Aapla Kokan

Aapla Kokan आपुलकी ,जीव्हाळा आणि प्रेम ="आपल कोकण"

चिंचवली, खेड़- गावातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी मला अतिथी म्हणून आमंत्रित केल्याचा मला मान मिळाला. 🏏 लहान गा...
01/03/2026

चिंचवली, खेड़- गावातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी मला अतिथी म्हणून आमंत्रित केल्याचा मला मान मिळाला. 🏏
लहान गावांमध्ये होत असलेल्या क्रीडा उपक्रमांना पाठिंबा देणे नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो, यामुळे स्थानिक खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळते.

मुंबईमध्ये मोठ्या स्पर्धा नेहमीच भरभराटीला असतात, पण छोट्या गावांसाठी अशा स्पर्धा आयोजित करणे सोपे नसते. तरीसुद्धा इथला उत्साह आणि आनंद वेगळ्याच पातळीवर असतो. खेळाडू आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून हा क्षण अधिकच खास झाला.

सर्व संघांना मनःपूर्वक शुभेच्छा.
ही स्पर्धा आणखी अनेक तरुण खेळाडूंना मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आणि मनापासून खेळण्यासाठी प्रेरणा देओ. 🙏❤️
- Sachin Bhosle

25/05/2024

https://chat.whatsapp.com/KvNSnwigQlVEVudGsOlWDX

🙏 *पाझर फुटूद्या आपणांस माणुसकीचा.....,*
*लावूया हातभार सर्वांनी मदतीचा.......*🙏🤝🤝

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील, निसोबाचा सडा, पळसंब खालचीवाडी)* येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील युवक व आमचे जिवलग मित्र *श्री जगन जंगले (वय 31 वर्षे )* हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला *अशोकवन, चाळ क्रमांक 7, रूम नंबर 5, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व* येथे भाड्याच्या घरात राहत होते. कल्याण या ठिकाणी राहून *दादर पश्चिम येथील मॅजेस्टिक बुक सेंटर* येथे महिना १५,०००/ पगार असणारी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. *सकाळी कल्याण ते दादर व रात्री दादर ते कल्याण* असा नियमितचा प्रवास. हल्लीच *फेब्रुवारी महिन्याच्या १७ तारखेला त्यांचा विवाह* होऊन त्यांनी आपला संसार थाटला होता.

नियमितप्रमाणे जगन जंगले *22 मे 2024* रोजी आपले काम आटपून रात्री 9 वाजता दादर ते कल्याण असा लोकलने आपल्या घरचा प्रवास करत होते. ट्रेन ला प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा टवाळखोर टोळक्याने मोबाईल चोरीच्या उद्देशाने घेतला.

*ट्रेन ठाणे स्टेशनवरून कळव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून अंदाजे 200 मीटर पुढे (कळव्याच्या दिशेने ) ट्रेन खूप स्लो झाली असताना टवाळखोरांनी चोरीच्या उद्देशाने दांड्याने जोरात आघात केला. तो दांडा गेटवर उभे असलेल्या जगन जंगले यांच्या हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन ते खाली पडले. त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडले. तेथील उपस्थित लोकांनी जगन यांना लक्षात असणारा नंबर लावून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रथम कळवा येथील शासकीय रुग्णालयात नेले परंतु तेथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपचार नसल्याने ठाणे येथील प्रायव्हेट रुग्णालयात हलविण्यात आले कारण तत्काळ उपचार होणे गरजेचे होते.*
सध्या त्यांच्यावर *ठाणे पश्चिम येथील हायलंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ढोकाळी येथील खाजगी रुग्णालयात* उपचार सुरु आहेत. काल गुरुवार दिनांक 23/05/2024 रोजी त्यांच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करून दोन्ही पाय काढण्यात आले.

परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या, नुकताच आपला प्रपंच थाटलेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या एका गरीब युवकावर या वयात ओढवलेला प्रसंग हा खरंच मन हेलावणारा आहे. दोन्ही पाय गेल्याने अपंगत्व आले. कुटुंबासाठी आधार बनलेले हात कुठेतरी थांबले. अशी वेळ कोणावरही येऊ नये.

मित्रहो, परिस्थितीपुढे अगतिक असलेल्या जगन जंगले यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची गरज आहे. सध्याचा हॉस्पिटलचा खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. तसेच त्यांच्या यापुढे होणाऱ्या उपचारांसाठी देखील आर्थिक मदतीची गरज भासणार आहे.

