Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO

Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO Nation Building Organization CEO- Nitin Vasant Nerkar
स्वच्छ भारत व जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त संस्था.

नेयुम संस्थेच्या सहकार्याने दोनगाव बुद्रुक येथील बचत गटाला माती परीक्षण किट उपलब्ध झाली. गावातच आता माती परीक्षण केंद्र ...
23/02/2026

नेयुम संस्थेच्या सहकार्याने दोनगाव बुद्रुक येथील बचत गटाला माती परीक्षण किट उपलब्ध झाली. गावातच आता माती परीक्षण केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बचत गटाला ही रोजगाराची संधी मिळाली. गावकऱ्यांनी नेयुम संस्थेचे आभार मानले.

जमीन सुधारणा व ग्रामीण उपजीविका उपक्रम 🌱नेयुम संस्थेच्या वतीने दोनगाव बुद्रुक येथे महिन्याभरापूर्वी जैविक कीटकनाशक बनविण...
31/01/2026

जमीन सुधारणा व ग्रामीण उपजीविका उपक्रम 🌱
नेयुम संस्थेच्या वतीने दोनगाव बुद्रुक येथे महिन्याभरापूर्वी जैविक कीटकनाशक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणात तयार केलेल्या जैविक औषधांची फवारणी पीक प्रात्यक्षिक म्हणून गावरान मिरची पिकावर करण्यात आली.
🌶️ आज या मिरची पिकातून निघालेल्या मिरचीचा तोडा दाखवताना महिला, शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुढील वर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
👩‍🌾 बैठकीत महिलांसोबत विविध कृषी आधारित उद्योग-व्यवसायांवर चर्चा करण्यात आली.
➡️ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)
➡️ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
या योजनांचा लाभ घेऊन गाव पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🐄 तसेच ग्राम संघाच्या निधीतून पशुखाद्य तयार करण्यासाठी मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🤖 कृषी क्षेत्रात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापराविषयीही माहिती देण्यात आली.
👉 नैसर्गिक शेती, महिला सक्षमीकरण व ग्रामीण उपजीविकेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!

🌱 नैसर्गिक शेतीकडे एक पाऊल 🌱जमीन सुपीकता व ग्रामीण उपजीविका कार्यक्रमांतर्गत📍 शनिवार, दिनांक 27 रोजी📍 दोनगाव बुद्रुक, ता...
28/12/2025

🌱 नैसर्गिक शेतीकडे एक पाऊल 🌱
जमीन सुपीकता व ग्रामीण उपजीविका कार्यक्रमांतर्गत
📍 शनिवार, दिनांक 27 रोजी
📍 दोनगाव बुद्रुक, तालुका धरणगाव येथे
जैविक कीटकनाशक निर्मिती प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश
✔️ जमिनीची सुपीकता वाढवणे
✔️ सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढवणे
✔️ रासायनिक औषधे व खते यांचा वापर कमी करणे
✔️ अल्प खर्चिक व नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब
✔️ शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे
✔️ विषमुक्त व पर्यावरणपूरक शेतीचा प्रसार
✔️ हवामान बदलाच्या जोखमीला सामोरे जात उत्पन्नाची हमी मिळवणे
या प्रशिक्षणात नैसर्गिक शेतीचे अभ्यासक श्री. भरतसिंग राजपूत यांनी
🌿 जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, रामबाण, गार्बेज एंजाइम
यांचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे तयार करण्याची पद्धत दाखवली.
हा उपक्रम नेहरू युवा मंडळ संस्थेच्या वतीने राबविण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन नेरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना,
“हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेती वाचवायची असेल तर नैसर्गिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नामुळे तरुण पिढी सशक्त व निरोगी राहील,” असे प्रतिपादन केले.
तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीतील काही भाग नैसर्गिक शेतीसाठी राखून ठेवावा, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणात
👩‍🌾 कृषी सखी शितल पाटील
👩‍🌾 सीआरपी कल्पना पाटील
🥬 गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी
यांची उपस्थिती लाभली.
🌾 नैसर्गिक शेती – शाश्वत भविष्याची किल्ली! 🌾

