04/12/2021
पुन्हा एकदा झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील अनवली व कासेगाव भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश देऊन पक्षातर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी तीन लाख रुपयांची तसेच इतर शेतमालासाठी एकरी एक लाखापेक्षा अधिक मदत करावी अशी मागणी श्री. धोत्रे यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा भरपाई न दिल्यास विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व विमा कंपन्यांच्या कार्यालयावर 'खळ्ळ-फटॅक' आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला.
याप्रसंगी श्री. शशिकांत पाटील, श्री. दिलिप पाचंगे, श्री. सिद्धेश्वर गारड, श्री. अनिल बागल, श्री. कृष्णा मासाळ, श्री. महादेव मांढरे, श्री. दीपक भोसले आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
#शेतकऱ्यांची_मनसे