22/01/2026
*शेतक-यांनी शेवग्याशपासून तयार केलेल्या पावडर व बिस्कीेटाचे जिल्हांधिकारी राहुल कर्डिेले सर यांनी घेतला स्वाद !*
दि.22/02/2026
स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणाऱ्या व ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्या पासून आरोग्यगदायी पावडर व बिस्कीवट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरणजिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले सर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
मनरेगा अंतर्गत किनवट तालुक्यातील अति प्रभावित मेगा पाणलोट (HIMWP-MH)प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करिता मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांनी क्षेत्र भेटी दिल्या. त्यावेळी शेवगा उत्पादक शेतकरी अभिजित जमादार यांच्या शेताला भेट दिली असता, किनवट तालुक्यात शेवगा उत्पा दनाचे चांगले काम सुरू असल्याचे दाखवून दिले. तेव्हा याभागात शेवग्यावर काम केले तर चांगला रोजगार निर्माण होऊन शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढू शकते. त्यामुळे मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी शेतक-यांचा गट निर्माण करून मनरेगा अंतर्गत शेवगा लागवडीचे काम मंजूर करण्याजस व मा. सहायक जिल्हाधिकारी श्री. जेनीतचंद्रा दोन्तुला यांना ITDP विभाग व कृषी विभाग यांच्या समन्वयातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारणीच्या सूचना दिल्या. मा. सहायक जिल्हाधिकारी श्री जेनीत चंद्रा दोन्तुला सर यांनी ITDP अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम मधून 24.50 लाख रुपये मंजूर करून कृषी विभाग अंतर्गत स्थापित वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट, या गटा अंतर्गत प्रक्रिया युनिट उभारणीस मंजुरी दिली. त्यानंतर सदर गटांनी प्राथमिक स्थरावर सोलर ड्रायर उभारून शेवगा पावडर, शेवगा बिस्कीट व शेवगा चहा पावडर निर्मिती केली आहे. या शेवगा पावडर विक्री करिता विविध मॉल,शॉप, मेडिकल व दुकानावर दिले आहे. या प्रॉडक्ट चे स्थानिक पातळीवर सहायक मा जिल्हाधिकारी श्री जेनीत चंद्रा दोन्तुला सर यांनी केले तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले सर व उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. हनमंत कोळेकर सर यांनी केले.
यावेळी जिल्हाधीकारी महोदय म्हणतात की,हा उद्योग अनुसूचीत जमाती (ST)कुटुंब, महिलां शेतकरी इतर प्रवर्गती शेतकरी व शेतकरी गटांचे आर्थिक सक्षमीकरण लक्षात घेऊन सुरू करण्यात आला असून, शेवगा पानांपासून पौष्टिक पावडर निर्मिती करून त्याचे मूल्यवर्धन करण्यात येणार आहे. या उद्योगामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगारासह त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळणार असून स्थानिक पातळीवरच प्रक्रिया व विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी बोलताना सांगितले की, “अशा प्रकारचे लघुउद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असून पोषणमूल्याने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या उत्पादनातून आरोग्य व रोजगार या दोन्ही क्षेत्रांना लाभ होईल.”तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेतअसे आवाहन त्यांनी केले.
त्या वेळी उपस्थित नोडल अधिकारी चेतन जाधव,प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, CSO RAES तालुका समन्वयक रवी उबाळे, शेतकरी अभिजीत जमादार व संदीप हुरदूके उपस्थित होते.