ncp_Student_Muktainagar_vidhansabha-20

ncp_Student_Muktainagar_vidhansabha-20 Official page of NCP_Student_Congress_Muktainagar_Vidhansabha-20

01/06/2023
क्रांतिज्योती सावत्रीमाई फुले यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यासाठी राष्ट्र...
31/05/2023

क्रांतिज्योती सावत्रीमाई फुले यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिखाणाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.अजित दादा पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब, माजी मंत्री मा.छगन भुजबळ साहेब, मा.खासदार सूनील तटकरे साहेब यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' या वेबसाईटवर बंदी आणण्याची तसेच लेखकांवर व सबंधित व्यक्तींवर अंत्यत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच या प्रसंगी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.
तीन दिवसांपुर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील सावित्रीमाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले त्यातून त्यांचा व समस्त बहुजन समाजाचा अपमान करण्यात आला. या अगोदरचे राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केेले होते या राज्याचे सध्याचे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी सुद्धा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत म्हणजे सध्या असलेल्या या केंद्रातील व राज्यातील सरकारच्या काळात सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे महापुरुषांचा अपमान करायचा व यातून जातीय तेढ निर्माण करायची हा प्रकार चालू आहे. आजपर्यंत कोणत्याही वाचाळवीर व्यक्तींवर कठोर कारवाई झाली नाही म्हणून असे प्रकार सर्रास पणे चालू आहेत आणि तेच आता इतके वाढले आहेत की काही लेखक व समाजकंटक लोक खुलेआम पणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती सुद्धा बेधडकपणे आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत त्यांच्या मनात सरकार बद्दल व प्रशासनाबद्दल कोणतीही भीती राहिलेली नाहीये. त्यामुळे सरकारने एक कडक कायदा करून अशा लोकांवरती वेळीच कठोर कारवाई करावी व अशा प्रकरणांना आळा घालवा.

प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, दानशूर, न्यायी व कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्...
31/05/2023

प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, दानशूर, न्यायी व कर्तृत्ववान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

निषेध !     निषेध !     निषेध !जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव चे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तोंडातून गरळ ओ...
31/05/2023

निषेध ! निषेध ! निषेध !

