The Glorious Dhangar

The Glorious Dhangar यह पेज सामाजिक अर्थिक एवं राजनीतिक जन चेतना के लिए बनाया है।
आइये हम सभी मिलकर समाज को मजबूत करे।

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩🇲🇨१२ एप्रिल १७५२ पठाणांना पराजित केल्यानंतर वीश्रेष्ठ मल्हाराव होळकर परतीच्या प्रवासास निघाले अ...
12/04/2026

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨१२ एप्रिल १७५२ पठाणांना पराजित केल्यानंतर वीश्रेष्ठ मल्हाराव होळकर परतीच्या प्रवासास निघाले असता, वजीर सफदरजंग यांच्या लक्षात आले की, हिंदुस्तानवर अहमदशहा अब्दाली केंव्हाही हमला करू शकतो. त्यांचे बरोबर रोहिले, (बंगश ) पठाण हे सर्व एक होऊ शकतात. या सर्वांचा
सामना करायचा असेल तर मराठ्यांन बरोबर संधी करणे योग्य राहील. शत्रूपासून दिल्ली बादशाहीचा बचाव करण्यासाठी विशिष्ट करार ठरविले.
या करारातील महत्त्वाच्या अटी :
०१ ‌) पठाण ,राजपूत वगैरे देशातील बंडखोर किंवा अब्दाली सारखे परदेशी शत्रू यापासून पेशव्याने मोगल बादशाहीचा बचाव करावा.
०२) या मदतीबद्दल बादशहाने ५० लाख रुपये मराठ्यास खर्चास द्यावे.
०३) शिवाय बादशहाने पंजाब ,सिंध व अंतर्वेदी या प्रांतात चौथाई वसूल करण्याची परवानगी मराठ्यांना द्यावी.
०४) अजमीर व आग्रा या प्रांताची सुभेदारी पेशव्यास देण्यात यावी.
०५) पेशवा स्वतः येण्यास असमर्थ असेल तेव्हा, त्याचे बदल्यात मराठा सरदारांनी बादशहाच्या तैनातीत राहून इतर मनसबदार याप्रमाणे बिनतक्रारार नोकरी बजवावी.
🇲🇨 १२ एप्रिल १७५७ 🇲🇨
इंदूर मेवाड मार्गाने इंदोर नरेश मल्हारराव होळकर ,राघोबा सिंह एप्रिल १७५७ च्या सुमारास जयपुर ला पोहोचले . त्यांनी बारवाडच्या किल्ल्यावर वेढा दिला . पूर्वी झालेल्या करारानुसार मराठ्यांना रक्कम देण्यास माधोसिंगास मंत्री कान्होराम तयार होता . पण राघोबासिंहने ता. १२ एप्रिल १७५७ रोजी "४० किंवा ५० लक्ष रुपये नगदी ,१४ लक्ष्याची जहागीर ,याशिवाय रामपुरा ,भानपुरा ,टोक, तोडा ,व हिंगलाज गड ही ठाणी अशी मागणी माधोसिंगाकडे केली . माधोसिंगाने राघोबाची मागणी धुडकावून लावल्यामुळे युद्धाचा प्रसंग उदभवला .यावेळी मराठ्यांजवळ केवळ १३ हजार सैन्य होते . माधोसिंगाजवळ १७ हजार सैन्य बारवाड्याच्या वेढ्यात अडकून पडले . शेवटी राघोबासिंहला शहाणपणा सुचला त्यांने ११ लक्ष घेण्यास तयारी दर्शवली .
🇲🇨 १२ एप्रिल १७८१ 🇲🇨
१२ एप्रिल रोजी इंग्रजी फौजेनें पनवेलीहून मुक्काम हलवून ती बारवई येथें आली . दुसरें दिवशीं इंग्रजांची रसद चौक गावापुढें एक कोसावर येऊन उतरली . आघाडीस पटवर्धन व पिछाडीस होळकर याप्रमाणें चिकाटी वासून वाटभर लढाई होत होती .आघाडीची जागा अडचणीची म्हणून पटवर्धनाच्या हातें कांहीं विशेषसे झालें नाहीं . पण पिछाडीस होळकर होते त्यांनी एक दोन वेळा चांगलीच हुल्लड उठविली .
याप्रमाणें रसद बंद तर झालीच गोडार्ड यांस वाटल्याप्रमाणें पुणें दरबार घाबरला नाही. याप्रमाणे दोन्हीकडून घसरल्यामुळे गोडार्डने आपला मोर्चा फिरविला.
‌ 🇮🇩 १२ एप्रिल १७९४ 🇮🇩
मल्हारराव होळकर (दुसरे) बंड करून इंदोर पोहोचले.
