29/05/2026
🚩 महाराष्ट्रासाठी एक विचार... 🚩
भविष्यात असा दिवस येऊ नये की मराठी माणसालाच आपल्या मातीत परका वाटू लागेल. म्हणून आजच जागे होण्याची गरज आहे.
आपली जमीन, आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपला महाराष्ट्र ही केवळ संपत्ती नसून आपली ओळख आहे. विकास जरूर व्हावा, उद्योग यावेत, जगभरातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन काम करावे; पण महाराष्ट्राविषयीचा आदर, जिव्हाळा आणि जबाबदारीही तितकीच असावी.
मराठी माणसाने जगभर जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, पण आपल्या मातीशी असलेले नाते कधीही तुटू देऊ नये.
प्रत्येकाला विकास हवा, प्रगती हवी, सर्वसमावेशकता हवी; पण आपल्या भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे रक्षणही तितकेच आवश्यक आहे.
आपली माती, आपली ओळख, आपला महाराष्ट्र यांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. 🚩 जय महाराष्ट्र जय हिंद 🇮🇳
*ऍड मनिष दामोदरराव मोडक*
Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party ShivSena मराठी अभ्यास केंद्र मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य BJP Maharashtra