21/05/2026
कोकरोज जनता पार्टी आली म्हणून काही लोक उत्साहित आहेत...
पण २०१४ पूर्वी अण्णा हजारे, केजरीवाल आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून जे वातावरण तयार करण्यात आलं होतं, त्याचीच आठवण आता पुन्हा होत आहे.
जेन झीच्या भावना, त्यांचा असंतोष आणि व्यवस्थेविरोधातील राग यांना दिशा देण्याऐवजी तो विभागण्याचा हा नवीन प्रयोग आहे. कारण आजच्या तरुणांची ताकद भाजपला चांगलीच दिसत आहे. त्यामुळे मागच्या दरवाजाने नवीन चेहरे, नवीन पक्ष, नवीन नैरेटिव्ह उभं करणं त्यांच्यासाठी अवघड नाही.
पैसा, सत्ता आणि मीडिया यांची ताकद वापरून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवणं हा जुना फॉर्म्युला आहे. पण जर लोक अजूनही अशा प्रयोगांना बळी पडत असतील, तर खऱ्या परिवर्तनाचा लढा आणखी कठीण होणार आहे.
प्रश्न पक्षाचा नाही…
प्रश्न आहे कोणाच्या फायद्यासाठी जनतेचा असंतोष वापरला जातोय?