महाराजा तुकोजीराव होळकर यांना हि बातमी समजताच त्यांनी हे खूप गांभीर्याने घेतले. देवी अहिल्यामाई होळकर यांनी इंदूरचे कमाविसदार (कलेक्टर) यांना आज्ञा दिली की, मल्हारराव होळकर यांच्या पासून सावध राहा, त्याच बरोबर सरदार बापुजीराव होळकर यांना सहकार्य करा. इंदोर येथील बाजार बंद ठेवा. ज्यामुळे काही अघटित घटना घडणार नाही. दरम्यानच्या काळात पुण्यामध्ये निजाम आली यांच्या विरोधात युद्धाची तयारी सुरू होती .त्या तयारीसाठी महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास बोलावले होते. देवी अहील्यामाई ने महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास जाण्याचे आदेश दिले. परंतु महाराजा तुकोजीराव होळकर यांचे पूर्ण लक्ष पुत्र मल्हारराव होळकर यांच्या कारवायाकडे लागले होते .कधी एखादी घटना घडली तर मल्हाररावास कठोर शासन होऊ शकते .यासाठी ते पुण्याला जाऊ इच्छित नव्हते. सरदार बापूजीराव होळकर हे मल्हारराव होळकर यांना शोधत पूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी मल्हारराव होळकर सापडले .त्यांनी सरदार बापूजी होळकर यांचे आदेश मानले .परंतु ६५ हजार रुपयांची मागणी केली.सरदार बापुजीराव होळकर यांनी मल्हारराव यांस परत घरी येण्याची सूचना केली. अचानक काशीराव होळकर आणि मल्हारराव होळकर या बंधूंच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या सैनिकास सुचित केले ,अशी कोणतीही कारवाई करू नका, ज्यामुळे शांती भंग होईल. त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी मान्य केले की , यापुढे असे माझ्या हातून अघटीत घडणार नाही.
🇮🇩 १२ एप्रील १८०० 🇮🇩
ब्रिटिशांनी हिंदूस्थानात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली .पुण्यातील वकील, लॉर्ड वेलस्ली ला सर्व घडामोडी कळत होते. पेशव्याला आता सरदार दौलतराव शिंदेच्या कचाट्यातून सुटायचे आहे हे लक्षात येताच त्यांनी आपली व्यूहरचना बनवायला सुरुवात केली.सरदार दौलतराव शिंदेंना पुण्याहून हाकलून देणे, व पेशव्याला त्याच्या होळकर शत्रूपासून संरक्षण देणे .अशा स्वरूपाचा गुप्त करार करण्याचे प्रयत्न सुरू झाले.१२ एप्रिल रोजी गव्हर्नर जनरल ने पुण्याच्या रेसिडेन्सी ला कळवले की, याप्रमाणे पेशव्यांशी करार घडवून आणावा.परंतु सरदार दौलतराव शिंदे यांच्या पुण्यातील कार्यकाळात हे शक्य नव्हते. बाजीराव पेशवे ( दुसरे) यांना येथे इंग्रजांचीच आठवण का यावी? खरे तर विरवर यशवंतरावांना तो संदेश जरी पाठवला तरी राजे यशवंतराव होळकरांनी तेव्हाच पुण्यात येऊन शिंद्यांचा मसला सोडवला असता. पण तसे झाले नाही. यशवंतराव होळकर आता आपले ऐकणार नाही असे त्यांना वाटले असावे .अर्थात ही भीती निराधार होती, हे पुढे अगदी विठ्ठोजींच्या क्रूर हत्येनंतर ही पेशव्यांना ठार मारण्याचा कसलाही प्रयत्न राजे यशवंतराव होळकर यांनी केला नाही .उलट पेशवे , इंग्रजांना जाऊन मिळू नये ,म्हणून प्रयत्न करत राहिले. पहिले बाजीराव पेशवे यांच्या मुळेच आपल्या खानदानाच्या पराक्रमाला खरा वाव मिळाला हे न विसरण्या एवढे राजे यशवंतराव होळकर कृतघ्न नव्हते .पण बाजीराव पेशवे (दुसरे) यांना शेवटी तारणहार वाटला तो परकीय इंग्रजच. प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩🇲🇨 १० एप्रिल १७५८ मराठ्यांचा अंमल पंजाब मुलतान लाहोर प्रांतात मे १७५८ पर्यंत होता. पंजाबचे बंदो...
10/04/2026

