06/05/2022
*राजर्षी या पदवीला स्वकर्तुत्वाने सार्थ ठरविणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी अशा भावनेतून राज्यकारभार करणारे, अनिष्ठ रूढींच्या जोखडात पिचलेल्या गोरगरीब, उपेक्षित, पिडीत व अन्यायग्रस्त समाजाच्या उद्धारापायी आपले सर्वस्व पणाला लावणारे विसाव्या शतकातील महान लोककल्याणकारी राज्यकर्ते.... राजर्षी छत्रपती शाहू महाराज...!* 🚩🚩
*शिवरायांच्या जीवनात अनेक बाके प्रसंग उभे राहिले, वेगवेगळ्या लढाया असतील किंवा प्रतिपक्षाने टाकलेले राजकीय डावपेच किंवा क्षत्रियत्वाचा प्रसंग असेल ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी या सर्व संकटांवर संयमाने मात केली अगदी त्याचपद्धतीने राजर्षी शाहू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना अतिशय संयमाने तोंड देवून त्यांवर मात केली.*
*राजर्षी शाहूंचा काळ म्हणजे काही लढायांचा नव्हता, तो काळ सामाजिक उत्थान आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या चळवळींचा होता. राजर्षींनी ज्या पद्धतीने सामाजिक उत्थानाला हात घातला तसा त्याकाळी भारतात कुठल्याही राजाला करता आले नाही. त्याबरोबर क्रांतिकारकांना मदतही करायला ते विसरत नव्हते.*
*राजकीय व सामाजिक आघाडीवरील राजर्षींचे यश पाहिले तर प्रतिशिवाजी ही उपमा त्यांना सार्थपणे लागू होते.*
* #प्रतिशिवाजी राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा...! 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩*