Dr. Babasaheb Ambedkar Vachnalay Ghugus

Dr. Babasaheb Ambedkar Vachnalay Ghugus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Babasaheb Ambedkar Vachnalay Ghugus, Library, Ghugus.

चंद्रपूर आज दि. 06 डिसेंबर 2023 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य यांचे प्रतिमेला पुष्...
06/12/2023

चंद्रपूर आज दि. 06 डिसेंबर 2023 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य यांचे प्रतिमेला पुष्पहार व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली.

🙏"महामानवाचे महापरिनिर्वाण"🙏रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्...
05/12/2023

🙏"महामानवाचे महापरिनिर्वाण"🙏

रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, " आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू .
दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि ' त्रिशरण म्हणू लागले . नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ' जेवणाची इच्छा नाही ' पंरतु नानकचंद ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला . आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले .नंतर नानकचंद ला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले . मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा."
त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे ."
नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.
दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठेल. ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय ! असे भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ,तेव्हा कळून चुकले कि , बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे .
बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला .
पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात केली व सर्वांना हि बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .अॅम्ब्यूलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत अॅम्ब्यूलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .'बाबा ! ' आणि ते रडू लागले .
स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या.
हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले . हिंदू कॉलनीतील लोकांनी , ' आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले ! ' असे उद्गार काढले.
एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी उभे होते.
बाबांचा पार्थिव देह राह्गृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्यनिदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष ( लाख ) लोकांनी अंत्यदर्शन घेतले . बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता.
एका शृंगाररलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला .त्या मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्याशेजारीच पुत्र यशवंतराव (उर्फ भय्यासाहेब आंबेडकर ) व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता . बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरविण्यात आले मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढ होते. बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला .यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशत्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्तस्वकीय यांना संयम आवरता आला नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ' बाबांचे ' शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.
रविवार दिनांक ९ ला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. आणि अनेक वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले ' आम्हा तरुण सभासदांना डॉ. आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा अगर त्यांच्यबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील .हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.
त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर , इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही . परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा ,महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे.त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत.

महामानवास माझे त्रिवार अभिवादन .... व कोटी कोटी
प्रणाम......

! जयभीम ! !! नमो बुद्धाय !! !!! जय भारत !!!

वर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्या...
29/10/2023

वर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्याचे. बुद्धांचे जीवन चारिकाप्रधान होते. गौतम बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करत. तो प्रवास पायी असे. त्या प्रवासात त्यांना सरपटणारे प्राणी साप, विंचू; कधी रानटी श्वापदे तर पावसाळ्यात नद्यांना येणारे पूर अशा विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असे. म्हणून भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्खूंनी पावसाळ्यातील चार महिन्यांकरता प्रवास टाळून एका जागी स्थिर राहवे यासाठी नियम केले. विहार बांधण्याची कल्पना त्यातून निर्माण झाली. त्यासाठी पावसाळ्याचे चार महिने म्हणजे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत विहारात राहणे, तेथे धार्मिक दैनंदिनी – धम्मलाभ, साधना, विपश्यना, धम्मदेसना (बुद्धांचे तत्वज्ञान) पार पाडणे अपेक्षिले. अशा प्रकारे त्या काळात (म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसांत) विहारात राहण्याच्या कारणामुळे त्या संस्काराचे नाव ‘वर्षावास’ असे पडले.

भारतात एक वेळ अशी होती, की वर्षावासाचे आयोजन सर्वत्र करण्यात येत असे. त्यावेळी भिख्खू संघ विहारात थांबायचे तर गृहस्थ लोक वर्षावास करणाऱ्या भिक्खू संघाची सेवा-शुश्रूषा आणि त्यांना लागणाऱ्या चीजवस्तू यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असत. उपासक भिक्खूंपासून श्रृतज्ञान अर्जित करण्यासाठी विहाराकडे धाव घेत. तशा वेळी, ते बौद्ध उपासक भिक्खूंकरता भोजनाची व्यवस्था आनंदाने करत. ती प्रथा भारतवर्षामध्ये सर्वत्र आढळून येई.

