05/03/2026
*🏵️ही पोष्ट कुणबी मराठा,ओबीसी व बहुजन समाजाने वाचायला हवी...*
===============
*🚩डोंगराला भिडणारा व त्याला एकट्याने फोडण्याची हिम्मत बाळगणारा बामसेफचा मॉंझी व शिवबाचा अस्सल जातीवंत मावळा म्हणजे ---प्रा.शिवाजीराव बाजीराव पाटील....*
================
तुम्हाला शासनकर्ती जमात व तुमची व्यवस्था या देशात निर्माण करायची असेल तर या देशातील शे.कॉस्ट,शे.ट्राईब,ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक यांच्याशी सॉंझा समझौता करावा लागेल.....एका जातीचे संघटन करुन व्यवस्थेशी टकराव घेणे म्हणजे आत्मघात करण्यासारखे होईल....अन या देशात तेच होत आहे.भारतातील प्रत्येक जात ही समस्याग्रस्त आहे....जातीय चेतनेच्या भावनेतुन एक जात दुस-या जातीला सोबत न घेता व्यवस्थेच्या विरोधात स्वतंत्रपणे लढत आहे....शेवटी परिणाम किंवा निकाल काय तर....भला मोठ्ठा भोपळा....तरीही आमचे लोक यातुन बोध घेण्यास तयार नाहीत.....
--------------------------------
*🟣बहुजन महापुरुषांची विचारधारा व तत्वज्ञानावर बामसेफची वाटचाल...*
हजारो वर्षापासुन या देशातील ब्राम्हणांनी ब्राम्हणी व्यवस्था टिकवुन ठेवण्यात यश मिळविलेले आहे.या साठी त्यांनी ब्राम्हणी धर्मग्रंथांचा खुबीने वापर केला.या ब्राम्हणी ग्रंथांच्या माध्यमातून या देशातील भोळ्या भाबड्या मुलनिवासी लोकांना बौध्दिक, सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक गुलाम बनवले.याला छेद देण्याचे काम *तथागत बुध्दांनी* प्रथमतः केले.प्राचीन व मध्ययुगीन भारतात तथागत बुध्दांचा वारसा *संत कबीर,गुरु रविदास इत्यादी बहुजन संत,चक्रवर्ती सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज व वारकरी संप्रदायातील संतांनी* चालवला.....हेच कार्य गुलाम व स्वतंत्र भारतात *म.फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर* यांनी केले...... डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हा वसा *मान्यवर कांशीराम साहेब, यशकायी डीं.के.खापर्डे साहेब व दीनाभाना साहेब* यांनी समर्थपणे चालवला.बामसेफने देशभरात केलेल्या जनजागृतीमुळे पुन्हा एकदा ब्राम्हणी व्यवस्थेपुढे ही त्रयी आव्हान उभे करण्यात यशस्वी झाली.....या मान्यवरांच्या निर्वाणानंतर ही धुरा यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम *मा.वामन मेश्राम साहेब* हे करीत आहेत.
मा.मेश्राम साहेब यांनी भारतातील शे.कॉ.,शे.ट्रा.ओबीसींच्या ६७४३ जाती व धार्मिक अल्पसंख्याकांना जागृत करुन संघटित करण्याचे काम अहर्निशपणे करीत आहेत....आता तर ब्राम्हणी व्यवस्थेचा मोठा आधारस्तंभ असलेल्या उत्तर भारतातील *क्षत्रियांना* सुध्दा जोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे या निर्माण झालेल्या संघटित शक्तीचा परिचय भारतातील प्रत्येक नागरिकाला *२२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुर येथील आर.एस.एस.च्या हेडक्वार्टर वर काढलेल्या विशाल महामोर्चाने दिला.* आज मुलनिवासी बहुजन समाजाची राष्ट्रीय पातळीवर संघटित शक्ती निर्माण करण्यात मेश्राम साहेब यशस्वी झाले आहेत.यामुळे ब्राम्हणी व्यवस्थेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
--------------------------------
*🟣छत्रपती शिवाजी महाराज,म.जोतिबा फुले ,शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुजन समाजाने ऐकले असते तर.....*
म.फुले, छत्रपती शाहू
महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १०८ वर्षाच्या चिवट संघर्षानंतर संविधानाचा जन्म झाला.संविधानामुळे ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलेल्या लोकांची हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट झाली व एका क्षणात सर्व संवैधानिक हक्क व अधिकारांमुळे गुलामीचे रुपांतर स्वातंत्र्यात झाले.पण.....?