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨 १० एप्रिल १७५८ मराठ्यांचा अंमल पंजाब मुलतान लाहोर प्रांतात मे १७५८ पर्यंत होता. पंजाबचे बंदोबस्तास अलिजाबहादुर शिंदे यांचे वतीने सरदार साबाजी शिंदे तर सुभेदार मल्हारराव होळकर चे वतीने महाराजा तुकोजीराव होळकर यांना नेमले होते. लाहोर येथून परत फिरण्याचा श्रीमंत राघोबादादाने घेतलेला निर्णय कसा उचित आणि व्यवहार्य होता. ते जदुनाथ सरकार पत्रात लिहितात.
१० एप्रिल १७५८ ला लाहोर ताब्यात घेतले होते .रघुनाथराव पेशवे यांनी एक मोहीम पूर्ण केली, तिकडे गॅरिसन च्या लक्षात आले की, जसे त्याचे स्वतःचे सैन्य‌ आत येऊ शकत नाही. तरी पण त्याच्या घरापासून इतक्या दूर असलेल्या प्रांतात गॅरिसन ला प्रवॄत केले. हिवाळ्यातील खूप कडाक्याची थंडी असताना, शिखांनी बंडखोरी केली .तरी मराठा सरदारांनी पंजाबवर अधिकार चालवला. एवढ्या पंजाबला नाम मात्र करण्याचे एकमेव साधन म्हणजे मराठ्यांची सत्तेशी निष्ठा, आणि त्यातून जास्तीत जास्त महसूल मिळवणे. वसुली चे काम आदिनाबेग वर सोपवायचे होते. कारण त्याच्या कडे खूप अनुभव आणि त्यांच्यात खूप समजही होती. शिखांच्या विरोधात त्यांना खूप अनुभव होता. आदिनाबेग ने पंजाब प्रांतात प्रशासक म्हणून बरेच दिवस काम पाहिले आहे.त्याच्या अधिकारक्षेत्रात यानंतर हे काम व्हावे या उद्देशाने चर्चा अंती मराठा सरदारांनी त्यांचे सैनिकासह दिल्लीकडे कूच केले.
🇮🇩 १० एप्रिल १७९३ 🇮🇩
अधून मधून अंतःकरण पूर्वक विरक्त होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकीकडे नव्या शस्त्रास्त्रांची जमवाजमवी करीत होत्या. मिस्टर बाईड या ब्रिटिश माणसाची संपर्क ठेवून , त्यांच्याकडे माँसाहेबांनी बंदुका खरेदीसाठी पैसे दिले .मिस्टर बाईड याने मार्गावरून मातोश्री अहिल्यादेवी यांना पत्राद्वारे कळविले की,
" बहुत दिवस अमृतमय पत्र येऊन वर्तमान कळले नाही . हरघडी पत्री आज्ञा असावी. आम्ही पुण्याहून ३० मार्च १७९३ या दिवशी यशवंतराव गंगाधर या दिवाणजीं चा निरोप घेऊन निघालो. वाटेने शिंदे यांचे भय होते, २१ फेब्रुवारी १७९३ रोजी नंदुरबारेस दाखल झालो . पुण्याहून येते समयी बंदुका बरोबर आणावयास बनले नाही. लोकही फुटून बाहेर काढली, काही आले , काही आले नाही. नंदुरबारेस आल्यापासून आपल्या पायाजवळ लवकर यावे म्हणून तरतुदीत आहोत .बंदुका आणावयास सुरतेस गेलो .रस्त्याने सोनगडास गायकवाड यांचे लोकांनी पंधरा-वीस दिवस खोळंबा केला. तेथून निघून सुरतेस गेलो बंदुका वगैरे सरंजाम घेतला आहे .