02/06/2026
🚩 महत्वाची मागणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या त्यांच्या मूळ गावी विकासासाठी निधी मंजूर केला होता. मात्र तब्बल ८ वर्षांपासून कोणताही प्रस्ताव प्राप्त न झाल्याने हा निधी अद्यापही अखर्चित आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
याच पार्श्वभूमीवर भीमशक्ती विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष समाजभूषण पंकज ललितजी मेश्राम यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आंबवडे येथे आवश्यक भूसंपादन, पुनर्वसन व जागतिक दर्जाचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार आणि संघर्ष भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंबवडे येथे भव्य स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे.
जय भीम! जय संविधान! 💙
#जयभीम #डॉबाबासाहेबआंबेडकर #आंबवडे #सामाजिकन्याय #भीमशक्ती #महाराष्ट्र #संविधान #बहुजनसमाज 💙✊🏻