Swa.sameer-Tatya sontakke wachnalay Chorakhali

Swa.sameer-Tatya sontakke wachnalay  Chorakhali शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते...
आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य...

Happy birthday dear friend
09/06/2023

Happy birthday dear friend

"मस्तानी"    हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे...
12/05/2023

"मस्तानी"
हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी साहित्यात, मराठी मनात वारंवार तिच्या व्यक्तिमत्त्वाचे उल्लेख येतात.

परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कायम थट्टेचा, टिंगल-टवाळीचा उपसर्ग पोहोचला आणि तो अबाधित राहिला, म्हणूनच आजही या ३०० वर्षांत महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थाना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी.

मस्तानीची दुसरी ओळख आहे, ती म्हणजे रखेल मस्तानी, नाची मस्तानी, कंचन मस्तानी आणि तिची शेवटची ओळख म्हणजे तिने पान खाल्ल्यानंतर पानाची पिंक तिच्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची व ती पान खाऊन सज्जात बसायची त्याला लोक ‘मस्तानीचा सज्जा’ म्हणून ओळखत. मस्तानी या पद्धतीने इतिहासपटलावर प्रतीत झाली. परंतु खरंच मस्तानी अशी होती का? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?

मस्तानीला समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्याला छत्रसाल महाराजांना समजून घ्यावे लागेल. राजा छत्रसाल महाराज हे प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वराअगोदर त्यांची पूजा केली जाते. ‘छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली!’ अशी प्रार्थना म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एवढे मोठेपण हिंदुस्थानातील कोणत्याही राजाला लाभले नाही. छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते. प्रगत, उदारमतवादी प्रणामी पंथात हिंदू-मुस्लीम या धार्मिक भेदास मान्यता नव्हती. वेद आणि कुराण यातील ईश्वर एकच असून, मनुष्यमात्राची समानता, धार्मिक सहिष्णुता आणि निरामय प्रेमभावना ही या पंथाची तत्त्वे होती.

या प्रणामी पंथास निगडित असलेली खूप मोठी मोठी नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महात्मा गांधी यांचे. ते व त्यांचे कुटुंब हे प्रणामी पंथीय होते. हे ऐकले तर आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे.

अशा पंथातून, अशा संस्कारातून मस्तानी आली होती. ती छत्रसाल महाराजांना यवन उपपत्नीपासून झाली होती. प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य धरत नसत. त्यामुळे मस्तानी ही छत्रसालांची औरस राजकन्याच ठरते. तिचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक संस्कार हे छत्रसालानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. वैभवात ती राहिली होती. गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता. तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत.

अशा या लाडक्या, राजकन्येचा मस्तानीचा खांडा पद्धतीने बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. छत्रसाल राजाने त्या वेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. ही भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण करणाऱ्या महमंद बंगषाला बाजीरावांनी पराभूत केल्याची कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल राजाने मराठे व बुंदेला ही सोयरीक निर्माण केली. बाजीरावांचाही या विवाहामागील हेतू पाहिला तर मस्तानी लावण्यवती होती, एवढाच नव्हता, तर बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता. बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि त्यासाठी त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज बाजीरावांनी ओळखली होती.

पुढे पुढे मात्र या व्यवहारात भावनिक जवळीक निर्माण झाली. छत्रसालांनी बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’
‘महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को अपनौ भाई समझे हो.’ पत्राची तारीख आहे शनिवार, २३ सप्टेंबर १७३२. सदर पत्रातून बाजीरावांचा आणि मस्तानीच्या परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं. बाजीरावांनी केवळ सौंदर्यवती मस्तानीला पुण्यात आणले नाही, तर त्यांनी मस्तानीसोबत प्रणामी पंथाची भेदाभेदातीत निरामय प्रेमतत्त्वाची, अनोखी जीवनदृष्टीही आणली होती. हा नाही म्हटला तरी पुण्यातील लोकांना धक्काच होता आणि आव्हानही. त्यातच बाजीराव-मस्तानी यांच्या परस्परासंबंधीच्या निष्ठा फारच पक्क्या होत्या. परस्परांतील प्रेमही अतूट होते.

सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. त्यातील निजामभेट, कोकण मोहीम सात-आठ महिने. त्याअगोदर डबईचे युद्ध आणि नंतर उत्तरेची मोहीम. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर मस्तानीला रायांचा सहवास असा नव्हताच. पेशवे कुटुंबाचेही तसे दुर्लक्षच होते. एक रखेल या पलीकडे मस्तानीचे अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.

परंतु मस्तानीस जसा समशेर हा मुलगा झाला, तसे पेशवे कुटुंबास एका भीतीने ग्रासले की, कदाचित मस्तानीचा वंशज पेशव्यांच्या गादीवर हक्क सांगेल. झाले त्याच दिवसापासून मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी- प्राशनी ठरविले. एवढेच नाहीतर या संकटास कायमचे पंगू करण्यासाठी बाजीराव-मस्तानी हा संबंध वैवाहिक नाही, ती पत्नी नसून रखेल आहे, शिवाय ती खानदानी नसून ती निजामाच्या रक्षेची मुलगी आहे, शहाजन खानाची कलावंतीण आहे- अशा कपोलकल्पित गोष्टींचा पुण्यात बोभाटा सुरू केला.
आणखी एक आवई अशीच उठवली गेली, ती म्हणजे मस्तानी आल्यामुळे बाजीरावांचे काशीबाईंवरील लक्ष उडाले. परंतु वास्तवात मात्र मस्तानीचे व काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे होते. मस्तानी आल्यानंतर ही काशीबाईंना तीन अपत्ये झाली. यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे चारही बाजूंनी मस्तानीवर हल्ले होत होते.