नंदुरबारेस आलो आपल्या पायाजवळ येण्यास बहुत दिवस लागत नाहीत .ज्या गोष्टीची जलदी धनीसाहेंबास आहे, त्या गोष्टीची मलाही जलदी आहे. सुरतेस खुद आम्ही गेलो, म्हणून बरे झाले. बाजारात बंदुका कोठे मिळत नव्हत्या, इंग्रजाचे कोठीतून भीड घालून घेतल्या. सुरतेचे व्यापारी इतरांना बंदूक विकत नाहीत. आपल्या पुण्य प्रतापे करून काम फत्ते झाले. लवकरच येतो आमची सचोटी धण्याच्या कामास प्रसंगी उपयोगी पडो .त्यासमयी आम्हीमाणूस कसे आहो ते ते ध्यानात येईल .उगाच पत्री प्रोढपणा दाखवावा हे नाही. नूतन कामाचा सरंजाम तयार होण्यास दिवसगत लागले. अडचणी आल्या. परंतु याजवर रागे भरू नये. आपला पैका घेऊन उगीच वावगी वर्तणूक करावी हे मनुष्य आम्ही नव्हे. हा काळपर्यंत वर्तमान झाले ते साद्यंत चरणापाशी विनंती निवेदन करीन. लवकरच येईन.ज्यादा काय लिहिणे. प्यार मोहबत असो द्यावी हे किताबत.पैवस्त छ.२८साबान " ( १० एप्रिल १७९३)
🇲🇨 १० एप्रिल १८०० 🇲🇨
( लेखांक ३ ) 'राजे जालमसिंग झाले 'संस्थान कोटे यांस : महाराज यशवंतराव होळकरांकडून (ता . १० एप्रिल १८०० गुळेगुळे दत्तर ) सारांश दुदरनेक फरांसीस यांस सरकारांतून हत्ती खरीदी करून, ऐवज सरकार हिशेबी लिहिणें म्हणोन .
( लेखांक ४ ) राजे 'जालमसिंग झाले' यांस महाराज यशवंतराव होळकरांकडून .(ता . १० एप्रिल १८०० गुळगुळे दत्तर ) सारांश कीं फुलण फरांसींसाकडील ५० हजारांची वरात जाहली आहे .तो ऐवज घरोब्याचे चालीस व्यंग न पडतां , ऐवजाचा निर्गम दुदरनेक याजकडेस करून पावती घेणें म्हणोन वगैरे .
🇲🇨 १० एप्रिल १८६५ 🇲🇨
‌ कर्नल मीड साहेब ए.सी.जी. सरकारचे( द्वितीय तुकोजीराव होळकर ) भेटीस आले .बक्षीजी व दिवानसाहेब पेशवाईस गेलें होते .महाराजसाहेबांनी (श्रीमंत द्वितीय तुकोजीराव होळकरांनी ) बाळासाहेब यांची ( शिवाजीराव होळकर )भेट करविली .सरकार वाड्यांत रोशनाई झाली होती . या सुमारास इंदूर शहरीं वाख्याचा ( = कॉल-याचा ) उपद्रव सुरू झाला .
🇮🇩 १० एप्रिल१९१४ 🇮🇩
सवाई तुकोजीराव होळकर ( तृतीय) हे शिक्षणासाठी खूप जागरूक होते. त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन असल्यामुळे, संपूर्ण राज्यातील जनता शिक्षित झाली .तर राज्याची प्रगती होणार.म्हणून सुभेदारांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. आर्थिक प्रगती व्हायची असेल तर, राज्यात औद्योगीकरण आवश्यक आहेम्हणून हुकूमचंद मिलची निर्मिती केली.
प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)

