02/12/2024
*निवडणुकांतील धांदली ही देशातील गरिब मतदारांचा निवडणुक प्रक्रिया आर्थात लोकशाहीवरील विश्वास कमजोर करण्यासाठीचा सत्ताधा-यांचा कुटील डाव! - प्रा.व्यंकटेश कसबे (राष्ट्रीय अध्यक्ष, बीबीपी)*
बहुजन भारत पार्टीच्या वतीने निवडणूक लढणाऱ्या स्वाभिमानी उमेदवारांच्या गौरव कार्यक्रमांचे विभागवार आयोजन.
दि. 01 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने बहुजन भारत पार्टीची ऑनलाइन समीक्षा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राच्या विविध विभागातून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सामील झाले होते. एड. पांडुरंग खिल्लारे (प्रदेश सचिव, हिंगोली), एड. सुभाष नाडे (कायदेशीर सल्लागार, संभाजीनगर), श्री. पवनकुमार मळगे (चिक्कोडी, कर्नाटक), श्री. लक्ष्मण शेलार (प्रदेश सचिव, संभाजीनगर), डॉ. एच पी बोयाळे (प्रदेश सचिव, नांदेड), श्री विष्णू कासारे (मुंबई प्रभारी), श्री राजू शिंदे (संभाजीनगर जिल्हा महासचिव), श्री अमोल चव्हाण (लातूर जिल्हा प्रभारी), श्री अरुण गोटमुकले (लातूर जिल्हा सचिव), श्री अनिल खडसे (हिंगोली जिल्हाध्यक्ष), इत्यादी प्रमुख पदाधिका-यांसह श्री सोपानराव पाटोडे (हिंगोली) श्री भास्कर बंडेवार (उदगीर आणि लातूर शहर) श्री सुभम अडागळे (शिवाजीनगर), डॉ. जानु मानकर (ठाणे), श्री आकाश तिवडे (सांगली) इत्यादी प्रमुख विधानसभा उमेदवार व पक्षाच्या समर्थकांनी बैठकीत आपली समीक्षात्मक मनोगते व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या मनोगतात भारतीय निवडणुकीला सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या विकृत स्वरूपावर चिंता व्यक्त केली. बेहिशोबी पैशाचा मतदारावर तुफान भडीमार, ईव्हीएमची छेडछेडी करून छोट्या मोठ्या पक्षांची सत्ताधारी उमेदवारांनी विशेषता भाजपाने चोरलेली मते या सर्व बाबींचा संदर्भ घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे यांनी या बैठकीत स्पष्ट केले की, "निवडणुकांतील ही अनागोंदी भाजप आणि काँग्रेस यांच्या संगणमताने चालू आहे. त्यांचा प्रमुख उद्देश हा सर्वसामान्य बहुजन मतदारांचा निवडणूक प्रक्रिये वरील आणि पर्यायाने लोकशाही वरील विश्वास उडून जावा आणि हातबल पणे त्यांनी एकपार्टीच्या नेतृत्वातील लोकशाही सुदृश्य हुकूमशाहीला मान्यता द्यावी हाच आहे. तसे नसते तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तात्काळ ईव्हीएम आणि निवडणुकीतील अनागोंदीच्या विरोधामध्ये देशव्यापी "करा किंवा मरा!" अशा स्वरूपाचे आंदोलन सुरू केले असते. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. छोट्या मोठ्या क्षत्रिय पक्षांकडून या विषयाच्या अनुषंगाने आपल्या अस्तित्वासाठीची सत्ताधाऱ्यासोबत बार्गेनिंग ची चळवळ दिसून येत आहे. देशातील समस्त बहुजन समाजाला राजकीय हतबल करणे. आपण शासनकर्ते बनू शकत नाही ही बाब बहुजनांच्या मना मनावर बिंबिविण्यासाठीचा शासनकर्त्यांचा हा कुटिल डाव आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्येही 24 जागावरून बहुजन भारत पार्टीच्या उमेदवाराने महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठ्या नेटाने निवडणूका लढल्या. उदगीर विधानसभेत बहुजन भारत पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या पक्षाच्या गरीब उमेदवारांनी माठ्या धाडसाने प्रस्थापित उमेदवारांच्या धाकधडप आणि दंडमशाहीला सामोरे जात आपल्या वंचित अपेक्षित समाजाचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले, त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने लढलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो! आणि या उमेदवारांना लढविण्यासाठी पक्षाच्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी धडपड केली, त्या सर्वांचे सुद्धा मी मनपुर्वक अभिनंदन करतो. ब्रिटिश सरकारला खुले आव्हान देत आपल्या गरीब समाजाच्या जगण्यासाठी प्रस्थापित सावकारांच्या आणि सरकारांच्या तिजोऱ्यावर जीवावर उदार होऊन डाका घालावा अगदी त्याचप्रमाणे आजच्या बहुजन समाजाला निवडणूकीच्या राजकारणांतून हद्दपार करण्याचा टोकाचा प्रयत्न चालू असताना बहुजन भारत पार्टीने काँग्रेस,भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वच प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची मते खात त्यांना जमीनदोस्त करण्याचा चिवट प्रयत्न केला आहे. बऱ्याच अंशी यात ते यशस्वी पण झालेले आहेत. यास्तव पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवारांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. पण आपण इथेच न थांबता आपल्या महापुरुषांचे बहुजन समाजाला शासनकरता समाज बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा नव्या जोमाने आपले संघटन केडरबेस आणि ब्रॉड बेस पद्धतीने तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. ईव्हीएम मशीनची छेडछाडी आणि पैशाचा तुफान मारा यामुळे सर्वसामान्य मतदारांचा आणि उमेदवारांचा निवडणूक प्रक्रिये वरील विश्वास उडून जात आहे, तो कायम टिकून राहावा यासाठी या बैठकीत बहुजन भारत पार्टीच्या वतीने निवडणूक लढलेल्या बहुजन भारत पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा आणि समविचारी पक्ष व अपक्ष उमेदवारांचा, मोठ्या धाडसाने त्यांनी निवडणुका लढल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात घेण्यात येणार असल्याचे सांगून राष्ट्रीय अध्यक्षांनी आपले संबोधन पुर्ण केले. त्यानुसार दिनांक 08 डिसेंबर 2024 रोजी उदगीर येथे लातूर जिल्ह्यातील तर औरंगाबाद येथे 15 डिसेंबर 2024 रोजी मराठवाड्यातील सर्व बहुजन विचारांच्या उमेदवारांचा गौरव करण्याचा कार्यक्रम संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेश सचिव श्री लक्ष्मण शेलार यांनी जाहीर केले. श्री भास्कर बंडेवार यांनी बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानुन राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने बैठक संपल्याचे जाहीर केले.
मा. संपादक साहेब,
आपल्या लोकप्रिय प्रसार माध्यमातून वरील बातमीस प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.
श्री लक्ष्मण शेलार
प्रदेश सचिव
बहुजन भारत पार्टी
9545356169