यात थोडा अंकुश होता, तो शाहू महाराजांचा. त्यातच बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला. शनिवारवाडय़ात प्रशस्त हवेली बांधली. एवढे नव्हे तर, समशेरच्या मुंजेची तयारी सुरू झाली.
या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास आणखीनच धार चढली. त्यातच या लढय़ात पुण्यातील ब्रह्मवृंद उतरला आणि बघता बघता राजकारणात व रणभूमीवर महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत झाले.

पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे गुप्त मनसुबे रचले गेले. खरे तर मस्तानी ही योद्धा होती. तिने दिल्लीच्या मोहिमेत बाजीरावांच्या रिकिबीला रिकीब लावून घोडा पळविला होता; परंतु इथे मात्र बाजीरावांच्या अनुपस्थितीत एकटी मस्तानी असहाय्य झाली, अगतिक झाली. ती सहनशीलतेची ढाल पुढे करून जगण्याची पराकाष्ठा करीत होती; परंतु अखेरीस ती कोसळली.

आजही मस्तानी-बाजीरावांचे इंदोर येथील वंशज म्हणतात ते खरेच! मस्तानीला मराठी मुलखाने न्याय दिला नाही. मस्तानी ही कधीच सत्तालोलुप नव्हती. महत्त्वाकांक्षी नव्हती. सुखलोलुप नव्हती. तसे असते तर एवढे बुंदेला येथील वैभव, ऐश्वर्य, आई-वडील आपला मुलुख सोडून ती हजार किलोमीटर एवढय़ा दूर पुण्यात आली नसती, यावरूनही ते सिद्ध होते. ती पुण्यात आली. राहिली. तिने इथली भाषा, पेहराव स्वीकारला. राऊंच्या पाठोपाठ काशीबाईंचे प्रेम मिळवले. मात्र ही पुण्याई तिच्यासाठी तुटपुंजी ठरली.

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात निर्दोष समाज हा भारतात कधीच नव्हता, आजही तो नाही. आणि तो तर तीनशे वर्षांपूर्वीचा काळ होता. परंतु, बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा प्रकाश मस्तानीच्या रूपात पाहिला होता. तो मस्तानीच्या रुपाने त्यांना मराठी मुलुखात पेरायचा होता; परंतु तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.
सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे बाजीरावांची राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले. व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज निखालस खोटा आहे.

मस्तानी बाजीरावांच्या जीवनात आली ते वर्ष आहे इ. स. १७२२. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. दुसरी गोष्ट मस्तानीमुळे गृहकलह पेटला असतानाही परकीय नादीर शहाचे आक्रमण होताच सबंध हिंदुस्थान वाचवण्यासाठी त्यांनी नर्मदेच्या तटावर सैन्य उभे केले होते. दक्षिणेत नादीर शहा उतरला नाही, यातील एक प्रमुख कारण बाजीराव होते. नादीर शहापाठोपाठ त्यांचे नासीरजंगाशी युद्ध झाले, त्याला पराभूत केले. हे युद्ध मोठे होते. आपल्यावर व मस्तानीवर होणारी बदनामी तलवारीच्या टोकावर झेलत त्यांनी मराठी राजकीय सत्तेची पुनर्रचना केली. त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. होळकर, पवार, खेर (बुंदेला) शिंदे या मराठा सरदारांची नर्मदेपलीकडे अभेद्य फळी उभी केली, तो त्यांच्या व्यवस्थापनाचा व दूरदृष्टीचा महनीय नमुना होता.

चारित्र्यसंपन्न, निव्र्यसनी, बुद्धिमान, कष्टाळू, अलोट देशप्रेम अशा बाजीरावांच्या अकस्मात मृत्यूने मराठी राजसत्तेवर दूरगामी परिणाम झालेले आपल्याला आढळतात. वयाच्या विसाव्या वर्षी ते पेशवे झाले आणि चाळिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे राजकीय आयुष्य फक्त २० वर्षांचे. या २० वर्षांत त्यांनी ज्ञात २२ लढाया केल्या. आपल्या सरदारांच्या ३००च्या आसपास लढायांचे व्यवस्थापन केले व मुख्य म्हणजे ते अजिंक्य राहिले. बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही हेच. ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गुलाब गळून पडला, ना त्याच्या सौंदर्यास किंमत, ना त्याच्या सुगंधास. तो फक्त अणकुचीदार काटय़ांचा धनी झाला.

कॉपी-पेस्ट,. लेखक अज्ञात.

 #सूर्याची सावली...." #अन् पहाटे कादंबरी संपवून वाटलं बापाच्या उबदार मिठीला,  कधीच न सुटणारी अशी  घट्ट"मिठी" मारावी"... ...
15/04/2023

#सूर्याची सावली....

" #अन् पहाटे कादंबरी संपवून वाटलं बापाच्या उबदार मिठीला, कधीच न सुटणारी अशी घट्ट"मिठी" मारावी"...

#काल राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक मित्र "नितीन थोरात" लिखित "सूर्याची सावली" ही कादंबरी हातात पडली.

#मूळात नितीन थोरातांच्या सर्व बारा कादंबऱ्या वाचलेल्या परंतु त्या बाराही कादंबऱ्यामधे मनाला सर्वात जास्त भावलेली निर्मिती म्हणजे "सूर्याची सावली".

लेखक जेंव्हा कादंबरीची सुरुवात या वाक्यापासून करतो की,
" #पुरुष जेंव्हा बाप होतो तेंव्हा त्याच्यातली आई जन्म घेते" अन् तेंव्हाच खऱ्या अर्थाने "वाचक" या कादंबरीच्या प्रेमात पडतो..

#बऱ्याच लेखकांनी जन्म देणाऱ्या"आई" वर भरभरून लिखाण केलं आहे. परंतु सोसनारा , भोगणारा अन् झटणारा बाप लिहिला, या कादंबरीतून तो "नितीन थोरातांनीच".

