12/04/2026
🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨१२ एप्रिल १७५२ पठाणांना पराजित केल्यानंतर वीश्रेष्ठ मल्हाराव होळकर परतीच्या प्रवासास निघाले असता, वजीर सफदरजंग यांच्या लक्षात आले की, हिंदुस्तानवर अहमदशहा अब्दाली केंव्हाही हमला करू शकतो. त्यांचे बरोबर रोहिले, (बंगश ) पठाण हे सर्व एक होऊ शकतात. या सर्वांचा
सामना करायचा असेल तर मराठ्यांन बरोबर संधी करणे योग्य राहील. शत्रूपासून दिल्ली बादशाहीचा बचाव करण्यासाठी विशिष्ट करार ठरविले.
या करारातील महत्त्वाच्या अटी :
०१ ) पठाण ,राजपूत वगैरे देशातील बंडखोर किंवा अब्दाली सारखे परदेशी शत्रू यापासून पेशव्याने मोगल बादशाहीचा बचाव करावा.
०२) या मदतीबद्दल बादशहाने ५० लाख रुपये मराठ्यास खर्चास द्यावे.
०३) शिवाय बादशहाने पंजाब ,सिंध व अंतर्वेदी या प्रांतात चौथाई वसूल करण्याची परवानगी मराठ्यांना द्यावी.
०४) अजमीर व आग्रा या प्रांताची सुभेदारी पेशव्यास देण्यात यावी.
०५) पेशवा स्वतः येण्यास असमर्थ असेल तेव्हा, त्याचे बदल्यात मराठा सरदारांनी बादशहाच्या तैनातीत राहून इतर मनसबदार याप्रमाणे बिनतक्रारार नोकरी बजवावी.
🇲🇨 १२ एप्रिल १७५७ 🇲🇨
इंदूर मेवाड मार्गाने इंदोर नरेश मल्हारराव होळकर ,राघोबा सिंह एप्रिल १७५७ च्या सुमारास जयपुर ला पोहोचले . त्यांनी बारवाडच्या किल्ल्यावर वेढा दिला . पूर्वी झालेल्या करारानुसार मराठ्यांना रक्कम देण्यास माधोसिंगास मंत्री कान्होराम तयार होता . पण राघोबासिंहने ता. १२ एप्रिल १७५७ रोजी "४० किंवा ५० लक्ष रुपये नगदी ,१४ लक्ष्याची जहागीर ,याशिवाय रामपुरा ,भानपुरा ,टोक, तोडा ,व हिंगलाज गड ही ठाणी अशी मागणी माधोसिंगाकडे केली . माधोसिंगाने राघोबाची मागणी धुडकावून लावल्यामुळे युद्धाचा प्रसंग उदभवला .यावेळी मराठ्यांजवळ केवळ १३ हजार सैन्य होते . माधोसिंगाजवळ १७ हजार सैन्य बारवाड्याच्या वेढ्यात अडकून पडले . शेवटी राघोबासिंहला शहाणपणा सुचला त्यांने ११ लक्ष घेण्यास तयारी दर्शवली .
🇲🇨 १२ एप्रिल १७८१ 🇲🇨
१२ एप्रिल रोजी इंग्रजी फौजेनें पनवेलीहून मुक्काम हलवून ती बारवई येथें आली . दुसरें दिवशीं इंग्रजांची रसद चौक गावापुढें एक कोसावर येऊन उतरली . आघाडीस पटवर्धन व पिछाडीस होळकर याप्रमाणें चिकाटी वासून वाटभर लढाई होत होती .आघाडीची जागा अडचणीची म्हणून पटवर्धनाच्या हातें कांहीं विशेषसे झालें नाहीं . पण पिछाडीस होळकर होते त्यांनी एक दोन वेळा चांगलीच हुल्लड उठविली .
याप्रमाणें रसद बंद तर झालीच गोडार्ड यांस वाटल्याप्रमाणें पुणें दरबार घाबरला नाही. याप्रमाणे दोन्हीकडून घसरल्यामुळे गोडार्डने आपला मोर्चा फिरविला.
🇮🇩 १२ एप्रिल १७९४ 🇮🇩
मल्हारराव होळकर (दुसरे) बंड करून इंदोर पोहोचले.