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव चे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तोंडातून गरळ ओकण्याच काम केलं आहे. जसे त्यांच्या पक्षातील काही नेते नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करून स्वता:चीच लायकी दाखवून देत असतात त्याच पाऊलावर पाऊल ठेवत मंगेश चव्हाण यांनी सुद्धा स्वता:ची लायकी दाखवून दिली आहे. मंगेश चव्हाण यांना माहीत आहे की एकनाथरावजी खडसे साहेब हे राज्याचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका केली तर आपल्याला ही अधिक महत्व प्राप्त होईल व आपण कमीत कमी जळगाव जिल्ह्याचे नेते म्हणून तरी ओळखले जाऊ. चव्हाणांनी अशी गरळ फक्त आणि फक्त स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ओकली आहे आणि तरी सुद्धा यांना जळगाव जिल्ह्यात कोणी काडीची किंमत देणार नाही. हे बाकी काहीच नाही तर हा फक्त सत्तेचा माज आणि मस्ती आहे, सत्ता आहे म्हणून अशी वक्तव्ये करून स्वतःची लायकी दाखवून देयची कामे जरी हे करत असले ना तरी सुद्धा एक सांगतो सत्ता येत असते सत्ता जात असते त्यामुळे सत्तेची हवा मस्तकात जाऊन देयची नसते आणि तुम्ही बोलता तरी कोणावर खडसे साहेबांवर जे खडसे साहेब मागच्या २१ वर्षांपासून आमदार आहेत ज्यांनी गावच्या सरपंच पदापासून ते या राज्याचे विरोधी पक्षनेते आणि पाटबंधारे मंत्रीपदा पासून ते महसूल, कृषि अशा डझनभर मंत्रीपदांचा सांभाळ करून सबंध राज्यात विकासाचं काम केलं..... त्यांच्यावर...!! तुम्ही आज लायकीशून्य माणसे बोलता अरे लाज वाटूद्या जरा... की आपण कोणावर बोलतो. जेवढ तुमचं वय नाहीना त्यापेक्षा जास्त दिवस खडसे साहेबांची राजकारणात गेलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्याच्या जीवावर उड्या मारता ना आणि ज्याला खूष करण्यासाठी ही असली वक्तव्ये करतात ना त्याला सुद्धा एकदा जाऊन विचारा की खडसे साहेब कोण आहेत. तुमचं सध्या च वय 39 वर्षे आहे आणि खडसे साहेबांच्या वयाच्या 40 वर्षांपेक्षा जास्त वर्षे राजकारण आणि समाजकारणात गेली आहेत त्यामुळे तुमचा ज्यावेळेस जन्म सुद्धा झालेला न्हवता ना तेंव्हा खडसे साहेब निवडणूक लढवून जिंकून सुद्धा आले होते आणि जेंव्हा तुम्ही 1990 ला सात वर्षांचे होतात ना तेव्हां खडसे साहेब स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवून आमदार होऊन विधानभवनात गेले होते. यावरून तुम्हाला तुमची राजकीय उंची नक्कीच समजेल आणि तुम्ही.... पहिल्यांदाच ते पण चुकून आमदार झालेले आहात हे विसरू नका. तुम्हाला वाटत असेल की असली वक्तव्ये करून येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तुम्हाला मंत्रीपदाची भिक मिळेल. म्हणूनच ज्या तोंडाने तुम्ही अन्न खाता त्याच तोंडाने शेण खायचं काम तुम्ही करत आहात परंतु तुम्हाला एक सांगतो तुम्ही किती जरी खालच्या पातळीवर जाऊन खडसे साहेबांवर टीका केली ना तरीसुद्धा त्याने खडसे साहेबांना काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहात. मान्य आहे की दुधसंघाच्या निवडणुकीची हवा अजूनही तुमच्या डोक्यातून गेलेली नाही. तुम्ही केलेलं हे वक्तव्य सिद्ध करत की तुमचे विचार किती निच आणि खालच्या दर्जाचे आहेत. त्यामुळे आज एक गोष्ट आठवणीने सांगतो येणाऱ्या काळात तुम्हाला या गोष्टीची एवढी मोठी किंमत मोजायला लागेल ना की तुम्ही परत फिरून खडसे साहेबांचं नाव सुद्धा तुमच्या तोंडात घेणार नाहीत एवढी व्यवस्था आम्ही नक्कीच करून ठेऊ........

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हलविण्या...
29/05/2023

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बहुजनांच्या उद्धारासाठी व स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्या सावित्रीमाई फुले व उत्तम प्रशासन कशाप्रकारे चालवाव याचा संपूर्ण जगाला आदर्श घालून देणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी यांचे पुतळे हलवण्याची घटना अतिशय निंदनीय तथा अशोभनीय आहे. मागच्या काही कालखंडापासून या राज्यातील जनता पाहत आहे की शिंदे-फडणवीस सरकार मधील मंत्र्यापासून ते आता नुकतेच हटवण्यात आलेले भाज्यपाल भागतसिंग कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या बद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर नेहमीच घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे याचे उत्तर तर येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला देईलच परंतु आता यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महापुरुषांचे पुतळे सुद्धा नको असतील एवढा जर यांना द्वेष असेल तर हे खुपच अति झालं. येत्या 31 मे रोजी संबंध महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशात राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्यावेळी तुम्ही मोठं-मोठ्या व्यासपीठावर जाऊन भाषणे देणार, घोषणांचा पाऊस पाडणार परंतु जर तुम्ही तुमच्या सततच्या अशा दलभद्रया कृतीतून महापुरुषांचा नेहमीच अपमान करणार असाल तर हा असला ढोंगीपणा दाखवताच कशाला....? आणि त्यांच्या नावाने मते मागताच कशाला....? या राज्यातील जनतेला एक गोष्ट समजायला तयार नाही की तुम्हाला महापुरुषांबद्दल एवढा तिरस्कार का आहे...? त्यांनी सतत बहुजनांचा उद्धार करण्यासाठी काम केलं वबहुजनांचना न्याय दिला म्हणून की अजून दुसरं काही कारण आहे. सततची वाचाळवीर सारखी वक्तव्ये करून आणि अशा निंदनीय कृती करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायच आहे ते तरी एकदा या महाराष्ट्रातील जनतेला कळुद्या, झालेली घटना अतिशय संतापजनक व संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान करणारी आहे.