08/04/2026

पिछले हफ़्ते मुझे अपनी पोस्ट्स पर 1,000 से ज़्यादा रिएक्शन मिले! मुझे सपोर्ट करने के लिए आप सभी का धन्यवाद! 🎉

 #धनगरसमाज
18/03/2026

#धनगरसमाज

17/03/2026

मथुरा में धनगर समाज की बेटी की शादी में भाजपा नेता की गुंडागर्दी ।
गोली भी चलाई।

17/03/2026

किसी गरीब की शादी में जाकर उत्पात मचाना गुंडागर्दी करना ये भाजपा नेताओं का फैशन बन गया हैं।
पुलिस प्रशासन से अनुरोध हैं कि असामाजिक तत्वों पर सख्त कार्यवाही की जाए ।
मामला मथुरा जनपद के bsa रोड का हैं।

धनगर समाज की बेटी की शादी में मैरिज होम में घुसकर मारपीट और गोली भी चलाई गई हैं।

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩🇲🇨 १२ मार्च १७३८ 🇲🇨      नादिरशाह हा इराण प्रांतातील फारस चा खुरासान येथील त्यांने आपली वीरता ,...
12/03/2026

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨 १२ मार्च १७३८ 🇲🇨
नादिरशाह हा इराण प्रांतातील फारस चा खुरासान येथील त्यांने आपली वीरता ,साहस या गुणावर इराणचा सेनापती झाला . स्वतः ला इराण साम्राज्याचा बादशहा घोषित केले. बादशहा झाल्यावर पराक्रम करून कंधार (कंदहार काबुल ) बल्लव , बुखारा वर अधिकार मिळवला .
🇲🇨 १२ मार्च १७५६ 🇲🇨
‌ १७५६ च्या प्रारंभी सुभेदार मल्हारराव होळकर आणि रघुनाथराव पेशवे दोघेजण मेवाड प्रांतात गेले 'लांबा' येथे किल्ल्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला . तेथील जाहागिदाराने चोथाईची रक्कम दिल्यानंतर मराठ्यांनी त्यांना किल्ले परत दिला .रघुनाथराव पेशवे पुण्यात परत गेले. सुभेदार मल्हारराव होळकर राजपूतान्यांत चौथाई वसुलीसाठी मोहिमेवर होते . दरम्यान पेशव्यांनी निरोप पाठवला की, 'सावनूर'च्या नवाबाशी युद्ध चालू आहे . यासाठी आपण तातडीने दक्षिणेमध्ये सावनूर येथे जावे . आदेश मिळताच महाप्रतापी मल्हारराव होळकरांनी सावनूर रवाना झाले.
मराठ्यांनी सावनेर( सावनूर ) च्या नवाब विरोधात महाप्रतापी मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वात लढाई सुरू केली. सावनेरवर सतत दोन महिने लढाई सुरू राहिली .
अनेक सैनिक मारले गेले .परंतु युद्धात ढिलाई मिळाली नाही. मराठ्यांचा मुरारराव घोरपडे हा राजश्री शाहू महाराज यांच्या विरोधात सावनेरचे नवाबास मिळाला. घोरपडे यांनी श्रीमंत पेशवे यांच्या विरोधात कारस्थाने केली .वीरश्रेष्ठ मल्हारराव होळकरांनी नवाबास निरोप दिला की, अतिरेकी मुजफ्फरखानला आमच्या ताब्यात द्या. परंतु नवाबा ने ही अट मान्य केली नाही . त्यामुळे लढाईचा भडका उडाला. १२ मार्च १७५६ रोजी नवाब आणि घोरपडे यांच्या सेनेने किल्ल्याबाहेर येऊन मराठ्यांवर तुफानी हल्ला चढविला तरीही मराठे घाबरले नाहीत. मराठ्यांच्या तोफांच्या अचूक मारा पुढे नवाब सेना घाबरली. मुजफ्फरखान वेशांतर करून किल्ला सोडून पळाला.
🇲🇨 १२ मार्च १७५७ 🇲🇨
मोहीमेकरता लगणाऱ्या द्रव्याचा अभाव ,अपुरे सैनिक यामुळे अब्दाली विरुद्ध मराठ्यांनी कारवाई न करता सुभेदार मल्हारराव होळकर व श्रीमंत राघोबादादा पेशवे यांनी मार्च १७५७ रोजी खंडणी वसूल करण्याकरता आपला मोर्चा राजस्थानकडे वळविला .सुभेदार मल्हारराव होळकर ,श्रीमंत राघोबादादा राजपुताना कडे वळताच अब्दालीने मथुरेत हत्या सत्र सुरू केले होते .