महाराजा तुकोजीराव होळकर यांना हि बातमी समजताच त्यांनी हे खूप गांभीर्याने घेतले. देवी अहिल्यामाई होळकर यांनी इंदूरचे कमाविसदार (कलेक्टर) यांना आज्ञा दिली की, मल्हारराव होळकर यांच्या पासून सावध राहा, त्याच बरोबर सरदार बापुजीराव होळकर यांना सहकार्य करा. इंदोर येथील बाजार बंद ठेवा. ज्यामुळे काही अघटित घटना घडणार नाही. दरम्यानच्या काळात पुण्यामध्ये निजाम आली यांच्या विरोधात युद्धाची तयारी सुरू होती .त्या तयारीसाठी महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास बोलावले होते. देवी अहील्यामाई ने महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास जाण्याचे आदेश दिले. परंतु महाराजा तुकोजीराव होळकर यांचे पूर्ण लक्ष पुत्र मल्हारराव होळकर यांच्या कारवायाकडे लागले होते .कधी एखादी घटना घडली तर मल्हाररावास कठोर शासन होऊ शकते .यासाठी ते पुण्याला जाऊ इच्छित नव्हते. सरदार बापूजीराव होळकर हे मल्हारराव होळकर यांना शोधत पूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी मल्हारराव होळकर सापडले .त्यांनी सरदार बापूजी होळकर यांचे आदेश मानले .परंतु ६५ हजार रुपयांची मागणी केली.सरदार बापुजीराव होळकर यांनी मल्हारराव यांस परत घरी येण्याची सूचना केली. अचानक काशीराव होळकर आणि मल्हारराव होळकर या बंधूंच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या सैनिकास सुचित केले ,अशी कोणतीही कारवाई करू नका, ज्यामुळे शांती भंग होईल. त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी मान्य केले की , यापुढे असे माझ्या हातून अघटीत घडणार नाही.
🇮🇩 १२ एप्रील १८०० 🇮🇩
ब्रिटिशांनी हिंदूस्थानात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली .पुण्यातील वकील, लॉर्ड वेलस्ली ला सर्व घडामोडी कळत होते. पेशव्याला आता सरदार दौलतराव शिंदेच्या कचाट्यातून सुटायचे आहे हे लक्षात येताच त्यांनी आपली व्यूहरचना बनवायला सुरुवात केली.सरदार दौलतराव शिंदेंना पुण्याहून हाकलून देणे, व पेशव्याला त्याच्या होळकर शत्रूपासून संरक्षण देणे .अशा स्वरूपाचा गुप्त करार करण्याचे प्रयत्न सुरू झाले.१२ एप्रिल रोजी गव्हर्नर जनरल ने पुण्याच्या रेसिडेन्सी ला कळवले की, याप्रमाणे पेशव्यांशी करार घडवून आणावा.परंतु सरदार दौलतराव शिंदे यांच्या पुण्यातील कार्यकाळात हे शक्य नव्हते. बाजीराव पेशवे ( दुसरे) यांना येथे इंग्रजांचीच आठवण का यावी? खरे तर विरवर यशवंतरावांना तो संदेश जरी पाठवला तरी राजे यशवंतराव होळकरांनी तेव्हाच पुण्यात येऊन शिंद्यांचा मसला सोडवला असता. पण तसे झाले नाही. यशवंतराव होळकर आता आपले ऐकणार नाही असे त्यांना वाटले असावे .अर्थात ही भीती निराधार होती, हे पुढे अगदी विठ्ठोजींच्या क्रूर हत्येनंतर ही पेशव्यांना ठार मारण्याचा कसलाही प्रयत्न राजे यशवंतराव होळकर यांनी केला नाही .उलट पेशवे , इंग्रजांना जाऊन मिळू नये ,म्हणून प्रयत्न करत राहिले. पहिले बाजीराव पेशवे यांच्या मुळेच आपल्या खानदानाच्या पराक्रमाला खरा वाव मिळाला हे न विसरण्या एवढे राजे यशवंतराव होळकर कृतघ्न नव्हते .पण बाजीराव पेशवे (दुसरे) यांना शेवटी तारणहार वाटला तो परकीय इंग्रजच. प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)