कापूस पडला शेतकऱ्यांच्या घरी....कांदा पडला बांधावरी....आणि.....!!!!हे शिंदे-फडणवीस सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी......म...
28/05/2023

कापूस पडला शेतकऱ्यांच्या घरी....
कांदा पडला बांधावरी....
आणि.....!!!!
हे शिंदे-फडणवीस सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी......

मागच्या काही काळात राज्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने या राज्यातील शेतकरी आयुष्यातून पुरता उठल्या सारख झालं आहे, शेतकऱ्यांच अक्षरशः कंबरड मोडून गेलं आहे अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास काढून घेतला गेला त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार कोलमडून पडला असतानाच ह्या राज्यात सध्या असलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी राजा अजून जास्तच संकटात सापडला आहे. संबंध राज्यातील शेतकरी अडचणीत असताना जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांवरती तर अक्षरशः रडकुंडीची वेळ आली आहे कारण येथील शेतकरी तर चारही बाजुंनी संकटात सापडला आहे. कापूस केळी या सारख्या नगदी पिकांपासून ते कांद्या सारखी पिके रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. कापसाचे भाव आज 6000 रुपयांवरती येऊन ठेपले असताना जळगाव जिल्ह्यातील सत्ताधारी नेते मंडळी यावर तोंडातुन एक शब्द काढायला तयार नाहीत की.... शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाहीत. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर एक चकार शब्द सुद्धा हे आज बोलत नाहीत यावरूनच समजते की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती किती गंभीर आहेत. या जिल्ह्याचे स्वयंघोषीत नेते एके काळी कापसाला 7000 भाव मिळावा म्हणून ओरडत होते परंतु आजरोजी इतके भाव पडलेले असताना हे महाशय परदेश दौरे करण्यात व्यस्त आहेत. या मतदार संघातील चकून झालेले आमदार तर एवढे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले परंतु त्या मध्ये एक वाक्य ते कापूस केळी पिकांवर, त्यांच्या कोणत्या योजनांवर बोलू शकले नाहीत की कांद्या बद्दल सभागृहात आवाज उठवू शकले नाहीत. जर हे महाशय यांच्या आमदारकीचा उपयोग या मतदारसंघातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी करत नसतील तर आमदरकीचा उपयोग नेमका करतात तरी कशासाठी....??? स्वतःची घरे भरण्यासाठी....? की फक्त ज्या कामांमधून भरगच्च टक्केवारी मिळते फक्त तेच कामे करण्यासाठी आणि स्व:ताचे खिसे गरम करण्यासाठी....? असा प्रश्न आता येथील सामान्य जनतेला पडलेला आहे. आज कांदा-कापूस-केळी पिकांची परिस्थिती काय झाली आहे...?? अधिवेशन काळात या राज्याचे माजी कृषिमंत्री एकनाथरावजी खडसे साहेबांनी सभागृहात ठणकावून सांगितलं होत की जरी तुम्हाला कांदा खरेदीची गरज नसेल तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी कांदा खरेदी करा....भले तर तो रस्त्यावर फेकून द्या परंतु शेतकऱ्याला न्याय द्या....तुम्ही मोठं मोठ्या योजनांसाठी या राज्यात हजारो कोटी रुपये खर्च करता... मग या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन-पाचशे कोटी रुपये खर्च करून कांदा खरेदी केला व त्या मधून तोटा झाला तर होऊद्या ना....!!! का एवढा तोटा तुम्ही या राज्यातील शेतकर्यांसाठी सहन करू शकत नाही....??? अस त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितलं... परंतु ह्या शिंदे-फडणवीस सरकार त्यावरती ना नीट उत्तर देऊ शकले.... ना त्यावरती काही उपाययोजना करू शकले. जर सरकारने त्यावेळी उपस्थित केलेल्या या कांदा प्रश्नावर उपाययोजना म्हणून काही पावले उचलली असती तर या राज्यात सध्या कांद्याची अशी परिस्थिती झाली नसती, कांद्यान आज शेतकऱ्याला रडवल नसतं.!! परंतु सरकार यात सुद्धा सपशेल अपयशी ठरलं. नावापुरत नाफेड कांदा खरेदी करतंय अस दाखवलं पण त्यात सुद्धा एवढया अटी टाकल्या की बरचसे शेतकरी त्या अटींची पुरतता करू शकले नाहीत त्यामुळे बरेचसे शेतकरी त्या पासून वंचित राहिले.
हेच तुमचे....
शेतकरी विरोधी सरकार !
आणि टक्केवारीसाठी कामगिरी दमदार!!