वर्षावास

बौद्ध देशांमध्ये वर्षावासाच्या वेळी उत्सवपूर्ण वातावरण पाहण्यास मिळते. उपासक-उपासिका त्यांच्या परिवारासह साजशृंगार करून ढोल-नगाऱ्यांसहित भिक्खूंना दान देण्याच्या वस्तूंसोबत हर्षोल्हासात विहारात जाताना दिसतात. त्याचे कारण असे, की तेथील अधिकाधिक भिक्खू विद्वान शीलवान आणि लोककल्याणात पारंगत असत. भगवान बुद्धाच्या धम्म शासनात भिक्खूंसाठी वर्षावास करणे अनिवार्य ठरवले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी भिक्खूंना कोणाही व्यक्तीच्या आमंत्रणावरून दुसऱ्या विहारात जाऊन अथवा त्यांच्या त्यांच्या विहारात राहून वर्षावास करणे आवश्यक आहे. त्या दरम्यान, भिक्खूंसाठी तीन महिन्यांपर्यंत भोजन, औषधी इत्यादींची व्यवस्था विहारातील उपासक आणि उपासिका यांच्याद्वारे केली जाते. वर्षावासाचे अधिष्ठान करण्याची मुख्य कारणे

1. वर्षा ऋतूत नदी, नाले पाण्याने भरतातच. त्यामुळे भिक्खूंना प्रवास करण्यात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्या ऋतूत प्रवास करताना घातक अशा जीवजंतूंचा त्रास उद्भवतो. त्यामुळे वर्षा ऋतूच्या चार महिन्यांच्या काळात भिक्खूंनी विहारात वास्तव्य करणे अनिवार्य आहे.

*नमोबुध्दाय, जयभीम,  🌹👇*  *‘मोहोंजो-दरो’ सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले, पण इथे प्राचीन बौद्धस्थळे*  सिंधू संस्...
29/10/2023

*नमोबुध्दाय, जयभीम, 🌹👇*

*‘मोहोंजो-दरो’ सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले, पण इथे प्राचीन बौद्धस्थळे*

सिंधू संस्कृतीचे शहर म्हणून ‘मोहों-न्जो-दरो’ या पुरातन स्थळाचा अभ्यास लहानपणी आपण सर्वांनी शाळेत असताना केला. तेथील वास्तुरचना, नगररचना, सांडपाण्याची यंत्रणा आणि सापडलेल्या छोट्यामोठ्या टेराकोटा शिल्पाकृती (नर्तकी, अलंकारित स्त्री, मणी-माळा, आभूषणे, प्राणी इत्यादी) हे सर्व अप्रतिम होते. इ.स.पूर्व हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या सुनियोजित शहराचा जगभर गवगवा करण्यात आला. इथली प्राचीन संस्कृती ही सिंधू संस्कृती म्हणून ढोल बडविण्यात आले. पण इथे दिसत असलेल्या मातीच्या उंचवट्याबाबत कधीच कोणी भाष्य केले नाही.

‘मोहो-न्जो-दरो’ याचाच अर्थ तथागतांचा स्तूप ( Mound of Buddha ) असे आता दिसून आले आहे. प्रत्यक्षदर्शी येथे स्तूप आहे हे कधीच सांगितले गेले नाही. फक्त सिंधू संस्कृतीचे ढोल बडविण्यात आले.
हा उंचवटा म्हणजे स्तूप होता हे कायम गुलदस्त्यात ठेवले गेले. त्यामुळे शालेय शिक्षणात देखील त्याचा आपण कधीच अभ्यास केला नाही. सत्य झाकण्यासाठी ही केलेली मोठी धूळफेक होती. अनेक विद्वानांनी स्वतःच्या संस्कृतीला अनुकूल असलेल्या गोष्टी जगापुढे मांडल्या. त्याचीच री आंधळेपणाने सर्वांनी ओढली. वास्तविक ‘मोहो-न्जो-दरो’ याचा अर्थ ‘तथागतांचा स्तूप’ असा होतो असे आता स्पष्ट झाले आहे. ( Mound of Buddha)

