23/03/2024
*भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना ????*
वयाच्या उमेदीच्या वर्षात फासावर लटकण्याची तयारी दर्शविणाऱ्या या तरुणांनी जे उदात्त धोरण आणि लक्ष्य निश्चित केले होते त्याचा विसर तर आत्ताच्या तरुणांना पडत नाही ना????
जात, धर्म, पंथ, पक्ष याहुन मोठा देश आहे. संकुचित वर्तुळातून बाहेर पडून व्यापक दृष्टिकोन आमच्या पिढीचा होईल का???
फक्त वैयक्तिक स्वार्थापायी कुणाच्या तरी जिवावर आम्ही उठतोय आणि मारणारे मरणारे आपलेच आहेत याचा आम्हाला विसर पडतोय. आणि ते ही त्या मातीतल्या तरुणांना जिथली माती कधी काळी हुतात्मा राजगुरुंनी आपल्या ललाटावर अभिमानाने लावली होती.
वैयक्तिक स्वार्थाची चौकट मोडुन किमान मी माझ्या गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि सरते शेवटी देशासाठी काय उत्तमोत्तम करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने करणे गरजेचे आहे. विड्या काड्या, गोवा मावा, बाटली याला स्पर्श करताना या हुतात्म्यांचे स्मरण जरूर करावे.
* देश से हे प्यार तो हर वक्त केहेना चाहीये मे रहु या ना रहु भारत ये रेहेना चाहीये*
वीर सावरकर म्हणुन च म्हणाले होते की
*“ व्यर्थ न हो बलिदान”*….!
हीच खरी शहीद दिनाची माझ्या वीरांना आदरांजली……!