#नैसर्गिकशेती #जैविकशेती #विषमुक्तअन्न
#जमीनसुपीकता #ग्रामीणउपजीविका
#नेहरूयुवामंडळ #शेतकरीसशक्तीकर

27/09/2025
🌳🐦‍⬛पक्षी थांबे, कामगंध, चिकट सापळ्यातून कमी खर्चात पिक सरंक्षण शक्य दोनगाव बु. येथे केव्हीके व नेयुम संस्थेच्या वतीने प...
15/09/2025

🌳🐦‍⬛पक्षी थांबे, कामगंध, चिकट सापळ्यातून कमी खर्चात पिक सरंक्षण शक्य
दोनगाव बु. येथे केव्हीके व नेयुम संस्थेच्या वतीने पिक सरंक्षण प्रशिक्षण

🔰 नैसर्गिक तंत्रातून जमीन सुधारणा व उपजीविका वाढ उपक्रमा अंतर्गत दि. १३ रोजी दोनगाव बुद्रुक तालुका धरणगाव येथे महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
🔰 या वेळी कापूस पिकातील कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रासायनिक फवारणी ऐवजी चिकट सापळे, कामगंध सापळे, सापळा पीक, पक्षी थांबे या साधनांचा वापर करून कमी खर्चात पिक सरंक्षण करणे शक्य असल्याचे प्रात्यक्षिकातून सांगण्यात आले.

🔰 कृषी विज्ञान केंद्र जळगाव व नेयुम संस्थेच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात कापूस प्रकल्पाच्या वायपी मयुरी देशमुख व यशदा प्रशिक्षक नितीन नेरकर यांनी माहिती दिली.
🔰 कपाशी पिकातील कायिक वाढ थांबवण्यासाठी गळ फांदी व शेंडा खुड करावा, रासायनिक फवारणी कमी करून जैविक घटकांचा वापर वाढवावा. चिकटसापळे, कामगंध सापळ्यामुळे रसशोषक किडींचा अडकाव करता येतो. कामगंध सापळा नर किटकांना आकर्षित करून त्यांना अडकवतो. पक्षी थांबे यांची पिकात एकरी संख्या वाढवावी. त्यांच्या कार्यपद्धतीची प्रात्यक्षिकातून माहिती दिली.
🔰 शेणखत व हिरवळीच्या खतातून जमीन सुधारणेवर भर देण्याबाबत आवाहन केले. या पद्धतीचा पिकांमध्ये अवलंब करण्याचा निर्धार महिलांनी केला. महिला शेतकरी गटाला उत्पादक गट बांधणी व सेंद्रिय शेतीची पुस्तिका देण्यात आले. कृषी सखी शीतल पाटील, सीआरपी कल्पना पाटील व महिला बचत यांचे सहकार्य लाभले.

नेयुम संस्थेच्या वतीने अनेमिया मुक्त गाव मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २९ रोजी दोनगाव बुद्रुक ता. धरणगाव येथे महिलांची ...
30/08/2025

नेयुम संस्थेच्या वतीने अनेमिया मुक्त गाव मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २९ रोजी दोनगाव बुद्रुक ता. धरणगाव येथे महिलांची हिमोग्लोबिन तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १० ते ५० वयोगटातील ९७ महिलांचे रक्ताचे नमुने संकलित केले. शिबिरास तालुका आरोग्य विभाग, सहायक ट्रस्ट मुंबईचे सहकार्य लाभले.

