17/09/2021
शेतकऱ्यान मध्ये पौष्टिक तृनधान्य प्रती जागरूकता निर्माण करण्यात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अत्यंत महत्वाची – खाजदार उन्मेषदादा पाटील
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र,जळगाव आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण आहार आणि पोषण परसबाग कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र जळगाव या ठिकाणी माननीय पंतप्रधान यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून महिला व विशेष करून मुलींच्या पोषण विषयक समस्यांचे निर्मुलन करण्याकरिता व आहारातील पौष्टिक तृणधान्य समावेश वाढवा यासाठी अयीजीत करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा.खासदार श्री उन्मेशदादा पाटील , जळगाव मतदार संघ,श्री.संभाजी ठाकूर,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,जळगाव, डॉ ए.ए. शेख ,प्रमुख शास्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र,डॉ संजीव पाटील,तीळ पैदासकार,डॉ सी.डी.बडगुजर,उद्यांविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र,जळगाव, श्री उल्हास पाटील ,जिल्हा समन्वय अधिकारी, माविम,जळगाव, कृषिभूषण श्री अनिल सपकाळे, श्री मिलिंद पाटील, पंचायत समिती सदस्य, श्री हर्शल चौधरी , श्री सपकाळे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. खासदार श्री उन्मेषदादा पाटील यांनी महिला व मुलींच्या आहारातील पोषक तृणधान्यचे विशेष महत्व असून सरकार “वोकल फॉर लोकल”, “पर ड्रॉप मोर क्रॉप”, “संकल्प से सिद्धि तक” च्या अनुषंगाने पौष्टिक तृनधान्यला जागतिक पातळीवर प्रसिद्धी देण्याकरिता प्रयत्नशील आहे. पौष्टिक तृनधान्य पासून निर्मित पदार्थचे संतुलित पोषण व आरोग्यास उपयोगीते बाबत जागरूकता करण्यात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
या वेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री संभाजी ठाकूर कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया या योजने बद्दलची माहिती सांगून अधिकाधिक शेतकरी महिला गट यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ हेमंत बाहेती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पौष्टिक तृनधान्य पिके प्रतिकूल हवामानात तग धरतात व चांगले उत्पन्न देतात्. जैव-संवर्धनाचा माध्यमातून देखील पौष्टिक तृनधान्य पिकात सूक्ष्म पोषक द्रव्यांची मात्रा वाढविण्याकरीताचे संशोधन याबाबत माहित सांगितली.
सदर कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात श्री तुषार गोरे यांनी पोषक तृणधाण्याचे आहारातील महत्व या विषयी सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी जवळपास ७२ महिला,४६ शेतकरी उपस्थित होते. उपस्थित महिलांना व शेतकऱ्यांना २०० फळझाडे व १०० भाजीपाला बियाणे किटचे वाटप इफको मार्फत करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व शेतकरी यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर नारळ ,पेरू आदी. फळझाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ,जळगाव व इफको येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्वाती कदम व आभार प्रदर्शन श्री संजीव पाटील,क्षेत्र प्रबंधक इफको यांनी केले.