शंभर वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननानंतर काहू-न्जो-दरो स्तूपाचे काढलेले छायाचित्र.
दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील याच सिंध प्रांतात ‘काहु-न्जो-दरो’ नावाचे दुसरे एक स्थळ असून तेथे देखील सन १९०९-१० च्या दरम्यान उत्खनन झाले होते. याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात वाचल्यावर मला देखील आश्चर्य वाटले. त्याबाबतची माहिती गोळा केली तेव्हा हे सुद्धा मोठे बौद्ध संस्कृतीचे स्थळ असल्याचे दिसून आले. इ.स. ४-५ व्या शतकात भरभराटीला असलेले हे ३५ एकराचे स्थळ म्हणजे बौद्ध संस्कृतीची एकेकाळी खाण होती. येथील उत्खननात संपूर्ण विटांनी बांधलेला स्तूप मिळाला. या स्तूपात जे रक्षापात्र मिळाले त्यात बुद्धधातु, स्फटिक, निलम आणि मौल्यवान रत्ने मिळाली. सातव्या ते दहाव्या शतकातल्या टेराकोटाच्या असंख्य बुद्धमूर्ती येथे मिळाल्या.

काहू-न्जो-दरो स्तुपाची भव्यता आणि तेथील सुंदर कोरीवकाम अप्र

16/10/2023
उन्नीसवीं शताब्दी का भारत और खासकर बंगाल ने एक से एक युगान्तरकारी प्रतिभाओं को जन्म दिया। रवीन्द्रनाथ टैगोर यानी जोड़ासा...
09/09/2023

उन्नीसवीं शताब्दी का भारत और खासकर बंगाल ने एक से एक युगान्तरकारी प्रतिभाओं को जन्म दिया। रवीन्द्रनाथ टैगोर यानी जोड़ासाँको के ठाकुर परिवार के शर्मीले नवयुवक से नोबल पुरस्कार और शान्ति निकेतन तक की यात्रा करने वाले गुरुदेव उस सदी के उन मनीषियों में से थे जिन्होंने भारत ही नहीं बल्कि वैश्विक जगत को बौद्धिक और एक हद तक राजनैतिक रूप से भी प्रभावित किया। उज्ज्वल भट्टाचार्य द्वारा लिखी उनकी यह जीवनी न तो उनकी दैनंदिनी है और न ही घटनाओं का कोई कोलाज। इस किताब में उन्होंने बहुत करीने से रवीन्द्रनाथ ठाकुर के गुरुदेव टैगोर बनने की प्रक्रिया को उस दौर की ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक और राजनैतिक हकीकत के बरक्स तलाशने की कोशिश की है। इस प्रक्रिया में वह भारतीय आधुनिकता के परिप्रेक्ष्य में उनकी जीवन यात्रा और वैचारिक व सांस्कृतिक विकासक्रम को देखने का ज़रूरी उपक्रम करते हुए आज के दौर के भारत और विश्व के संदर्भ में टैगोर की प्रासंगिकता को बखूबी रेखांकित करते हैं। यह किताब हिन्दी के बौद्धिक और सामाजिक जगत में रवीन्द्रनाथ के बहाने आधुनिकता पर एक नई और अक्सर टाल दी जाने वाली बहस को फिर से केन्द्र में लाने की कोशिश तो करती ही है, साथ में अपनी रोचकता, प्रवाह और सहज किस्सागोई के कारण नए पाठक के लिए टैगोर के जीवन और रचना-संसार में प्रवेश की राह भी खोलती है। कवि, लेखक और अनुवादक उज्ज्वल भट्टाचार्य आधे वक़्त जर्मनी में रहते हैं और बाकी भारत में। पिछले चार दशकों के दौरान वह जर्मनी में रेडियो पत्रकारिता से जुड़े रहे हैं। इस दौरान उन्होंने जर्मन तथा अन्य भाषाओं से लगातार कविताओं का अनुवाद किया है।

19/06/2022

*लोकार्पण सोहळा निमंत्रण*

दि. 21 जून 2022 रोज मंगळवार ला *डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, घुग्घुस कार्यालयाचा लोकार्पण सोहळा* संपन्न होणार आहे. तरी आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ :- ठाकरे कॉम्प्लेक्स गांधी चौक, घुग्घूस, ता.जि. चंद्रपुर

दिनांक : 21 जून 2022 रोज मंगळवार
वेळ :- सकाळी 11:00 वाजता

*विनीत : ब्रिजभूषण पाझारे*

*ब्रिजभूषण पाझारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट सभापती पुरस्काराने सन्मानित**पुणे येथे 7 मार्च ला होणार ना. कपिलजी पाटील, मंत्...
06/03/2022

*ब्रिजभूषण पाझारे महाराष्ट्रातील उत्कृष्ट सभापती पुरस्काराने सन्मानित*

*पुणे येथे 7 मार्च ला होणार ना. कपिलजी पाटील, मंत्री पंचायत राज भारत सरकार यांचा हस्ते होईल पुरस्कार प्रदान*

राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन च्या माध्यामातून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व सभापती यांचा कार्यकाळातील केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा गौरव व्हावा या उद्देशाने पुणे असोसिएशन मार्फत अर्ज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जि.प सदस्य, सभापती तसेच पं.स सदस्य व सभापती यांचे कार्य व महत्वपूर्ण कामगिरी यांची माहिती अर्ज स्वरूप मागविण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट ३ जि.प सभापती पुरस्कारात प्रथम क्रमांकावर माजी जि.प समाजकल्याण सभापती तथा तत्कालीन जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांची निवड झालेली आहे. हि जि.प चंद्रपूर करिता अभिमानाची बाब आहे.
सन २०१७ मध्ये जि.प समाजकल्याण सभापती पदा हाती घेतले व माजी वित्तमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून जनतेसाठी विविध कार्य व योजना आखून जिल्हातील नागरिकांना लाभ मिळून दिला. त्यामध्ये १० हजार घरकुल मंजूर करून “मागेल त्याला घरकुल” या निश्चयावर ठाम राहून जिल्ह्यात कार्य घरकुल अतिरिक्त घरकुल मिळून दिले. ग्रा.प स्थळावर अखर्चित असलेल्या अपंग राखीव ३% निधी जिल्हा अपंग कल्याण निधी मध्ये जमा केले व जिल्हातील अपंग व्यक्तीना १००० स्वचलीत साईकलचे वितरीत करण्यात आले. ग्रा.प उत्पन्न निधी मार्फत राखीव असलेल्या दलित वस्ती विकास कार्याला पुढाकार घेऊन दलित वस्ती विकास घावून आणला. व गावात नागरिकांनकरिता RO, हायमास्ट चे कार्य पूर्ण केले. जिल्हापरिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात जि.प निधी मंजूर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारले. नकोडा गावातील राम मंदिर देवस्थानाचे सुशोभिकरण, लाइटीग ची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हातील तीर्थ क्षेत्र असलेले वढा गावात मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचा मार्फत सभागृह बांधकाम व नदीच्या तीरापर्येंत पायऱ्याचे बांधकाम करण्यास पुढाकार घेतला. तसेच “मी सभापती बोलतोय..!”, मान आपुलकीचा, सन्मान कार्याचा, एक दिवस पाच गाव भेट, सरपंच संवाद अश्या विविध नाविन्य पूर्ण उपक्रम राबवून ग्रा.प व पंचायत समिती मार्फत गावातील प्रलंबित असलेल्या कार्याला गती देऊन ते पूर्ण करण्यात यश मिळविले. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये बिरजू पाझारे लोकप्रिय झाले.
नकोडा या छोट्याश्या गावातील आलेले ब्रिजभूषण पाझारे कठोर मेहनत व लोकांमध्ये स्वताच्या निस्वार्थी सेवे मुळे तसेच कार्यामुळे लोकप्रिय झाले. पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच जि.प सदस्य ते सभापती पदाच्या मानकरी होण्यासाठी त्यांनी जनसेवेत स्वताला बहाल करून टाकले. नेहमी नागरिकांच्या हितासाठी झटणारे व सदैव कार्यशील असणारे आपले ब्रिजभूषण पाझारे 7 मार्च ला महाराष्ट्रातील ३ उत्कृष्ट सभापती मधील प्रथम स्थानी पुरस्कृत होत आहे. हि खरोखरच चंद्रपूर जिल्हासाठी अभिमानाची बाब आहे.

Address

Ghugus
442505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar Vachnalay Ghugus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category