Nehru Yuva Mandal (NYM) organization held a meeting today at Dongaon Bu. regarding the selection of anemia-free villages...
07/08/2025

Nehru Yuva Mandal (NYM) organization held a meeting today at Dongaon Bu. regarding the selection of anemia-free villages. The meeting was attended by the village sarpanch and women. What is anemia?, its causes, serious consequences, treatment, nutritious diet, nutrition garden, distribution of indigenous seeds and anemia-free village campaign were given by the president of NYM organization Nitin Nerkar. The village selection received a good response from women.

dipartment Maharashtra DGIPR #, of Environment, Forest & Climate Change, Government of India, Jalgaon, jalgaon,

♦️♦️गत दोन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी, विविध कीड, रोग, योग्य बाजारपेठ, हमी भावाचा अभाव अशा मो...
20/07/2025

♦️♦️गत दोन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी, विविध कीड, रोग, योग्य बाजारपेठ, हमी भावाचा अभाव अशा मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. हे ओळखून नेहरु युवा मंडळ संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील पाच गावामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने ‘अति घन लागवड व कमी खर्चात कापूस गुणवत्ता वाढ’ प्रकल्प हाती घेतला आहे.
धानोरा, मेहू, जोगलखेडा, आव्हानी, दोनगाव या गावांमध्ये शेतकरी सभा घेवून प्रकल्पाची माहिती दिली जात आहे. यात गळ फांदी काढणे, शेंडा खुड, प्रकल्पाचा उद्देश, लाभार्थी निवड केली जात आहे. प्रकल्पात महिला शेतकऱ्यांचा मोठा सहभाग मिळत आहे.
फायदे
🌾🌳🌳अति घन लागवडी मुळे एकरी झाडांची संख्या वाढते.
👆उत्पादन खर्चात बचत.
👆कापूस झाडावरील गळ फांदी, (अनावश्यक फांदी ) व शेंडा खुड केल्याने पिकात हवा खेळती व सूर्यप्रकाश भरपूर राहते.
👆बुरशी व इतर रोगांची लागण होत नाही.
झाडाची प्रतिकारक्षमता वाढते.
👆 नैसर्गिक उपचारामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्चात बचत होते.

ॲनेमिया फ्रि इंडिया फोरम’ ने पुढाकार घेवून रक्तक्षय मुक्त गाव करण्यासाठी जामनेर तालुक्यातील टाकळी बु. गावाची निवड केली आ...
21/06/2025

ॲनेमिया फ्रि इंडिया फोरम’ ने पुढाकार घेवून रक्तक्षय मुक्त गाव करण्यासाठी जामनेर तालुक्यातील टाकळी बु. गावाची निवड केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीत शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक ट्रस्टचे प्रमोद शिंदे व यशदा प्रशिक्षक नितीन नेरकर यांनी मार्गदर्शन केले.
ॲनेमिया फ्रि इंडिया फोरम’ अंतर्गत यशदा पुणे व सहाय्यक ट्रस्ट, तसेच जनसहयोग ग्रामीण विकास संस्थेमार्फत टाकळी बु. गावात रक्तक्षय (ॲनिमिया) मुक्त गाव’ ही संकल्पना अमलात येईल.

११ ते ४९ वयोगटातील महिलांची होणार HB तपासणी.
शरीरातील रक्त व ऑक्सिजन वाढविण्यावर भर
परसबागेसाठी देशी बियाणे देणार.
प्रत्येक घरी सेंद्रीय पोषण परसबाग.
बचत गटातील महिलांचा विशेष सहभाग
गाव रक्ताक्षयमुक्त करण्यासाठी दीड वर्ष विशेष उपक्रम

जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये केव्हीके जळगाव , कृषी विभागतर्फे ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभिय...
03/06/2025

जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये केव्हीके जळगाव , कृषी विभागतर्फे ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाच्या निमित्ताने कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्राने विकसित केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान गावागावात पोहचत आहे. महिला, शेतकरी यांच्याशी कृषी संबंधित विषयांवर चर्चा होत आहे. या अभियानात सहभागाची संधी मिळाली....