पिकवला गेला !पण विकला नाही गेला !! #कापूस भाव.सध्या महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे....
26/05/2023

पिकवला गेला !
पण विकला नाही गेला !!
#कापूस भाव.

सध्या महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. जीवाच रान करून रात्रीचा दिवस करून काबाडकष्टाने बळीराजाने कापूस पिकवला आणि त्यावेळेस कापसाला भाव नाही म्हणून त्याला साठवून ठेऊ आणि नंतर पुढे जाऊन जेंव्हा भाव वाढवून मिळेल तेंव्हा विकू अस ठरवून बळीराजाने कापसाची घरात साठवणूक केली. मागच्या 6 महिन्यापासून घरात कापूस साठवला त्यातून लहान मुलांना खाजर सुटलं, त्वचा चे रोग झाले तरीसुध्दा शेतकरी हे सर्व सहन करत आजपर्यंत आला ते कशासाठी? तर त्याला भविष्यात पुढे जाऊन त्या कापसाला 4 पैसे भाव वाढवून मिळेल त्यातून कर्जाच नवं जून करता येईल, मुलीचे हात पिवळे करता येतील, मुलाच्या शाळेची फी भरता येईल, पुढच्या वर्षी खरीफ च्या वेळेस यातून शिल्लक राहिलेल्या पैशातून पुन्हा कापूस पेरणी करता येईन परंतु बळीराजाच्या या सर्व आशा फोल ठरल्या कारण भाव वाढणं तर दूरच परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी विरोधी व उद्योगपती केंद्रीत धोरणामुळे उलट भाव ढासळून गेले व आज रोजी कापसाचे भाव 6000-6500 प्रति क्विंटल वर आले आहेत त्यामुळे शेतकरी उलट आता जास्तच अडचणीत आला आहे. एकतर पहिला चं कापूस घरात पडून आहे, मागच्या वर्षीचे बियाण्यांपासून ते रासायनिक खतांचे सर्व पैसे देणे बाकी आहेत आणि एक महिन्यांवर खरीफ हंगाम येऊन ठेपला आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः कात्रीत सापडून इकडे आड तर तिकडे विहीर अशी बळीराजाची परिस्थिती झाली आहे. खरं तर आपल्या देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की जो बळीराजा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो त्या बळीराजाची आज ह्या दळभद्री सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अशी परिस्थिती झाली आहे व शेतकरी इतका प्रचंड संकटात सापडला आहे आणि अशा परिस्थिती मध्ये जिल्ह्याचे स्वयंघोषित नेते, पालकमंत्री, सत्तेतील आमदार एक ब्र्ह शब्द काढायला तयार नाहीत, विधानसभेत एक प्रश्न विचारायला तयार नाहीत. म्हणजेच यांना शेतकऱ्यांचं, कामगारांच कोनाचच काहीच पडलेल नाही याउलट जनतेच्या पैशावर मज्जा मारत हे परदेशी दौरे करण्यात व्यस्त आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देश पट्ट्यात कापूस उत्पादक शेतकरी हा प्रमुख म्हणून ओळखला जातो त्या मागोमाग केळी पीक हे नगदी पीक म्हणून घेतले जात परंतु ह्या सरकारच्या काळात आज कापूस असो की केळी, की कांदा असे कोणतेही पिके असुद्या जी पिके खान्देश च्या पाठीचा कणा म्हणून ओळखली जातात त्याची आज काय परिस्थिती होऊन बसलेली आहे परंतु यावर उपाय योजना करणं तर दूरच परंतु उलट गुजरातच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी परदेशातून कापूस आयात केला जात आहे अशी चर्चा आज खेड्या पड्यात चालू आहे आणि खरंच अस झालं तर भविष्यात कापसाचे भाव 5000 रुपयांवर आल्या शिवाय राहणार नाही म्हणजे शेतकरी उपाशी आणि दलाल तुपाशी अशी भयानक परिस्थिती ह्या सरकारनी करून ठेवली आहे म्हणजेच आधीच वादळी वाऱ्या पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला अजून च जास्त संकटात टाकायचं अडचणीत आणायचं ही योजना ह्या सरकारची दिसतेय अस वाटत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे कारण या देशातील बळीराजा जर असाच संकटात सापडून संपत गेला तर भविष्यात काय परिस्थिती होईल याचा विचार आपण करून ठेवला पाहिजे.

उच्च माध्यमिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावी ...
25/05/2023

उच्च माध्यमिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

25/05/2023

काल मुक्ताईनगर विधानसभा शेत्रातील बोदवड तालुक्यातील विचवा येथे बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वीज वितरण कंपनी विरुद्ध आंदोलन करण्यात आले. मागील काही दिवसात जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाने शेती सोबत शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या मुळे शेतकऱ्याच अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागून अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. आणि अशातच शेतकऱ्याला धीर देऊन विचारपूस करन तर दूरच परंतु त्याच्या हकाच्या शेतीच्या विजेची सुरळीत जोडणी करन सुद्धा सत्ताधारी लोकांना जमलं नाही मागील काही दिवसा पासून वीचवा गावात वादळी पावसामुळे विजेचे खांब तुटून वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे शेतीला वीजपुरवठा नसल्यामुळे आधीच वादळी वाऱ्यसह पावसाने हवालदिल झालेला शेतकरी वीज प्रशासनाच्या भोंगळ कारभारा मुळे अजूनच संकटात सापडला यावरून लक्षात येते की सत्ताधारी लोकांची प्रशासनावर किती पकड आहे. तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी, शेतमजूर कामगार लोकांची मते घेऊन आपण आमदार झालात सत्तेवर आलात त्याच गोरगरीब शेतकऱ्यांचा आज तुम्हाला विसर पडला आहे त्यांच्या कडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला वेळ नाही त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आज त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं आहे यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही. मागील 24 दिवसांपासून बोदवड तालुक्यातील वीचवा, सुरवाडे खु. मानमोडी, वेल्हळा सह इतर भागातील विजेचा खोळंबा उडाला होता शेवटी तेथील ग्रामस्थांच्या मदतीने बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोखंडी पोलच्या जागेवर लाकडे उभा करून आंदोलन करावे लागले मग कुठे प्रशासन जागे झाले व शेतकरी लोकांना न्याय मिळाला. परंतु जर शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी जर आंदोलन च करावं लागणार असेल तर लोकांनी तुम्हाला मते देऊन आमदार केलं ती लोकांचीच एक मोठी चूक होती अस म्हणावं लागेल. असो तरीसुद्धा येणाऱ्या येथून पुढील काळामध्ये सत्तेत असो किंवा नसो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जनेतेसोबत उभा राहील त्यांना मदत करेल व कायमस्वरूपी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढेल.
या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैय्यासाहेब पाटील, राज्याचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं अनोखं आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व या भागातील इतर सर्व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