#कादंबरीतला बाप(साजबा) जेंव्हा तळपत्या उन्हात आपल्या बायकोला अन् लेकराला ऊन लागू नये म्हणून, आग ओकनाऱ्या सूर्याच्या उन्हाला आपल्या अंगावर झेलून, लेकराला आपल्या देहाची सावली देतो तो बाप खरच वाचण्याजोगा आहे.

#स्वतःशीच एक खंत आहे की आजवर ही साहित्याची कलाकृती आपल्या हातात का पडली नाही?.

जगाची दुःख डोळ्यात साठवुन लेकरासाठी आनंदाची उधळण करणारा बाप मी खरचं यातुन अनुभवला.

#कठोर वाटणाऱ्या बापाच्या डोळ्यातील आश्रुबिंदू रेखाटतांना नक्कीच लेखक सुद्धा त्या रात्री रढलाच असेल यात तिळमात्र शंका नाही.

हल्ली मित्रांनो आपण आपल्या "बापाला" एका वर्तुळात फिरताना पाहतोय परंतु त्याचा परीघ हा किती अफाट आहे अन् त्या #परिघा पल्याड ही तो आपल्या रक्ताच्या लेकरांसाठी "आलेख" निर्माण करतोय हे या बापाला वाचूनच कळेल.

रात्री कादंबरी वाचताना अंधार भरल्या काळोखात दमून थकून येऊन दुर्डीतली भाकर अन् ठेचा खानाऱ्या माझ्या बापात मला तो " #साजबा" दिसला...

कादंबरीतल्या बापाचं हे वाक्य कसलं मर्मभेदी आहे बघा,
जेंव्हा "साजबा" आपल्या पत्नी ला म्हणतो की,

" #उद्या माझ्या मढयाला जेंव्हा आग दिली जाईल अन् माझ्या लेकाला अंघोळ घातली जाईल ना, तेंव्हा माझं लेकरू थंडीने काकडलं जाऊ नये, म्हणून त्याला माझ्या जळणाऱ्या देहाजवळ बसवं. म्हणजे त्याला थंडी वाजणार नाही.. बसवशिल ना?😥

हा असतो बाप अन् तो रेखाटला " #सूर्याच्या सावलीने"

#प्रश्न जर हा असेल की कादंबरी का वाचावी?
तर दररोज तळमळनारा बाप समजून घ्यायला अन् त्याचे अपार वेदना अनुभवायला आपण ही कादंबरी वाचायला हवी.

घामानं ओलचिंब होणारं अंग अन् फोडाणे सजलेला हात ओल्या डोळ्यांनी जरी आपल्याला बघता आला ना तर वाटतं लेखकानं लिहिलेल्या त्याच्या कादंबरीचं मोल सार्थकी ठरलं..

नितीन दादा शेवटी एवढच म्हणेल "बाप समजायला बाप व्हावं लागतं"...❤️

हॅट्स ऑफ सल्यूट यार नितीन दादा....
एकदा नक्कीच वाचावी अशी कादंबरी

#अनामिक 💍❤️

#सूर्याची सावली
नितीन थोरात

कधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवऱ्यात फिरत असल्याचे जाणवते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्ण...
29/03/2023

कधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवऱ्यात फिरत असल्याचे जाणवते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्णाने जे जे केले ते त्याची माया. आपण जे जे केले ती माया नाही. माया जमा केल्यास काया-वाचा बंद होते माया काय आणि पाप पुण्याचा हिशोब काय ! सारे म्हणे साठून राहते.

संचित.

माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते " आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है ! " काही लोक मात्र कल - आज - और- कल सारेच बघतात. काही मात्र भूत काळात रममाण होतात. उपाय शोध चालू असतो. मात्र तुम्ही आहात भोवर्‍यात.

जो खोल आहे.खोल, अंधारी, कला, गडद. ज्याची खोली कधीच व्यापता येणार नाही असा काहीसा.

पु.ला.नची "निळाई" पण अशीच आहे. खोल, गडद ; पण निळेशार. कृष्ण गर्तेत भोवऱ्यात सापडता त्यातून दिसत नाही. बाहेर पडता येत नाही. तुम्ही मात्र खोल आणि अधिकच खोल जात राहता. मर्जी सह अथवा मर्जी खीलाफ.

राम म्हणतो, एक पत्नी व्रत म्हणजे चारित्र्य. रावणाचा वध स्वहस्ते करणे धर्म आणि कर्तव्य. कृष्णाने केली ती माया. कंस, जरासंध यांचा वध झालाच कि.

मात्र महाभारताच्या कुरुक्षेत्री नामानिराळा राहिला तो कृष्ण. कृष्ण म्हणजे सावळा, "कृष्ण" द्रौपदीचा सखा आणि दीर, सोळा हजार एकशे सात स्त्रियांचा पती,रुक्मिणी आणि सत्यभामेचा पट्ट-राणी म्हणून लाड करणारा " मधुसूदन " . कृष्ण भारी होता. राम सुध्दा भारी होता.

निळाई आहे कि "कृष्ण-विवर" ? माया मात्र सारीकडेच. धर्म, कर्तव्य याही युगात आहेतच. मोहिनी आज हि आहे. काय आहे काय नाही हिशोब लागण्यासारखा नाहीच मूळी. कारण या सार्याच गोष्टी भौतिक, क्षणिक, क्षण-भंगुर.

आपण फक्त फिरत राहतो. ........एका विवरामध्ये.

प्रेमाच सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगताच येत नाही.=================================प्रेम हि काही सजवलेली गोष्ट नव्हे, प...
27/03/2023

प्रेमाच सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगताच येत नाही.
=================================

प्रेम हि काही सजवलेली गोष्ट नव्हे, प्रेम हे घडवलं जात
नाही किंवा ते संपादन सुद्धा करता येत नसतं. घडवलं
जाणारे किंवा संपादित केलं जाणारं प्रेम हे प्रेम असूच
शकत नाही. प्रेम हि एक निसर्गदत्त जाणीव आहे,
किंबहुना प्रेम हा निसर्गाला आणि माणसाला बांधणारा
एक अदृश्य धागा आहे. प्रेमाची व्याख्या करता येत नाही.
शब्द बदलता येतात किंवा समानार्थी शब्द वापरून गद्याच किंवा काव्याच सौंदर्य वाढवता येत असतं. परंतु प्रेमाच
अशाप्रकारे सौंदर्य वाढवण्याची गरजच नसते.प्रेम हे शब्दातीत आहे किंवा ते केवळ शब्द नव्हतेच. प्रेम हि ' आय लव्ह यु' सारखी सागर किनाऱ्यावरची वाळूची अक्षरं नव्हेत, कि जी
जीवनातल्या वादळा मध्ये किंवा भरती ओहोटीच्या लाटांमुळे पुसली जात असतात.

प्रेम,भक्ती आणि श्रद्धा या त्रिसूत्रीमुळे जीवनाला एक अलौकिक असा अर्थ प्राप्त होत असतो. प्रेम ,भक्ती आणि श्रद्धा याचा अलौकिक धागा माणसाच्या जीवनात जो तुटकपणे वागणे असते ती भावना तोडून टाकतो....
===============================

महिला दिनानिमित्त ची अनपेक्षित भेट...खरंतर सुखद धक्काच!!!अमृता प्रीतम,विश्वास पाटील, रंगनाथ पठारे,माधवी देसाई, रणजीत देस...
05/03/2023

महिला दिनानिमित्त ची अनपेक्षित भेट...
खरंतर सुखद धक्काच!!!

अमृता प्रीतम,विश्वास पाटील, रंगनाथ पठारे,माधवी देसाई, रणजीत देसाई...इतक्या मोठ्या दिग्गज लेखकांच्या यादीत आपलं नाव येणे आणि इतकं सविस्तर 'इब्रु' बद्दल व कथासंग्रहात आलेल्या माझ्या मनोगताबद्दल लिहिलं जाणं हे आनंददायी तर आहेच आणि एक लेखक म्हणून जबाबदारी वाढवणारं देखील आहे.

अमृता ते प्रियांका व्हाया नागकेशर आणि सातपाटील कुलवृत्तांत!

स्त्री आणि तिचं स्वतःचं असलेलं भावविश्व, एक लेखक म्हणून तिच्या भावविश्वातील स्त्रियांची व्यथा आणि पुरुष लेखकांच्या नजरेतून स्त्रियांची रेखाटली जाणारी प्रतिमा यांचा थोडक्यात आढावा येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त प्रस्तुत लेखात घेतला आहे. या लेखात अमृता प्रितम यांच्या१९७६ साली प्रकाशित झालेल्या आत्मकथेपासून ते प्रियांका पाटील यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'इब्रु' या कथा संग्रहापर्यंत मला भावलेल्या पुस्तकांमधून स्त्रिच्या भावविश्वाचं असलेलं चित्रण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, सहस्त्रकाची कवयित्री म्हणजे अमृता प्रितम - ज्या आपल्या मर्जीनुसार आयुष्य जगल्या, अगदी मुक्तपणे...पण स्वैर नाही. वयाच्या सहाव्या वर्षी प्रितम सिंह यांच्याशी झालेला विवाह, पण संवेदनशील मनाचा साहिर भेटल्यानंतर त्याच्यावर असलेलं प्रेम न लपवल्यामुळे वैवाहिक आयुष्यात माजलेली खळबळ... पण दुर्दैवाने फाळणीमुळे साहिरचं ही प्रेम हरवलं. त्या विरहातून बाहेर पडताना झालेला इमरोजशी परिचय. अमृता-इमरोज ४० वर्षांचा सहवास... अमृता- इमरोज म्हणजे कविता आणि प्रतिमा यांचं नातं. त्यांच्या बंडखोर निर्णयामुळे बरेचदा शंकास्पद आलेले कटूअनुभव हे त्यांच्या कविता आणि कथांमधून चित्रित झाले आहेत. ' कहानियो के आंगन मे ' या कथासंग्रहातील कथा त्या काळाच्या मनाने अत्यंत धाडसी होत्या. या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद माधवी देसाई यांनी केला होता. त्यातली दुःख भोग वाट्याला आलेल्या स्त्रियांची कहाणी मनाला हेलावून टाकते. त्यांचं 'रसीदी टिकट ' हे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्याच्या जमाखर्चाच्या कागदावर लावलेले पावतीचे तिकीट आहे असं त्या म्हणतात. म्हणूनच मीचं काय माझ्याप्रमाणे अनेकजण आजही अमृताजींचे चाहते आहेत.

'नाच ग घुमा' हे माधवी देसाई यांचं आत्मकथन वाचलं. जेव्हा हे पुस्तक हाती लागलं आणि वाचायला घेतलं... आणि अगदी झपाटल्याप्रमाणे अक्षरशः दोनच दिवसात पूर्ण केलं... केलं पण मन अगदी सुन्न झालं. हृदय अगदी कोणीतरी पिळवटून टाकल्यावर जी अनुभूती येईल तसं मला दोन तीन दिवस जड जड झालं होतं.
त्यापूर्वी माधवी देसाईंची फक्त... रणजित देसाई यांच्या पत्नी, एवढीच एक ओळख मला माहिती होती. १९८८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. आज साधारण ३५ वर्षांनंतरही पुरुषप्रधान मानसिकतेत फारसा फरक पडला आहे, असं मला जाणवतं नाही, हे ही खेदानचं सांगावं लागतं. त्यामुळे ते वाचताना पुरुषांच्या उभारलेल्या खेळात आजची स्त्री ही कुठेतरी रिंगण धरून " नाच ग घुमा...कशी मी नाचू" या ठेक्यात गोल फिरत आहे, तो ठेका, ते रिंगण भेदण्याचं धाडस तिच्याकडे म्हणजे आमच्या पिढीतील स्त्रियांकडे आज ही नाही, कदाचित कुटुंब व्यवस्था मोडकळीस येऊ नये म्हणून ही तिने स्वखुशीने हा फेर स्वीकारला असेल ...कारण रिंगण सोडलं तर मुलांची होणारी ससेहोलपट आपल्यामुळे आहे, हा अपराधभावही जगणं असह्य करतो.
माधवी देसाई या पूर्वाश्रमीच्या सुलोचना भालजी पेंढारकर. त्याकाळचं अग्रेसर असलेले मराठीतील दिग्दर्शक, निर्माता आणि खूप मोठ्ठ नाव... त्यांना तीन बायका आणि चार मुलं. मुलांना मिळालेला सर्वसामान्य मुलांचा संस्कार कुठेही त्यांच्यात अहंकार निर्माण करत नाही. शिक्षण चालू असतानाच लहान वयात चांगलं स्थळ आलं म्हणून गोव्याला नरेंद्र काटकर यांची पत्नी म्हणून गेल्यानंतर एका सर्व सामान्य व्यक्तींप्रमाणे एक साधं आयुष्य विना तक्रार जगत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षिकेची नोकरी धरली. इतकं साधं आयुष्य त्या जगत होत्या की, त्या राहात असलेल्या चाळीत एकदा लतादीदी रात्रभर राहून गेल्या तरी कोणाला साधी शंका ही आली नाही की ह्या त्या लता मंगेशकर असतील. याच काळात लिखाणाची आवडही रुजली. काटकरांपासून तीन मुली झाल्या... पण नियतीने खेळ केला नरेंद्र काटकरांचा अचानक झालेला मृत्यू हतबल करून गेला, पण वडिलांची शिकवण कितीही दुःख असेल तरीही घरात आतल्या खोलीत रडायचं आणि बाहेर हसतंच लोकांपुढे यायचं, कारण जगाला तुमच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. तशातच भेट झाली रणजित देसाई यांच्याशी आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. प्रेमाच्या आणा भाका व्यक्त करणारी कितीतरी पत्र त्यांनी पाठवली. ते म्हणायचे, या जगात माझ्यासाठी लोकसंख्या दोनच... एक मी आणि तू सोबत असशील तर तू,अशी दोन. म्हणजे लेखिका म्हणते की माझ्या जागी दुसरी जरी कोणी असती तर तीही भुलली नसती तर विशेष. त्यांच्या बरोबर लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला जी गेल्या बावीस वर्षांपासून मनोरुग्णालयात होती तिला घटस्फोट दिला, जो सहज सोपा होता. पण लग्न करून देसाई यांच्या घरी कोवाडला गेल्यानंतर एक माणूस म्हणून आलेला अनुभव कसा होता हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. तरीही एका नावाजलेल्या लेखकाची दुसरी पत्नी जिचं पाहिलं लग्न झालेलं आहे अशा स्त्रिला समाजाकडून मिळणारे टोमणे आणि त्यांना नवऱ्याने प्रतिउत्तर ही न देणं ही मनाला अस्वस्थ करणारी बाब नियमीत घडत असे. तरीही २२ वर्षे मनोरुग्णालयात असणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही भेटून तिला चांगलं करण्याचं, त्यांच्या मुलींची आईशी भेट घालून देण्याचं सत्कार्य त्या करत होत्या. त्यांच्या लेखनाचं श्रेयही समाज, देसाई यांची पत्नी म्हणूनच देत होता. पण त्यांची तगमग, होणारी घालमेल आणि १४ वर्षानंतर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवाय असं नवऱ्याकडून ऐकल्यानंतर झालेली घुसमट, कुचंबणा ही बरेचदा अनेक स्त्रियांची होत असते. त्यावेळी त्यांच्या कधीही पदमश्री न मिळालेल्या वडलांनी दिलेली समज- 'वासनेतुन निर्माण झालेल्या नात्यांचा शेवट असाच होतो' हे तत्वज्ञान जास्त मोलाचं वाटतं. समाजाने दिलेल्या पुरस्कारापेक्षाही विचारांमधली प्रगल्भता ही किती श्रेष्ठ असते याचं यथार्थ विश्लेषण या आत्मकथानात आहे.
म्हणूनच लेखिका म्हणते "आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं. ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्माची! अनेक रूपांत बदलत गेलेल्या भारतीय स्त्री जीवनाची! ती कपाळावरची रक्तरंजीत खूण असते! मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची आणि मोहाचीही! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा... बहुधा...."

ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांच्या 'नागकेशर ' या कादंबरीत राजकारणातील स्त्री पात्रांचं अतिशय रंजक आणि वास्तवादी चित्रण असल्यामुळे नागकेशरविषयी मला लिहावेसे वाटले. साधारण चारशे पानांची ही कादंबरी अतिशय प्रवाही असल्यामुळे एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. राजकीय पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबाची सत्ता, संपत्ती, अति महत्वाकांक्षा, ईर्षा ह्यामुळे होणारी वाताहत, त्याचे विदारक पण वास्तववादी चित्रण या कादंबरीत आहे.
बरेचदा आपण सर्वसामान्य माणसं राजकारणी लोकांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप अनभिज्ञ असतो आणि जे काही आपल्यासमोर येत असते त्या मागचे राजकारण वेगळेच असते. ज्या प्रमाणे झाडांच्या मूळ्यांची जमिनीखाली गुंतागुंत असते त्याचप्रमाणे मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचे चित्रण ह्या कादंबरीत दिसते.
सहकार महर्षी बापूराव डोंगरे देशमुख व त्यांचे बंधू बबन नाना ह्या दोन कुटुंबांची सत्ता, पैसा, लालसा, अहंकार ह्यामुळे होणाऱ्या वाताहातीचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. बापुरावांचे चिरंजीव प्रिन्स आणि बबनरावांचे चिरंजीव बाजीराव व त्यांच्या बायका शलाका आणि नेत्रा ह्यांच्यातील राजकीय शीत युद्ध हळूहळू चव्हाट्यावर येतं.
त्यांच्यातील रस्सीखेच ही लोकांच्या दृष्टीआड होऊ शकत नाही. प्रिन्स बरोबर विवाहासाठी दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर नाईलाजाने बबनरावांच्या पहिलवान पण गुडघ्यात भेजा असलेल्या बाजीरावाशी विवाहाच्या प्रस्तावास होकार देणारी नेत्रा प्रिन्सच्या सूड बुद्धीने इर्षेला पेटते. प्रिन्स मात्र विवाहित असलेल्या शलाकाबरोबर विवाह करतो. शलाका दोन विवाह करूनही अतिशय विचारी व संयमी असल्याने , राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही आगेकूच करते. यावरूनच सुष्ट आणि दृष्ट प्रवृत्तींमुळे होणारे मार्गक्रमण सकारात्मक आणि नकारात्मक कसे असू शकते ह्याचा अनुभव वाचताना येतो. पोट आणि पोटचं ह्या दोन केंद्रबिंदूभोवती फिरणारं आणि प्रसंगी एकमेकांच्या कमरेखालच्या जीवनाचं सोयीनुसार होणार महाराष्ट्रातील पुरोगामी राजकारणाचं कादंबरीतील चित्रण महत्वपूर्ण आहे. मानवी मन, त्याच्या असणाऱ्या विशेषतः नकारात्मक प्रवृत्ती, संयमाचा अभाव ह्या गोष्टी राजकीय जीवनातही कशा धोकादायक ठरू शकतात , ह्याचे यथार्थ चित्रण करताना लेखक विश्र्वास पाटील यशस्वी झाले आहेत. कादंबरीतील वातावरण, साखरेचं राजकारण, मेडिकल कॉलेज काही पात्रांची आडनावे यामुळे कादंबरीतील कथानक नगर जिल्ह्यातलेच असावे असे वारंवार वाटते. प्रिन्स आणि शलाका ही पात्रे नायक तर बाजीराव आणि त्याची पत्नी नेत्रा हे खलनायकाच्या रूपातील वाटतात. मात्र शलाका विवाहित असूनही घटस्फोटाशिवाय प्रिन्स सोबत दुसरे लग्न करते, तो संसार तडीस नेते हे धाडसही स्त्री करू शकते. मराठी साहित्यात राजकीय पार्श्वभुमीचे चित्रण करणाऱ्या मोजक्या कादंबऱ्यांमध्ये नागकेशरचा समावेश होईल. ज्याप्रमाणे नागकेशर ही वेलवर्गीय वनस्पती शेतात आल्यास उभ्या पिकाला उध्वस्त करते, त्याचप्रमाणे राजकीय ईर्षा, लालसा, अतिमहत्वाकांक्षा राजकारणात फोफावल्याने कसा विनाश होतो, ह्याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे.

मराठी साहित्यातील सध्याचे महान लेखक डॉ. रंगनाथ पठारे , ज्यांच्या चाळीसहुन अधिक साहित्यकृती प्रकाशित आहेत, त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ अभ्यास करून लिहिलेली 'सातपाटील कुलवृत्तांत ' ही सातशे वर्षांचा अजस्त्र पट उलगडणारी कादंबरी, अतिशय रंजक आणि मानवी मनाच्या गुंतागुंती बरोबरच अनेक पैलू उलगडा करणारी कदाचित मराठीतील एकमेव कांदबरी. यातून लेखकाने देवनाथ या सध्याच्या काळातील विज्ञानवादी प्राध्यापक असूनही समाजासोबत राहण्यासाठी कर्मकांड स्वीकारणारा व्यक्ती स्वतःचा सातशे वर्षांचा कुलवृत्तांत उलगडतो. आयुष्यभर ज्या जातीच्या फोल अहंकारात माणूस जगतो पण त्याला त्याचा कुलवृत्तांत अभ्यासल्यावर ब्राह्मण, महार, अफगाण म्हणजेच मुस्लिम अशा विविध जाती-धर्मांच्या मर्यादा ओलांडून आपला वंशवेल कसा वाढला आहे याचे रंजक आणि वैचारिक चित्रण आपणापुढे उभे केले आहे. आपला मूळ पुरुष अफगाणी आहे हे सांगताना ही लेखक कचरला नाही. पण त्याच बरोबर विवाह, लैंगिक संबंध त्यात असलेली मोकळीकता, जी काळाप्रमाणे त्यावर आलेल्या मर्यादा, यावरून एक प्रगतीशील काळाचे दर्शन आपणास होते. त्याचबरोबर सृष्टीची अमर्याद महानता यापुढे माणसाचा कवडीमोल ही नसलेला अहंकार आपण किती जपतो हे लेखकाने यात व्यक्त केले आहे.
मला यात जास्त भावले ते म्हणजे ही सात पाटील -श्रीपती, साहेबराव, दसरत, जानराव, राखमाजी आणि पिराजी, शंभूराव आणि देवनाथ यांची जरी कहाणी असली तरी ती खऱ्या अर्थाने त्यांच्या पाटलीनीची कथा आहे असे वाटते. स्त्री प्रधानता म्हणजेच मातृसत्ताक पद्धती किंवा स्त्रीमधील खंबीर आणि परखड नेतृत्व, हे समाजाच म्हणजेच कुलवृत्तांत विकासास किती मोठ्या प्रमाणात हातभार लावणारा आहे हे कादंबरी वाचल्याशिवाय लक्षात येत नाही.यातील सर्व नायिका आणि सहनायिका ह्या त्या त्या काळाच्या मानाने खंबीर निर्णयक्षमता असलेल्या आणि प्रसंगी आक्रमक देखील आहेत. यातील आरेना, आफुबाई, भीमबाई, देहूबाई या सर्व धडाडीच्या आहेतच पण मला जास्त भावलं ते उल्फीचं पात्र. उल्फी ... तिच्या सोंदर्यावर पाहाताक्षणी प्रेमात पडणारा पिराजी, विवाह न करताही त्याच्या सोबत त्याच्या मुलाला जन्म देणारी ही कोल्हाटी समाजातील स्त्री पिराजीवर विषप्रयोग झाल्यावर घोड्यावरून निघून जाते आणि ऐका इंग्रज अधिकाऱ्याच्या आश्रयाला जाते. त्याच्यासोबत इंग्लंडलाही जाते. खूपच रंजक आणि प्रभावी पात्र आहे. ह्या कादंबरीतील स्त्री नायिका आणि सह-नायिका या धडाडीच्या कर्तृत्व असलेल्या स्त्रिया आहेत. म्हणूनच एक स्त्री म्हणून आपणही आपल्यातील वेगळेपण सिद्ध करणं ही काळाचीच एक गरज झाली आहे.

अमृता प्रितम यांच्या प्रमाणेच धाडसाने स्त्रियांच्या आजच्या काळातील व्यथा व्यक्त करणारी लेखिका प्रियांका पाटील ही तरुण मुलगी. तिचं 'इब्रु' हे पुस्तक वाचताना मन सुन्न होतं. स्त्री-पुरुष या मानवी नाते संबंधातील स्त्री मनाची होणारी घुसमट ही ह्या नव्या युगातील स्त्रीची आहे. 'इब्रु' या मूळ कन्नड शब्दाचा अर्थ दोघी असा होतो. ही समलिंगी संबंधांवर आधारित कथा आहे. यातील प्रत्येक कथा ही लेखिकेच्या वैचारिक प्रगल्भतेचं अवलोकन करते. समाजातील तृतीयपंथीयांना मिळणारी उपेक्षा अगदी सहजपणे 'त्याच्यातील ती' या कथेत मांडली आहे. मला सर्वच कथा जसं नास्तन, डेस्टिनेशन, निळावंती, रणमर्दिनी, बोगदा, मोक्ष या खूप भावल्या पण त्यातही रांजण या कथेत रूपकात्मक केलेला रांजणाचा उल्लेख तरुण स्त्रिच्या तारुण्य सुलभ भावनांचा होणारा कोंडमारा व्यक्त करतो. ब्रेस्ट कॅन्सरमुळे स्तन काढल्याने आलेलं अपुरेपण कथेतील नायिकेला तिच्या नवऱ्याकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे भरून निघतं. रणमर्दिनी या कथेतील बलात्कारीत स्त्री बाळाला जन्म देऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून यश शिखरावर जाते, ही खूपच प्रेरक कथा आहे.

लेखिका प्रियांका पाटील म्हणते "समाजाच्या साचेबद्ध चौकटीतून बाहेर फेकलेल्या या बायका- कुणी विधवा, घटस्फोटित, कुणी नवऱ्यानं वाऱ्यावर सोडलेली बाई, कुणी बिन बापाची, तर कधी वेश्या, तर कधी तृतीयपंथी, कधी अफाट बुद्धिमत्ता आणि सौंदर्य असूनही शापित आयुष्य जगणारी, तर कुणी तारूण्य सुलभ मोहाला-वासनेला संयमित करणारी, कुणी समाजातल्या थोतांडरूपी चालीरीतीना फाट्यावर मारणारी, तर कधी बलात्कारीत, तर कधी स्तन गमावलेली ...अशा अनेक हाडामासांच्या पात्रांनी माझं आयुष्य व्यापलं आणि मग त्या साऱ्या व्यथा कथारूपात माझ्या लेखणीतून अवतरु लागल्या" अशा समर्थ लेखिकेला प्रियांका पाटील या नव्या दमाच्या, धडाडीच्या लेखिकेला माझा सलाम!!!

म्हणूनच साहित्यातील स्त्री प्रतिमांचा त्यांच्या भावविश्वाचा अभ्यास हा अत्यंत महत्वपूर्ण असून काळाचे पडणारे पडसाद हे त्यांच्या व्यथा , वेदनांमधून लक्षात येतात. त्यांच्या विकासासाठी प्रेरणादायी वातावरण देणं,तिच्या निर्णयांना समजून घेणं ही समाजाची जबाबदारी आहे.
जागतिक महिला दिनाच्या सदिच्छा!!!

प्राचार्या डॉ.अनुश्री खैरे, Anuradha Dubey
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय, लोणी

Rangnath Pathare Sir Vishwas Patil Sir😊🙏

*आतून तुटलेली माणसं...*आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात,*त्यांच इमोशनल होण कालांतराने ...
21/02/2023

*आतून तुटलेली माणसं...*

आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात,*त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जातं.*

आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत.*त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही,ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.*
२+२=५ कुणी म्हणालं तरी ते "it's okay" म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.*एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.* समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.*काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.*
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण *जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.*
आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते,
संकटांची काळजी नसते कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीपासून इमोशनल होण्यापासून mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतची प्रवासाची सुरवात आतून तुटण्यापासून होते.
म्हणून...
*"कभी कभी दर्द भी अच्छा होता है"*

आज तरुणाईचा प्रॉमिस डे जोमात असेल.परंतु "वचन" या शब्दामागे किती उदात्त भावना दडली आहे,आपले  पुराण,इतिहास, साहित्य यात वच...
11/02/2023

आज तरुणाईचा प्रॉमिस डे जोमात असेल.
परंतु "वचन" या शब्दामागे किती उदात्त भावना दडली आहे,आपले पुराण,इतिहास, साहित्य यात वचन या संकल्पनेला किती महत्व आहे हे प्रेमाच्या लाटेत वाहून चाललेल्या युवा पिढीला ज्ञात नसेल!केवळ त्यांच्या माहितसाठी वचन या शब्दावर टाकलेला प्रकाशझोत!!
********************************************
रामायणात राजा दशरथा ने राणी
कैकयीला दिलेले वचन
तुझा पुत्र अयोध्येच्या राज सिंहासनावर बसेल!
रामाने दिलेले पित्याला दिलेले
वचन तुमचा वचनभंग होउ देणार नाही, वनवासात जाईन.