या ७६ वर्षाच्या कालखंडात आम्ही बहुजन जागल्याच्या भुमिकेतुन झोपल्याच्या भुमिकेत गेल्यामुळे आम्हाला कोणतीही मेहनत न करता मिळालेले अधिकार हळुहळु स़ंपविण्यास आले....याचे एकमेव कारण....आम्ही *छत्रपती शिवरायांचे, महात्मा फुले,शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर* यांनी दाखविलेल्या मार्गावरुन चाललो नाहीत....*या महापुरुषांना वैश्विक रुप देण्याऐवजी जातीच्या कोंडवाड्यात कोंडत गेलो...* अन ब्राम्हणी व्यवस्थेने टाकलेल्या जाळ्यात आमच्या सकट या महापुरुषांना अडकवत गेलो.....पण समाधानाची एक बाब म्हणजे याला काहीजण अपवाद आहेत,त्यात *स्मृतीशेष बापु निकम,प्रा.शिवाजी नाना पाटील,हिरालाल नाना पाटील* या जळगाव जिल्ह्यातील बिनीच्या *मराठा कुणबी जातीच्या* कार्यकर्त्यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल.
-------------------------------
*🟣"अस्सल लाकुड,भक्कम गाठ,ताठर कणा,टणक पाठ,वारा खात,गारा गात,बाभुळ झाड उभेच आहे."!*
मा.शिवाजी नानांना या ओळी चपखलपणे लागू होतात....नानांचा जन्म *जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावात* एका शेतकरी मराठा कुणबी जातीत झाला.आज ते ८५ वर्षा़ंचे आहेत.... तरीदेखील आजही ते व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत मेश्राम साहेबांचे एकनिष्ठ व खंबीर अनुयायी म्हणून अनेक वर्ष अखंडपणे लढत आहेत....ते व्यवसायाने प्राध्यापक होते.*आजही नाना बामसेफची सहयोगी संघटना राष्ट्रीय किसान मोर्चाचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष* आहेत.त्यांना अनेक व्याधी असुनही या शिवबाच्या मावळ्याने वैचारिक व प्रबोधनाचे शस्त्र अजुनही परजुन ठेवलेली आहेत.
जळगाव जिल्ह्यातील बामसेफचे *पहिले व मातृ युनिट म्हणजे अमळनेर युनिट...* याच युनिटमध्ये नानांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली...नानांना बामसेफची ओळख करुन दिली ती *रेल्वेत कार्यरत असलेल्या बापु निकम नावाच्या मराठा कुणबी तरुणाने....* जळगाव जिल्ह्यात बामसेफची सुरुवातच अमळनेर मधुन झाली.या युनिट मध्ये अनेक जाती व धर्माचे कार्यकर्ते आजही बापु निकम यांनी लावलेली पताका दिमाखाने फडकवत आहेत.....हे पाहुन नाना या वयात याबाबतीत नशिबवान आहेत....नानांचा शब्द हा अमळनेर व जळगाव जिल्हा युनिटसाठी आजही अंतिम असतो.
