Right to Recall Party Maharashtra

Right to Recall Party Maharashtra RRP is trying to bring 40 + laws in Bharat which can solve every problem of the country. RRPIndia.in

21/08/2026
दिल्ली जल बोर्डच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध १० फूट खोल खड्डा खणला. आणि त्यांनी तो कोणताही अडथळा न लावता तसाच सोड...
07/02/2026

दिल्ली जल बोर्डच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध १० फूट खोल खड्डा खणला. आणि त्यांनी तो कोणताही अडथळा न लावता तसाच सोडून दिला. कमल ध्यानी नावाचा २६ वर्षीय मोटारसायकलस्वार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या खड्ड्यात पडला. त्याला फोनही करता आला नाही. त्याचा मृतदेह सकाळी ८ वाजता आढळून आला.
माझ्या मते, दिल्ली जल बोर्डच्या अध्यक्षांवर खुल्या मतदानावर आधारित 'राईट टू रिकॉल' आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर ज्युरीद्वारे खटले चालवल्यास असा निष्काळजीपणा कमी होऊ शकतो.
सोगा, मोदी, रागा, आर्के यांनी नेहमीच 'आरटीआर ज्युरी'ला विरोध केला आहे. कारण आरएसएस, काँग्रेस, आपचे कार्यकर्ते 'आरटीआर ज्युरी'ला विरोध करतात.
माझ्या मते, अमेरिकेप्रमाणे लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेचा कार्यकाळ २ वर्षांपर्यंत कमी केल्यास अशा समस्या कमी होऊ शकतात. पुन्हा, आरएसएस, काँग्रेस, आपचे कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ कमी करण्यास विरोध करतात.

https://www.indiatoday.in/india/story/delhis-janakpuri-tragedy-biker-kamal-dhyani-called-friend-minutes-before-falling-to-his-death-2864473-2026-02-07

RRPIndia.in

मागील खूप वर्षांपासून आम्ही (राईट टू रिकॉल पार्टी कार्यकर्ते) मागणी करत आहोत की  #पब्लिक_मध्ये_नार्को_टेस्ट कायदा लागू व...
29/01/2026

मागील खूप वर्षांपासून आम्ही (राईट टू रिकॉल पार्टी कार्यकर्ते) मागणी करत आहोत की #पब्लिक_मध्ये_नार्को_टेस्ट कायदा लागू व्हावं.
आणि आम्ही प्रस्तावित केलेलं aka (संपूर्ण भारतीय मालकीची कंपनी म्हणजेच एक पैसा ही विदेशी नसलेली कंपनी) द्वारेच विमाने, शस्त्रास्त्रे, रडार, फायटर जेट वगैरे वगैरे सुरक्षित (परकीय शक्तींचा कंट्रोल पूर्णपणे बंद) होणार.

   प्रत्येक निवडणुकीत निवडणूक आयोग / सत्ताधारी पक्ष / सत्ताधारी वर्ग जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे मुद्दे निर्माण करतात, जे...
18/01/2026



प्रत्येक निवडणुकीत निवडणूक आयोग / सत्ताधारी पक्ष / सत्ताधारी वर्ग जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे मुद्दे निर्माण करतात, जेणेकरून जनतेचे लक्ष खऱ्या समस्यांपासून दूर जाईल.

उदाहरणार्थ, मुंबई महानगरपालिका निवडणूक (2026) मध्ये निवडणूक आयोगाने पारंपरिक अमिट शाईऐवजी (Indelible Ink) मार्कर लागू केले, इलेक्ट्रॉनिक मत मोजण्याच्या नवीन नियंत्रण PADU
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (2024) मध्ये मुद्दाम फालतू व बनावट वाद पुढे आणले गेले—100% VVPAT बॅटरी , आंशिक VVPAT मोजणीवर निवडणूक आयुक्त च्या कृत्रिम संताप, मतदार यादीतील तफावत, “लाडकी बहिण”मुळे BJP जिंकल्याचे दावे, तसेच “कटेंगे तो बटेंगे”सारखी हास्यास्पद घोषवाक्ये.

त्याचप्रमाणे बिहार विधानसभा निवडणूक (2025) मध्ये कथानक मतदार यादी व BJP कडून ₹10,000 वाटपाच्या आरोपांकडे वळवले गेले.

