06/03/2024
प्रा. कॉम्रेड रणजित परदेशी सर काल अनंतात विलीन झाले.आज त्यांचा जन्मदिवस आज ८० वय पूर्ण केले.कालच्या प्रसंगी महाराष्ट्रातून रातोरात प्रवास करून कार्यकर्ते आले त्यात कार्यकर्त्या पेक्षा आपला बाप,भाऊ गेल्याची भावना होती.महिला कार्यकर्त्या नी हंबरडा फोडला.त्यात दिशा पिंकी शेख पासून सगळ्याच होत्या.रक्ताच्या नात्या पेक्षा ही नाती खरी खुरी असतात.खर म्हणजे पारंपरिक संसार करण्याचा सरांचा पिंड नव्हता.हा भला मोठा संसार त्यांनी उभा केला.काही लोक व्यक्तिगत आयुष्यात नीट घडी बसवन म्हणजेच आयुष्याची इतिकर्तव्य मानतात किंवा पूर्णत्व आल अस मानणारे भेटतात.पण ज्यांनी हा भला मोठा परिवार उभा केला,म्हंजे तो फक्त मित्र परिवार नाही तर महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात ज्या बुध्द,मार्क्स,फुले,आंबेडकर ह्यांचे विचाराचा जागर करणारी एक पिढी घडवली तीच पिढी आज जात,धर्म,भांडवलदारी विचारसरणीशी सांस्कृतिक संघर्ष करीत आहे,नवीन कार्यकर्ते घडवीत आहे.रणजित सरांनी हा फुलवलेला मळा आज राज्याच्या सांस्कृतिक,वैचारिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करीत आहेत. स्वतंत्रता सैनिकाचा जो जजबा आहे तो मी सरांच्या मध्ये १९७७ पासून पहात आलो. माझ्या त्यावेळेच्या मतावर आजही मी कायम आहे. सरांनी अनेक कार्यकर्ते तयार करताना अनेकांचे पोषण केलं.घर बसवून दिले.अर्थात सगळ्याच लाभार्थींची ती लायकी असतेच असे नाही.त्यातील अनेक जण वेगवेगल्या क्षेत्रात गेले ते हा संस्कार घेऊन गेले तर काहींनी नमाक हरामी केली,काही किंचित कौटोंबिक परीस्थीतीच चूकच मूल्यमापन करतात.काहींनी तर सरांच्या वारस्याच्या नावावर चांगभल करून भाजप संघाशी चुंबाचुबी केली.काहींनी फसवणूक केली पण सरांनी सर्वांना सारखेच प्रेम दिलं,त्याचं पहिलं प्रेम हे चळवळच राहील. माझी शेवटची भेट मालेगावला १४ जानेवारीला झाली. सर तेच बोलत होते आपल्याला बसून लिहावं लागेल,आपल्या सगळ्या युनिटला सोबत घेऊन करू इ.त्यांना बोलायला त्रास होत होता तरी त्यांना बोलायचे होते,सांगायचे होते,हा आपल आयुष्याचं दान चळवळी साठी अर्पण करणारा मी पाहिलेला शेवटचा माणूस म्हणजेच रणजित परदेशीसर! खर म्हणजे दरवर्षी मी फोन करून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असे! आता फक्त क्रांतिकारी अभिवादन करू शकतो!
- Jaywant Khadtale ,नाशिक