-------------------------------
*🟣"अनेक आले,अनेक गेले,पण नाना तिथेचं राहिले"*
नाना अमळनेर शहरात स्थायिक आहेत.राष्ट्रीय किसान मोर्चा ही शेतक-यांच्या प्रश्नांवर लढणारी अत्यंत बुद्धिमान,लढाऊ व अभ्यासु शेतक-यांची संघटना....संघटनेच्या स्थापनेपासूनच नाना या संघटनेचे अध्वर्यू..... स्वतःच्या पेन्शनच्या रकमेतुन आंदोलन चालविणारा शिलेदार....नानांनी बामसेफच्या झेंड्याखाली अठरापगड जातीच्या लोकांना जोडले....या परिवर्तनाच्या लढाईत *काही आले,काही गेले,काही थांबुन राहिले,काही ग़ंमत पाहतराहिले....नाना मात्र तिथेचं राहिले....* महापुरुषांच्या विचारधारेवर प्रचंड विश्वास, मेश्राम साहेबांवर असीम निष्ठा,बामसेफच्या कार्यप्रणालीवर प्रचंड भरोसा, संघटनात्मक समज आणि स्वतःवरचा आत्मविश्वास यामुळे नाना जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गळ्यातील आजही ताईत आहेत.....जवळचे कार्यकर्ते आले पण आणि गेले पण....पण नाना कधीच खचले नाहीत,वाढत्या वयाचा व तब्येतीचा कोणताच परिणाम त्यांच्यावर आजही झालेला नाही.....आजही नानांची चळवळीला आर्थिक मदत थांबलेली नाही.....४२ व्या बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाला नानांनी १५०००/ रु.निधी दिला....
नानांनी राज्य, राष्ट्रीय अधिवेशन केले याची गणतीच करता येणार नाही......५ दिवसा़च्या Historical & Ideologycal cadre camp ला नाना नाहीत असं क्वचितच घडलं असेल...
=================
*🟣नाना...एक प्रतिभावंत,जातीवंत व शासकीय पुरस्कार नाकारणारा प्रतिभाशाली दर्जेदार साहित्यिक....*
नानांचे साहित्य गद्य व पद्य दोन्ही रुपात दर्जेदार स्वरुपात आहे....नानांनी एखादा प्रकाशक पकडला असता तर लाखो रुपयांची रॉयल्टी त्यांना मिळाली असती.परंतु त्यांनी त्यांचे अनेक शेती व शेतकऱ्यांसंदर्भातील ग्रंथ *मुलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट* मार्फत प्रकाशित केले.....या सर्व ग्रंथाची विक्रीची व रॉयल्टीची रक्कम *मुलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टला* मिळते.लेखकाला छदाम देखील मिळत नाही.सर्व निधी हा समाज जागृती व आंदोलनावर खर्च केला जातो.
*नानांची साहित्य संपदा-*
*१)धर्म आणि भुख(पहिला काव्यसंग्रह)*
*२)निर्भांगावली भाग १ ते १०(संपूर्ण पद्य)*
*३)निर्भांगावली-शेतक-यांच्या मुक्तीची (पद्य)*
*४)निर्भांगवली -क्रांतीज्योत(पद्य)*
*५) क्रांती माझे गाव (कादंबरी)*
*६)शिवसप्तक (ओवीबध्द कौंटुबिक व सामाजिक) ग्रंथ*
*७)मराठी दोहे*
*८)संविधान चेष्टा व कुणब्यांचा प़ंचनामा(काव्य)*
*९) भारतातील विदेशींचा धुमाकुळ*
*१०) जातीव्यवस्थेचा बळी -शेतकरी*
*११)सत्यशोधकी अभंगावली*
नानांची ही अशी साहित्य संपदा....गुलामगिरीकार महात्मा फुलेंच्या वारसदाररुपी सत्यशोधकी माळेतील एक मणी म्हणजे शिवाजीनाना....