धानोरा येथे बीजप्रक्रिया, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन  जळगाव -  धरणगाव तालुक्यातील धानोरा येथे नेयुम व जनसहयोग फौंडेशनच...
24/05/2025

धानोरा येथे बीजप्रक्रिया, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन
जळगाव - धरणगाव तालुक्यातील धानोरा येथे नेयुम व जनसहयोग फौंडेशनच्या वतीने शुक्रवार दि. २३ रोजी शेतकरी गटासाठी खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. पेरणीपूर्वी शेतजमिनीची मशागत, बीज प्रक्रिया, मिश्र पिक, एकात्मिक कीड नियंत्रण, नैसर्गिक शेती, शेतमालाचे मूल्यवर्धन व विविध कृषी योजनांबाबत माहिती देण्यात आली.
बैठकीत आत्माचे बिटीएम दीपक नागपुरे यांनी गटशेती व बिज प्रक्रियाचे महत्व सांगून सोयाबीन बियांण्याची उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषी सहाय्यक विमल सुरावार यांनी फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पर्यावरणरक्षण व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा, बांधावरच जैविक कीडनाशक, खते तयार करावीत, असे जनसहयोग फौंडेशनचे नितीन नेरकर यांनी सांगितले. या प्रसंगी संत सावता माळी गटाचे प्रकाश रोकडे, हरिभाऊ पाटील, धोंडु पाटील, योगेश महाजन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शाश्वत शेतीसाठी पुढील प्रयत्न
माती व पाण्याची गुणवत्ता सुधारणे
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार
पर्पारिक बियाणे पेरणी, तृणधान्य लागवडीवर भर
ठिबक सिंचांचा वापर, शेती पूरक व्यवसाय वाढ

धानोरा येथे हवामान अनुकूल अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळा धरणगाव :-  हवामान बदलात शेतकरी जगला पाहिजे, शाश्वत उत्पन...
31/03/2025

धानोरा येथे हवामान अनुकूल अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळा
धरणगाव :- हवामान बदलात शेतकरी जगला पाहिजे, शाश्वत उत्पन्नाची हमी मिळाली तरच शेती करणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी आतापासूनच अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञानाची निवड करून आधुनिकतेची जोड शेती व्यवसायाला द्यावी, असे मत धानोरा ता. धरणगाव येथे आयोजित कृषी कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले.
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व नेहरू युवा मंडळ जळगाव यांच्या विद्यमाने आयोजित हवामान अनुकूल अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळा धानोरा ता. धरणगाव येथे नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच भगवान आसाराम महाजन तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्रचे विषयतज्ञ शरद जाधव व किरण जाधव, शेंद्रीय शेतीचे अभ्यासक भरतसिंग जाधव, बीटीएम दीपक नागपुरे उपस्थित होते. पाणी व मातीचे गुणवत्ता बाधित झाली आहे. परिसरात पूर्वी जे नगदी पिकं घेतली जात होती ती आता त्या जागी दिसून येत नाही, सुपीकता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच महाजन यांनी केले. कार्यक्रमास हरी पाटील, प्रकाश रोकडे व संत सावता माळी शेतकरी गट यांचे सहकार्य लाभले.
शाश्वत शेतीसाठी अल्प खर्चिक तंत्रज्ञानाची गरज : -
हवामान बदलामुळे शेती पुढे अनेक आव्हाने आहेत. शेतीला स्वयंरोजगाराची जोड व अल्प खर्चिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केला तरच हवामान बदलात शाश्वत शेती करणे शक्य होईल. कार्यशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल असे, प्रास्ताविकात नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष नितीन नेरकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस शेतीवरील उत्पादन खर्च वाढत आहे. नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास जमिनीचे गुणवत्ता टिकून राहील, अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी नैसर्गिक खतांचा अवलंब केला पाहिजे, कमी पाण्यात, कमी दिवसात व कमी कालावधीत येणारे पिकांची लागवड करावी. त्यामुळे हवामान बदलातही आपल्याला तग धरता येईल, मिश्र पिकांचा अवलंब करावा, असे आवाहन विषयतज्ञ यांनी केले.

Address

Jalgaon
425001

Telephone

+918767922275

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO:

Share

Category