा पराभव झाला तर त्याचं श्रेय राज ठाकरेंना मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक मात्र निश्चित की, देशातले वारे नेमके कोणत्या दिशेला वाहताहेत हे ओळखण्यात ‘दगलबाज – डिप्लोमॅट’ राज ठाकरे पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत.

– कीर्तिकुमार शिंदे, दै.लोकसत्ता

Address

At/post/manor Tal/palghar, Maharastra
Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर पूर्व तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share