02/06/2026
एका गावात स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर होते, तिथे त्यांचा एका भक्त रोज त्यांचे दर्शन करायला येत असे, मनोभावे भक्ती करून दर्शन घेऊन तो तिथून त्याच्या पुढच्या कामाला लागत असे.
पावसाळ्याचे दिवस होते, गुरुवार होता, स्वामी भक्त संध्याकाळ च्या वेळेस मंदिरात नेहमी प्रमाणे दर्शना साठी आला...
जोरदार पावसामुळे नदीला पूर आला अचानक गावात पाणी शिरले, पाण्याचा स्तर गुडघ्यापर्यंत आला, तात्काळ गावातील सगळे लोकं गावा बाहेर जायला लागले, काही समाजसेवक मंदिरा जवळ आले आणि त्या भक्ताला म्हणाले चला लवकर पाणी वाढत चालले आहे... त्यावर त्या भक्ताने त्यांना सांगितलं कि तुम्ही जावा मला माझे स्वामी वाचवतील... 🙏🏻 त्यावर त्या लोकांनी त्याला अनेक विनवण्या केल्या आणि मंदिरा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो काही बाहेर आला नाही अन ते पाहून ते लोकं तेथून निघून गेले...
आता हळूहळू पाणी वाढलं आणि पाणी मंदिराच्या छता पर्यंत आल..
तो भक्त मंदिराच्या छतावर जाऊन बसला तेवढ्यात तिथे एक बचाव कार्याची बोट आली, त्यांनी त्या भक्ताला मंदिराच्या छतावर बसलेले पाहिलं आणि त्याला आवाज देऊन बोटीत बसण्यास सांगितले असता तो त्यांनाही बोलला की तुम्ही इथून जावा मला माझे स्वामी वाचवतील...
हे उत्तर ऐकून बचाव कार्यातील लोकांनी त्याला पुन्हा विनवणी केली आणि सांगितले आता पाण्याची पातळी अजून वाढणार आहे त्यामुळे तुझा जीव जाऊ शकतो तू कृपया करून बोटीत बस... त्यावर त्या भक्ताने त्यांना पुन्हा तेच उत्तर दिले आणि त्यांना तिथून जाण्यास सांगितले आणि नाईलाजाने ते बचाव कार्यतील लोक तिथून निघून गेले 🙄
पाण्याची पातळी हळूहळू वाढून मंदिराच्या काळजापर्यंत आली, आणि तो भक्त मंदिराच्या कळसावर जाऊन पळसाला घट्ट धरून बसला.
थोड्याच वेळात तिथे एक बचाव कार्याचे हेलिकॉप्टर आले आणि त्या लोकांनी त्या भक्ताला वरून इशारा करत खाली एक रस्सी सकट एक जवान त्याला वर उचलून घेण्यासाठी उतरवीला... तर त्या भक्ताने त्या जवानालाही तिथून निघून जाण्यास भाग पाडले आणि त्याला सांगितले की तुम्ही जा मला माझे स्वामी वाजवतील...
जास्त वेळ त्या परिस्थिती त संघर्ष करता येत नसल्याने ते बचाव कार्याचे हेलिकॉप्टर तिथून निघून गेले....
आता पाण्याची पातळी वाढली आणि दुर्दैवाने त्या भक्ताचा बुडून मृत्यू झाला... 🙏🏻
तो भक्त स्वर्गात स्वामी समोर आला... आणि त्याने स्वामींना ओरडून रागवून मोठ्या आवाजात बोलून तावतवाने... मी तुमचा भक्त असून एवढी भक्ती करून ही तुम्ही मला का नाही वाचलं अशी विचारणा केली... 😞
त्यावर स्वामींनी त्याला शांतपणे सांगितलं की ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढून गुडघ्यापर्यंत आली त्यावेळेस गावातील लोकांच्या आधी तुला बाहेर काढण्यासाठी जी माणसं पाठवली होती ती मीच पाठवली होती.... त्यांना तू तुज्या मूर्ख पणा मुळे हाकलून दिलं.... तेवढं होऊन ही... मी नंतर एक बोट पाठविली त्यांना ही तू तुझ्या जिद्दी स्वभावाने परत पाठवून दिलंस... ते ही मी माफ करून नंतर तुझ्यासाठी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवलं, त्या दुसऱ्या व्यक्ती चा जीव धोक्यात घातला... तर तू त्याला ही परत पाठवून दिलंस अन तुझ्या बुद्धी ची पात्रता दाखवलीस... 🤫
तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन तुझ्यावरती आलेल्या संकटात मी तुला तीन वेळा मदत करण्याचा प्रयत्न केला पण तू तो धुडकवलास...
आता सांग बरं यात माझी काय चूक... 😊
आता वरील कथेचा अर्थ आपापल्या परीने घ्यावा 🧎🏻
बाकी तुम्हाला ही सत्य कथा कशी वाटली ही कमेंट मध्ये जरूर सांगा. 👍🏻
fans