हे निर्मित वाद एका ठराविक हेतूसाठी असतात—

जेव्हा निकाल जनतेच्या अपेक्षांच्या विरोधात जातात, तेव्हा पेड मीडिया, तथाकथित विरोधी पक्ष, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स, यूट्यूबर्स आणि स्वयंघोषित राजकीय विश्लेषकांना पोकळ चर्चा व दोषारोपांसाठी विषय मिळावा.
प्रत्यक्षात हे बहुतेक खोट्या विरोधकांची भूमिका बजावत असतात आणि सत्य शोधण्याऐवजी कथानक व्यवस्थापन करतात.

या संपूर्ण दिशाभूल यंत्रणेचा एकच उद्देश आहे—
👉 खरे दोषी वाचवणे:
👉 EVM प्रणाली आणि
👉 तिच्या २ मूलभूत छेडछाड पद्धती.

1) 2010 मधील प्रत्यक्ष EVM हॅकिंग – इंजिनियर हरिप्रसाद वेमुला जी

2010 मध्ये हैदराबादचे निवडणूक आयोगचे इंजिनियर श्री हरिप्रसाद वेमुला जी यांनी VVPAT नसलेल्या प्रत्यक्ष EVM चे सार्वजनिकरित्या हॅकिंग करून दाखवले.
पुणे कलेक्टर कार्यालयातून मिळालेल्या खऱ्या EVM वर त्यांनी लाईव्ह डेमो देत मशीनमध्ये अनेक प्रकारे छेडछाड शक्य असल्याचे सिद्ध केले.
पुरावे इतके ठोस होते की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आणि 2013 मध्ये VVPAT लागू करण्याचे आदेश दिले.

2) 2019 मधील VVPAT पर्ची चोरी – ब्लॅक ग्लास व लाईट सेन्सर मार्फत, इंजिनियर-शास्त्रज्ञ श्री राहुल चिमनभाई मेहता जी द्वारे

2019 मध्ये IIT दिल्ली व रटगर्स विद्यापीठ (USA) पदवीधर इंजिनियर-शास्त्रज्ञ श्री राहुल चिमनभाई मेहता जी यांनी दाखवून दिले की ब्लॅक ग्लास व लाईट सेन्सर वापरणाऱ्या VVPAT युनिट्समध्ये आतून कागदी मतांची चोरी करता येते.
या पद्धतीने VVPAT पर्च्या आणि इलेक्ट्रॉनिक मतांमध्ये 100% जुळवणी साधता येते—सर्व पर्च्या मोजल्या तरीही.
म्हणजेच हा अपप्रकार पूर्णपणे ट्रेस-फ्री, फुलप्रूफ आणि न सापडणारा असतो—एकही पुरावा राहत नाही.

इतक्या गंभीर बाबी असूनही निवडणूक आयोग, सत्ताधारी पक्ष, विरोधक आणि पेड मीडिया नेटवर्क (यूट्यूबर्स व इन्फ्लुएंसर्ससह) एकसारखेच वागतात—
👉 या २ निर्णायक सत्यांना दडपणे,
👉 आणि सतत काठावरचे बनावट वाद उभे करणे.

हे अकार्यक्षमतेमुळे नाही.

हे आहे व्यवस्थित कथानक नियंत्रण—जेणेकरून संशयग्रस्त मतदान प्रणाली सुरक्षित राहील आणि खरे प्रश्न कधी विचारलेच जाणार नाहीत.

म्हणून खरे भारतीय कार्यकर्ते आणि प्रत्येक देशभक्त नागरिक यांनी या फालतू, दिशाभूल करणाऱ्या मुद्द्यांत अडकू नये आणि दोन मुख्य मुद्दे जनतेसमोर मांडावेत—
1️⃣ 2010 चे प्रत्यक्ष EVM हॅकिंग – हरिप्रसाद वेमुला जी
2️⃣ VVPAT पर्ची छेडछाड: ब्लॅक ग्लास व लाईट सेन्सर – इंजिनीयर वैज्ञानिक श्री राहुल चिमनभाई मेहता जी

यातूनच भारतातील खरा बॅलेट पेपर आंदोलन मजबूत होईल.

---

EvmHatao.com | EVM Hatao Sena
RRPIndia.in

Hindi translation of this article 👇🏿 https://www.facebook.com/share/p/17xBuYF94P/

English translation of this article 👇🏿https://www.facebook.com/share/p/1DHgb7J9Yq/

Address

Mumbai
400086

Alerts

Be the first to know and let us send you an email when Right to Recall Party Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share