*आपणांस कळकळीची विनंती आहे की, आपण सर्वांनी फेसबुक, व्हाट्स अप ग्रुप, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, दानशूर संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून जगन जंगले यांना माणुसकीच्या नात्याने हातभार लावावा असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.*🙏🙏


मदत खाली दिलेल्या बँक खाते किंवा गुगल पे क्रमांकावर पाठवावी.....👇🙏

*बँक तपशील*👇
Name- Mangesh Yashwant Jangale

Bank Name - State bank of india
Account no. 37297033737
IFSC - SBIN0012965

*गुगल पे क्रमांक*
मंगेश जंगले - 9768601156
तुषार जंगले -9653486856

_तुमचा एक मदतीचा हात,_
_जो देईल एका गरिबाला साथ....._
_ज्यांच्या डोळ्यात करुणा....._
_तेच जाणीती गोरगरीबांच्या_ _वेदना....._

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

21/08/2023
Tag someone who needs ♥️Contact us 9702312348
01/08/2023

Tag someone who needs ♥️
Contact us 9702312348

31/07/2023

Aapla Kokan ♥️

प्रचिती आणि परिक्रमेची एकत्रित अनुभूती…!कोकणात चित्रीकरण होत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ या मालिकेतील एका प्रसं...
26/07/2023

प्रचिती आणि परिक्रमेची एकत्रित अनुभूती…!

कोकणात चित्रीकरण होत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा’ या मालिकेतील एका प्रसंगासाठी मालिकेची टीम एका दिवसासाठी सावंतवाडी येथील वेत्ते गावी गेली होती. चित्रीकरणादरम्यान श्री देव वेतोबाच्या मूळ वेशातील रूप चित्रित करून संपूर्ण युनिट पुन्हा कोकणात मूळ सेटवर परतले. तेव्हा सर्व सामान जागच्याजागी ठेवत असताना वेतोबाची काठी सापडत नसून रात्रीचा अंधार, आऊटडोर शूट आणि कोकणातील पाऊसमुळे, काठी वेत्ते गावीच राहिल्याचे काही प्रोडक्शन वाल्यांच्या लक्षात आले. खूप पाऊस असल्याकारणास्तव दुसऱ्या दिवशी नेहमीच्या जागी चित्रीकरण सुरू करण्याआधी त्यांनी वेत्ते गाव गाठले. तेथे पोहोचताच ते अचंबित झाले. तीच काठी.. त्याच जागी…जशीच्या तशी… परंतू पूजलेली. गावकऱ्यांनी वेतोबा महाराजांची काठी…वेतोबा महाराज इथे येऊन गेले… या श्रद्धेने मनोभावे आत्मीयता वर्तवली. गावकऱ्यांचे इतके प्रेम, श्रद्धा, मालिके वरील आणि निर्मात्यांवरील विश्वास आणि आशीर्वाद पाहता क्षेत्रपाल श्री देव वेतोबानेच त्याची परिक्रमाही पूर्ण करून घेतल्याचा भास होतो.

ाठी #सोहळानात्यांचा

कोणत्याच पक्षाला मत देण्यासाठी जाऊ नका. मतदाना दिवशी मस्त फिरायला जा.कोकणची वाट लावणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा.आता कोंकणी...
20/07/2023

कोणत्याच पक्षाला मत देण्यासाठी जाऊ नका.
मतदाना दिवशी मस्त फिरायला जा.कोकणची वाट लावणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा.
आता कोंकणी जनतेचा एकच नारा. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या राज्यकर्त्यांना कोंकणात नाही थारा. कोंकणी जनतेची साथ सोडून रिफायनरीला समर्थन करणाऱ्यांची आणि कोकणाला उध्वस्त करू पाहणाऱ्यांची दुकाने बंद झालीच पाहिजे.

भारत सरकारच्या (Government of India) स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) ने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल...
12/07/2023

भारत सरकारच्या (Government of India) स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) ने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC And CBN) पदांच्या भरती जाहीर केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना Staff Selection Commission च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
४ जागांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने ही भरती जाहीर केली असून, उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर हा अर्ज भरता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२३ रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे. तर, उमेदवारांना २६ जुलै ते २८ जुलै २०२३ या दिवसांत आपल्या अर्जांमध्ये बदल किंवा चुका दुरुस्त करता येणार आहेत.
SSC MTS (Tier-I) संगणक-आधारित परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. भरती प्रक्रियेत एकूण ३ हजार ९५४ MTS पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. तर, CBIC आणि CBN मध्ये हवालदार पदाच्या सुमारे १ हजार ७५८ जागा रिक्त आहेत.
SSC MTS & Havaldar भरतीचे वेळापत्रक :
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै २०२३, रात्री ११ वाजेपर्यंत
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: २२ जुलै
ऑफलाइन चलन तयार करण्याची अंतिम मुदत: २३ जुलै २०२३ (रात्री ११ वाजेपर्यंत)
चलन भरण्याची अंतिम तारीख: २४ जुलै २०२३
ऑनलाइन अर्ज फॉर्म दुरुस्ती आणि बदल: २६ जुलै ते २८ जुलै २०२३
संगणक-आधारित परीक्षेची तारीख: सप्टेंबर २०२३

पात्रता निकष खालीलप्रमाणे :
वयोमर्यादा: CBN (महसूल विभाग) परीक्षेत MTS आणि हवालदारासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार १८ ते २५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

सीबीआयसी (महसूल विभाग) मध्ये हवालदार आणि एमटीएसच्या इतर काही पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय १८ ते २७ वर्षे असावे.
तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादा शिथिलता लागू आहे.