१२ मार्च १७५७ रोजी अंताजी माणकेश्वर यांनी पेशव्यास कळविले की, सुभेदार मल्हारराव होळकर व सरदार दत्ताजी शिंदे हे दोघे स्थानिक राजांच्या मदतीने अब्दालीचा मोड करू शकत होते. अब्दाली हिंदुस्थानात आलेला आहे हे कळताच सुभेदार मल्हारराव होळकर व सरदार दत्ताजी शिंदे यांनी स्थानिक राज्यांच्या मदतीने अब्दालीशी सामना करायला हवा होता . विशेष म्हणजे मल्हारराव होळकर हे अनुभवी जेष्ठ सरदार असल्याने अब्दालीविरोधात पाऊल उचलण्याबाबत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करायला हवे होते. सुभेदार मल्हाररावांनी यावेळी पाऊल उचलले असते तर कदाचित त्याला पायबंद बसला असता . आणि पाणीपतचे अरिष्ट तळले असते .
असे आरोप अंताजी माणकेश्वरने परिस्थिती न जाणून घेता होळकर- शिंदेच्या व्देशापोटी पेशव्यांकडे केले होते.
‌. 🇲🇨 १२ मार्च १७६० 🇲🇨
अहमदशाह अब्दालीला बातमी समजली की, दक्षिणेतून मराठे आपल्यावर चाल करून येत आहेत . यावर तो खूप घाबरला . अब्दालीने परत आपल्या देशात जाण्याचा विचार केला. तो चांगलाच ओळखून होता की, आपल्याला हिंदुस्तान मध्ये केवळ मराठेच टक्कर देऊ शकतात . तो आतल्या आत घाबरला परंतु नजीबखान रोहिल्याने अहमदशाह अब्दालीला विनंती केली, की आपण सर्वांनी मिळून मराठ्यांन बरोबर टक्कर दिली पाहिजे .हिंदू शक्तींना नेस्तनाबूद करण्यासाठी 'रामगढ' येथे त्यांनी छावणी टाकली .
फरूखाबादचा नवाब अहमद खान बंगश सुद्धा अब्दालीला जाऊन मिळाला. माधवसिंह कछवाय चा दुत राय हरप्रसाद सुध्दा त्यांच्या छावणीत जाऊन मिळाला .त्यांमुळे त्याची बरीच शक्ती वाढली होती.
परंतु नजीबखान रोहिल्याचे दुआबातील रोहिल्यांबरोबर आणि अफगाण्यांबरोबर संबंध चांगले नव्हते .हाफिज रहमत खान हा त्या सर्वांचा प्रमुख होता. जाट राजा आणि मराठा सरदार यांनी प्रयत्नपूर्वक हाफिज रमत खान यांच्याबरोबर समझोता चर्चा करण्यासाठी तयार झाला. हाफिज रहमत खानचा वकील पुरुषोत्तम महादेव हिंगणे, गंगाधर राव , इमाद डिगमध्ये मिळाले . तेथे खलबते झाली .१२ मार्च १७६० रोजी पुरुषोत्तम महादेव हिंगणे यांनी आपल्या पत्रात लिहिले .की " हाफिज रहमत खान आपल्या सरदारांबरोबर भेटू इच्छित आहे . तो म्हणतो की दु-हानी याला वापस पाठवेल त्याबरोबरच नजीबखान रोहिल्याचा सुद्धा बिमोड करण्याची आमची इच्छा आहे. आमचे सरदार सुद्धा यावर एकमत झाले आहेत. ते कधीही त्यांच्या गंगापार करून पुढच्या प्रदेशाचा अधिकार घेणार नाहीत. यासाठी दोघांनी शपथ घेतलेली आहे.
🇲🇨 १२ मार्च १७६३ 🇲🇨
निजामाविरूध्दच्या लढाईत माळवा नरेश मल्हारराव होळकरांची मदत पेशवेंना व राघोबा दादांना मोलाची वाटणे स्वाभाविक होते .
"यास्तव आपली गनिमी रीत स्वीकारून थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांच्या साह्याने मोगलावर चाल करून जावे असा बेत पेशव्यांनी आखला .
असा उल्लेख श्रीमंत राघोबादादांने गोपिकाबाईला पाठवलेल्या पत्रात आढळतो .
महापराक्रमी मल्हारराव होळकर गनिमी युद्धात निपुण होते. निजामाजवळ भारी तोफखाना असल्यामुळे आमोरासमोरच्या युद्धात त्यांच्याविरुद्ध उभे टाकून यश मिळविणे शक्य नव्हते . तोफखाण्याबाबत मराठे कमकुवत होते .म्हणून निजामाविरुद्ध गनिमी पद्धतीनेच लढा देणे आवश्यक आहे, असे अनेक मराठा सरदारांचे मत होते. त्याकरिता राघोबादादांने विठ्ठल शिवदेव याला सुभेदार मल्हारराव होळकरास अणण्यकरता 'वाडवण' येथे पाठविले . निजामाविरुध्द होळकरांची मदत प्राप्त करण्याकरता सखारामबापूंनेही गंगोबा तात्यास अनेक पत्रे लिहिली.