महाभारतात राजपुत्र देवव्रताने
पित्याच्या सुखासाठी "मी आजन्म ब्रम्हचारी राहीन"
ही केलेली भीष्म प्रतिज्ञा हे पण वचनच आहे.

"प्राण जाये पर वचन न जाये!"
हा हिंदू संस्कृतीने शिकवलेला बाणा!

" आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच!"
नरवीर सुभेदार तानाजीचा दृढ निश्चय "

,लोकमान्य टिळक,स्वा. सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, नेहरू आदी
देशभक्तांनी मायभूमीला स्वातंत्र्य
मिळवून देण्यासाठी उदधृत केलेली वचने

राम गणेश गडकरी यांचे प्रसिद्ध
नाटक एकच प्याला यातील
वचनाचे महत्व विषद करणारे
नाट्यगीत
सत्य वदे वचनाला नाथा ।
स्मरूनि पदाला या सुरविमला ।
वित्त परार्जित मानी विषसम ।
स्पर्शिन ना कधि मी त्याला ।
***********************************************

 #    पुस्तक झुंज    लेखक ना. स. इनामदार =================   पेशवा बाजीरावाने माळवा जिंकला आणि तो शिंदे आणि होळकर यांना ...
04/02/2023

#
पुस्तक झुंज
लेखक ना. स. इनामदार
=================

पेशवा बाजीरावाने माळवा जिंकला आणि तो शिंदे आणि होळकर यांना सुभेदारीत गेला आणि सुरवात झाली पेशव्यांचे सुभेदार म्हणून घ्यायची. मल्हारराव होळकर हे अग्रस्थानी, पण त्यांच्या आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई नंतर मात्र शिंदे होळकरांचं वैर वाढलं, शिंदे यानी पेशवाईत आपला जम असा बसवला की होळकरांची दौलत मागे पडू लागली. तुकोजी होळकरांच्या जाण्याने पुण्यात नवे डावपेच होऊ लागले. त्यात शिंद्यानी तुकोजींचे मोठे पुत्र काशीराव यांना हाताशी धरून दुसऱ्या मुलाचा खून करवला,

आणि सुरुवात झाली नव्या पर्वाची

तुकोजी चा लेकावळा पोरगा यशवंतराव होळकर कसाबसा वाचून माळव्यात पोहचतो आणि सुरु होते पराक्रमाची गाथा.

शिंद्याबरोबर लढाई करून पुणे काबीज केलं जातं पण पेशवे पळून कोकणात जातात. पेशवे यशवंतरावाला सुभेदारीची वस्त्र देत नाहीत. पुढे पेशवे इंग्रजशी तह करतात आणि यशवंतराव होळकर ह्या इंग्रजी सत्ते विरोधात बंड पुकारतात आणि पंजाब पर्यंत मजल मारतात. जोधपूर, जयपूर, उदयपूर सारख्या सत्तधारी मुलखावार जोरदार पकड यशवंतराव यांनी मिळवली.

आजारी पडून ह्या पराक्रमी नायकाचा शेवट होतो.

ना.स.इनामदार यांची "झुंज" त्यांच्या इतर कादंबरी सारखीच उत्कंठावर्धक आहे. सुभेदार यशवंतराव यांच्या बद्दल वाचनात आलं नव्हतं पण ह्या कादंबरी ने ती तहान भागवली. कादंबरी चा शेवट फार जबरदस्त साकारला आहे तो वाचून "स्वामी" कादंबरी ची आठवण तुम्हाला झाल्या शिवाय राहणार नाही.
-----------------------------------------------------------------------------

मा. मारुती चितमपल्ली, जेष्ठ लेखक व  निसर्गतज्ञ, यांनी ‘कोणते झाड कुठे लावले पाहिजे?’ यावर आपल्यासाठी चार्ट तयार केला आहे...
18/01/2023

मा. मारुती चितमपल्ली,
जेष्ठ लेखक व निसर्गतज्ञ,
यांनी ‘कोणते झाड कुठे लावले पाहिजे?’
यावर आपल्यासाठी चार्ट तयार केला आहे.
ही अतिशय दुर्मिळ माहिती आहे.

भारत पाकिस्तान मॅचकाय ओव्हर होती शेवटची यामध्येएकेरी धावदुहेरीतिहेरीचौकारषटकार आणिकॅचस्टम्पिंगतसेच बोल्ड देखील मजेशीर गो...
26/10/2022

भारत पाकिस्तान मॅच
काय ओव्हर होती शेवटची

यामध्ये

एकेरी धाव
दुहेरी
तिहेरी
चौकार
षटकार

आणि
कॅच
स्टम्पिंग

तसेच बोल्ड देखील

मजेशीर गोष्ट म्हणजे

वाईड
नो बॉल

फ्री हिट

काय हवंय एका ओव्हर मध्ये..?

अशीच एक ओव्हर तुमच्या आयुष्यात येवो अन् तुमचं सर्व दुःख पीडा हरून तुम्हास सुख समृद्धी उत्तम आरोग्य लाभो अशा या भाऊबीज व दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्वांनाच "हार्दिक व विराट" शुभेच्छा

Address

Kosti Galli. Chorakhali
Kallam
413405

Telephone

+919420202729

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swa.sameer-Tatya sontakke wachnalay Chorakhali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swa.sameer-Tatya sontakke wachnalay Chorakhali:

Share

Category