शैक्षणिक पात्रता:
SSC परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रतेने उत्तीर्ण केलेले असाSSC MTS आणि हवालदार भरतीसाठी परीक्षा शुल्क :
सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
महिला, ST/ST/PWD/ माजी सैनिक यांना भरती परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज :
१. SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
२. पोर्टलवर नोंदणी करा आणि लॉग इन करा,
३. त्यानंतर 'मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी परीक्षा २०२३ मध्ये 'Apply' वर क्लिक करा.

४. विचारलेल्या आवश्यक माहितीसह फॉर्म भरा.
५. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरा.
६. पूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा व्यवस्थित तपासून सबमिट करा.

महत्त्वाचे :
अर्जाची प्रक्रिया जलद, सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी आयोगाने सर्वांसना ऑफलाइन चलनाद्वारे अर्ज शुल्क भरणा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी नेट-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, BHIM अथवा UPI इत्यादींचा वापर करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने देण्यात आले आहे

1८ जुलै1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'मोरिया' या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
08/07/2023

1८ जुलै1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'मोरिया' या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

08/07/2023

श्री दत्तगुरूंच्या २७ पादुकान्चे दर्शनाचा लाभ घ्या व तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा...

श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

22/06/2023

भारतावर कोणी राज्य केले? या प्रश्नाचं उत्तर जोवर "मुघल" आणि "ब्रिटिश" हे येत राहणार तोवर आपण मानसिक दृष्ट्या गुलामगिरीतच आहोत हे लक्षात घ्या.

भारतावर नंद घराण्याने राज्य केले, शुंगांनी केले, मौर्यांनी केले, महामेघवाहन, गुप्त, चोल, पल्लव, कदंब, चेर, पांड्या, सातवाहन, यादव, शिलाहार, विजयनगर, राष्ट्रकूट, चालुक्य, सोळंकी, जाट, राजपूत, बुंदेले, आहोम, शीख आणि मराठ्यांनी राज्य केले हे आपण येत्या पिढ्यांच्या मनावर ठसवत नाही तोवर ही मानसिक गुलामगिरी जाणार नाही.

ही मला लक्षात आली तितकीच नावं. भारतभर अशी शेकडो लहानमोठी इतर राज्ये - साम्राज्ये होती. महाभारतात ज्या ज्या राज्यांचा उल्लेख आहे त्यांचे अस्तित्व खरंच होते. कुरु, पांचाल, मगध, मत्स्य, कलिंग, गांधार, कठ, मल्ल, किरत, अंग ही राज्ये अस्तित्वात होती. आपण यांना केवळ महाकाव्य म्हणून बाजूला सारू शकत नाही.

माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बरोबर काम करणारी एक छोटू (जी कॉलेजमधून जेमतेम दीड दोन वर्षांपूर्वी बाहेर पडली आहे) काही दिवसांपूर्वी गप्पा मारत होतो. गप्पांचा रंग किंचित "वाद" नामक प्रकाराकडे झुकू लागला. अखेर तिला विचारलं "मला पाच मुघल बादशहांची नावे सांग". मग अडखळत अडखळत जरा आठवत दोन मिनिटांनी तिने बाबर ते औरंगजेब असा खडतर प्रवास पूर्ण केला. तिला म्हणालो आता विजयनगरच्या तीन राजांची नावं सांग. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. म्हणालो बरं एका राजाचं नाव सांग. तिने नकारार्थी मान हलवली. तिला विचारलं "बाहेरून आलेले मुघल तुला सांगता येतात आणि याच मातीमधल्या एका बलाढ्य आणि सोन्याचांदीच्या नद्या वाहव्यात इतकं श्रीमंत साम्राज्य कोण चालवत होतं त्यातल्या एका राजाचं नाव माहीत नाही?" ती पटकन म्हणाली "पण आम्हाला जे शिकवलं ते लक्षात आहे. विजयनगर हे नाव माहिती आहे पण राजे वगैरे माहीत नाहीत."

यात तिची चूक नाही. आपणच आपल्या पिढ्यांना मुघल एके मुघल आणि मुघल दुणे ब्रिटिश शिकवलं त्यामुळे ही पिढी तयार झाली आहे. आपल्याला मुघल, ब्रिटिश वगैरे इतिहास दडपण्याची काहीच गरज नाही तो आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. प्रश्न त्यांच्या बरोबरीने इथल्या मातीत किती प्रचंड साम्राज्य उभी राहिली, उन्नतीस चढली आणि ध्वस्त झाली हे सांगणे आवश्यक आहे. "भारताचा आणि हिंदूंचा इतिहास हा आक्रमणांचा आणि पराभवांचा इतिहास आहे" ही पराभूत मानसिकतेतून आलेली न्यूनगंडाची खोल रुजलेली भावना मनातून उपटून फेकून देणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर -

जो जो मागे आला आसुर,
शक्तीच्या की भरावरी,
भारतीय यज्ञाश्व नाचला,
त्याच्या त्याच्या उरावरी।

कोठे आज ते शक वा बर्बर?
बाल्हीकही वा हूण कुठे?
भारत जठराग्नीत जळोनी,
भस्म जाहले द्रुत ते - ते।

- सौरभ वैशंपायन.

Address

Mumbai
400063

Telephone

09702312348

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aapla Kokan:

Share