सुभेदार मल्हारराव होळकर येत नाहीत हे पाहून राघोबादादांनी पुन्हा दोन कारकून व त्या पाठोपाठ खुद्द सखारामबापूस त्यांच्याकडे पाठविले .तरीही मल्हारराव होळकरांनी फैज बाहेर काढली नाही . म्हणून शेवटी स्वतः पेशवे सुभेदार मल्हारराव होळकरांकडे गेले. व त्यांना १० लक्ष उत्पन्नाचा नवीन सरंजाम लिहून दिला. रावेर ,सावेर ,सुरोज , देपुर ,पाड, कोरेगाव ,विजयगड, वैजापूर व गाळणी ही ठिकाणे त्या सरंजामास मोडत होती .
त्यावेळी मल्हारराव होळकरांनी पेशव्याच्या शब्दास मान देऊन नवीन सरंजाम स्विकारुन १२ मार्च १७६३ रोजी पिंपळखेड येथे पेशव्यांच्या सैन्यात येऊन सामील झाले .
🇲🇨 १२ मार्च १७६७ 🇲🇨
‌ युवराज मालेगाव होळकर यांनी देवळे परगण्यातील कमाविसदार ( कलेक्टर ) आनंदराव नरहर यास कळविले . मस्के शिलेदार यास ५ हजार रुपये त्यांनी केलेल्या समजाविशी ( गुप्त काम ) च्या बद्दल देणे , त्यातून धर्मदाय पोतदारीचे २५० रुपये कापून घेऊन बाकी चे रुपये ४७५० तुम्ही पावते (द्यावी ) करावे .
ही पत्रे वाचली की आश्चर्य वाटते, मानसिक संतुलन ढळल्याच्या कोणत्याही खुणा या पत्रा दिसत नाहीत .मालेराव होळकरांना अधून मधून निराशेचे जोरात झटके येत असू शकतील. एरवी ते व्यवस्थित असताना त्यांनी ही पत्रे लिहून घेतलेली असतील .
या पत्रावरून सुभेदार मालेराव होळकर यांचे आर्थिक नियोजन व पारदर्शक व्यवहार हा गुण लक्षात येतो .त्यांचा राज्यकारभार ८ ते ९ महिने या कारकीर्दीत मालेराव होळकरांनी प्रशासन व्यवस्था , अर्थकोष किती काळजीपूर्वक हाताळला याची साक्ष या पत्रावरून येते .त्यांच्या सुयोग्य प्रशासन हाताळण्याच्या कार्य कौशल्यामुळेच अनेक कमाविदार , मामलेतदार येऊन मालेरावांशी सन्मानाने सल्लामसलत करू लागले. कारभाराची स्थिती चोख ठेवली होती.
🇲🇨 १२ मार्च १७९० 🇲🇨
पत्रांक ६ .
( ता. १२ मार्च १७९० )
तुकोजीरावांकडून मातोश्री साहेबांस .वडिलांकडून पत्र आलें त्यांत आमचे खातरजमेचें व अभयांचे विस्तारें लेखन केलें तेणेंकरून बहुत संतोष पावलो . आम्हांस सर्व आधार वडिलांचे चरणींचा आहे .आजपर्यंत वडिलांचे पुण्यप्रवाहे करून दौलतीचा निर्वाह होत आला व पुढेंही आश्रय तोच . सांप्रत प्रासंगिक वर्तमान अलाहिदा सादर केले आहे. मजकूर ध्यानांत येऊन गाडेलोटल्या अर्थ करणें वडिलांकडे आहे .
🇲🇨 १२ मार्च १७९५ 🇲🇨
खर्डा ची लढाई सतत तीन दिवसापासून चालूच होती . महाराजा तुकोजीराव होळकरांनी या अगोदर शत्रुसैन्यास ( निजाम हैदर आली )याच खर्डा दुर्ग मध्ये जेरबंद करून बाहेरून मिळणारी रसद बंद केली. मराठ्यांनी निजामाच्या विरोधात पूर्ण दिवस गोळा बारी चालू ठेवली . जनावरांना पाणी पाजले जाते ते सैनिकांना प्यावे लागले. खायला अन्न , जनावरांना चारा मिळत नव्हता. उपाशीपोटी निजाम सैनिकाची लढाई करण्याची इच्छा राहिली नाही. मराठ्यांविरोधात आपला निभाव लागणार नाही .हे लक्षात आल्यावर निजाम संधी करण्यास तयार होऊ लागला .
प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)

21/02/2026
जय धनगर जय मल्हार
11/02/2026

जय धनगर जय मल्हार

Address

Mathura

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Glorious Dhangar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category