काल मुंबई येथे राज्याचे जेष्ठ नेते मा.एकनाथरावजी खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा...
24/05/2023

काल मुंबई येथे राज्याचे जेष्ठ नेते मा.एकनाथरावजी खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन सध्या राज्यात चालू असलेल्या दाबावशाहीच्या राजकारणावर चर्चा केली. सध्याच्या कालखंडात महाराष्ट्रात अतिशय घाण्यारड्या स्वरूपाचं राजकरण सुरू आहे. जो नेता राज्याच्या विधिमंडळात आवाज उठवेल शेतकऱ्याचे, गोरगरीब मजूर, कष्ट कऱ्यांचे आवाज उठवेल त्याच्या वर खोटे नाटे आरोप करायचे त्याला आपल्या पक्षात घेण्यासाठी दबाव टाकायचा आणि तो आपल्या पक्षात जर आला नाही तर त्याच्या मागे ईडी, सिबीआय, इनकम टॅक्स, सारख्या केंद्रीय यंत्रणा लावायच्या व सत्तेचा गैरवापर करून त्याला व त्याच्या कुटुंबाला त्रास देयचा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरायच अशा प्रकारच सूड बुद्धीच राजकरण सध्याच्या कालखंडात हे शिंदे-भाजप युतीच सरकार करत आहे. अशा प्रकारचं नीच पातळीच राजकरण या अगोदर या राज्यात कधी झालं नाही. म्हणजे एक प्रकारे ह्या राज्यातून विरोधक संपवायचे, लोकशाही संपवायची आणि मनमानी कारभार करून ह्या राज्याचे वाटोळे करून हे राज्य दिवाळखोरीत काढायचं आशा प्रकारचा रडीचा डाव हे सरकार आखत आहे. कोणी काही बोलायला गेलं, काही सांगायला गेलं की त्याला धमक्या देयच्या, त्याला गप्प करायचं आणि जो गप्प बसणार नाही त्याला अशा प्रकारे नाहक त्रास देयचा व त्याला संपवायचं त्यामुळे या राज्यात व संबंध देशात लोकशाही राहिली की नाही हा प्रश्न येथील सामान्य जनतेला पडलेला आहे. जर या केंद्रीय यंत्रणा स्वायत्त संस्था आहेत तर त्यांना फक्त विरोधकच कसे-काय दिसतात फक्त विरोधकांचीच प्रकरणे कसे बाहेर निघतात एकही-एकही असा भाजप नेता नाही की ज्याची सध्या चौकशी सुरू आहे. आणि जेवढ्या जेवढ्या विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांनी नंतर भाजप मध्ये प्रवेश केला त्या सर्वांच्या चौकश्या नंतर कशा काय बंद झाल्या त्यांच्यावरील आरोपांच पुढे काय झालं याच उत्तर खरं तर या सरकारने राज्यातील सामान्य जनतेला दिल पाहिजे. आणि अशाच प्रकारे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेबांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा गाजवली अक्षरशः या सरकार वरती तुटून पडले त्याचे उत्तरे ह्या सरकारला सभागृहात देता आली नाहीत म्हणून त्यांना अधिवेशन काळात निलंबित करून एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आज पुन्हा त्यांच्यावर ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु ह्या सरकारला एक आठवण करून देयची आहे की तुम्ही जेवढा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करचाल त्याच जशास तसं उत्तर येथील सामान्य जनता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला दिल्या शिवाय राहणार नाही व तुम्हाला तुमची जागा दाखवतील.

#आम्हीसाहेबांसोबत #राष्ट्रवादीपुन्हा
#जयंतपाटीलसाहेब -20 -20 -20

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ncp_Student_Muktainagar_vidhansabha-20 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share