02/05/2026
आज केंद्र सरकारकडून “Cell Broadcast – Indigenous Technology” या आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी घेण्यात आली. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त प्रणाली असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत तात्काळ सूचना पोहोचवण्यासाठी तिचा मोठा उपयोग होणार आहे, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
मात्र, महाराष्ट्र राज्यात ही सूचना सुरुवातीला इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये (तमिळ/तेलुगू) प्राप्त झाली आणि त्यानंतर मराठी भाषेत आली. महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख व स्थानिक भाषा असताना, अशा आपत्कालीन सूचनांमध्ये सुरुवातीलाच मराठी भाषेला प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना माहिती त्वरित व स्पष्टपणे समजणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे संबंधित राज्यातील स्थानिक भाषेतच प्रथम संदेश पाठवणे अधिक परिणामकारक ठरते.
1. प्रत्येक राज्यात संबंधित स्थानिक भाषेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
2. त्यानंतरच इतर भाषा (हिंदी/इंग्रजी) यांचा समावेश करण्यात यावा.
3. प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यनिहाय भाषिक प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा होता.
आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
CMOMaharashtra
PMO India