================
*🟣"महाराष्ट्रातील बहुतांश कुणबी मराठयांनो आतातरी छत्रपती शिवरायांचे ऐका....!"*
शिवरायांनी रयतेचे राज्य रयतेच्या कल्याणासाठी स्थापन केले.रयतेला मोगलशाही व ब्राह्मणशाहीच्या मगरमिठीतुन सोडविले.ज्यांनी त्यांचा राज्याभिषेक शुद्र म्हणुन नाकारला,आयुष्यभर ज्यांच्यामुळे राजांना त्रास झाला.शिवशाहीचे रुपांतर कपटनितीने ज्यांनी पेशवाईत केले....छत्रपतींची समाधी का स्वच्छ करतोस? असा जाब म.फुल्यांना
विचारणा करणा-या ब्राम्हणी व्यवस्थेच्या हस्तकांचे मांडलिकत्व स्विकारण्यात कुणबी मराठा राजकारण्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे....छत्रपतींचं स्वप्नातील स्वराज्य संविधानात उतरवुन रयतेचं राज्य निर्माण करणा-या संविधानावर घाला घालणा-या ब्राम्हणी पक्षांसोबत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी कुणबी मराठा पुढारी धन्यता मानत आहेत.... महाराष्ट्रात लोकशाहीत दखलपात्र संख्या असतानाही कुणबी मराठ्यांच्या तरण्याबांड पोरांना पध्दतशीरपणे भिकेला लावणा-या आधुनिक पेशवाईच्या वारसदारांच्या ढुंगणाचा मुका घेण्यात धन्यता मानणा-या पुढा-यांच्या मागे कुणबी मराठा तरुण किती दिवस या दलालांच्या दावणीचा बैल होण्यात धन्यता मानणार आहे.....*जगावे तर शिवबासारखे....* असं फक्त म्हणण्याने काहीच होत नाही व होणारही नाही....*भिडे,एकबोटे सारख्या नासक्या स़ंघी पिलावळी़चे शिष्यत्व पत्करुन* स्वतःच्या आयुष्याचं व बहुजन समाजाचं वाटोळं करण्यात धन्यता मानणा-या कुणबी,मराठा, ओबीसींच्या पोरांनी आता स्वताचे धड स्वतःच्या मस्तकावरच ठेवायला हवं....
स्वतःच्या,जातीच्या व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आम्हाला *शिवाजी नाना* सारख़ंच वागावं लागेल....संघी पिलावळीला नाकारत जातीच्या पलिकडे जाऊन बहुजन समाजाला आपलसं करावं लागेल... प्रस्थापित दलाल पुढा-यांना नाकारुन शिवाजी नानांच्या पावलांवर पाऊल ठेवावं लागेल.....राजकारणात व समाजकारणात दलाली करण्याच्या अनेक संधी चालुन आल्यावरही इतर परंपरागत खाबु खानदानी पुढा-यांसारखं न वागता स्वाभिमानाने बहुजन चळवळीला उभं आयुष्य नानांनी दिलं.....*भिडे व एकबोटेंना नाकारत* नानांसारखे व त्या़ंच्या पठडीतील प्रामाणिक,निष्ठावान कार्यकर्त्यांना जर ओबीसी मराठा तरुणांनी साथ दिली असती तर आज चळवळी गरीब व दलाल गर्भश्रीमंत झाले नसते....व कुळ असलेला कुणबी समाज रसातळाला गेला नसता.अजुनही वेळ गेलेली नाही....हा शिवाजी पाटील नावाचा भिष्माचार्य आजही त्यांच्या योग्य वारसदाराची वाट चातक पक्षासारखी पहात आहे.....
बामसेफ मध्ये आजही कार्यरत असलेले असे अनेक शिवाजी पाटील महाराष्ट्रात त्या़ंच्या वारसदारांची वाट पहात आहेत....अशा त्यागी, समर्पित माणसांमागे कुणबी,मराठा ,ओबींसी तरुणांनी उभं रहावं.....दलालांना साथ न देता संविधानाचा शिपाई होऊन बामसेफ मध्ये सामिल व्हावं हीच यावेळी बहुजन समाजाच्या अस्तित्वासाठी माफक अपेक्षा.......
*🟣"नाना तुमच्या कार्यास मानाचा मुजरा!".....नाना ,मला आशा आहे, भविष्यात तुमच्यासारखे अनेक शिवाजी पाटील उद्यास येतील . हा रुतलेला व खाली आलेला समतेचा रथ हेच कुणबी,मराठा ओबीसी तरुण इप्सित स्थळी नेतील....* शिवराय,ज्योतीराय व भीमराय यांचं अपुर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करतील......
===============
*शब्दांकन*
*सुमित्र अहिरे*
(प्रधान राज्य कार्याध्यक्ष बामसेफ महाराष्ट्र राज्य)