क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Bhir
  • क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान

क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान Official Page For Krantisurya Yuva Pratisthan

प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे. समाजात शांती हवी असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. हे परिवर्तन केवळ विचारांमधील क्रांतीतुनच शक्य आहे. परिवर्तन आणण्यासाठी सपुंर्ण योगदान आपल्या विचारांचे असते. विचार माणसाच्या सपूंर्ण व्यक्तिमत्वाची ओळख देतात. आपले विचार आणि आचार काळानुसार बदलणे आवश्यक असते.मी माळी हा एक विचार आहे, समाजाला आधुनिक तंत

्रज्ञानाशी जोडण्याचा, ज्याची सुरुवात झालेली आहे. परंतु हा विचार तेंव्हाच पूर्ण होऊ शकतो जेंव्हा माळीसमाज परिवर्तन समजुन घेईल आणि अपेक्षित सहकार्य करेल. तर मग आपण एकत्र येऊन हे परिवर्तन करु शकतो, नक्कीच बदल घडवून आणू शकतो. आता आपण एकटे नाही आहोत संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे. चला तर मग आपल्या पासुन सुरुवात करु.

एकही युद्ध न हरता, दिल्लीचे तख्त काबीज करणारा होळकर साम्राज्यातील अजिंक्य तारा शूरसेनानी, महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव ...
03/12/2023

एकही युद्ध न हरता, दिल्लीचे तख्त काबीज करणारा होळकर साम्राज्यातील अजिंक्य तारा शूरसेनानी, महाराजाधिराज छत्रपती यशवंतराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
💐💐💐

29/05/2022
स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी माळी परिवाराच्या वतीने अभिवादन कर...
28/11/2017

स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी माळी परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले...!🙏🙏🙏

18/09/2016

चलो बीड.....चलो बीड.....चलो बीड
#ओबीसींचा महामोर्चा
"आता वेळ आली आहे ह्या महाराष्ट्राला आपली ताकत दाखून देण्याची "
#पक्षभेद_मतभेद_विसरून.... चला एक होऊया*
आम्ही "ओबीसी" कधीच एकत्र येणं शक्य नाही असं बोलुन जर कोणी आमची खिल्ली उडवत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही "ओबीसी" घड्याळातल्या सेकंद काटा,मिनिट काटा आणि तास काट्या प्रमाणे आहोत,इतर वेळी कोठेही हिंडत असलो तरी जेंव्हा एकत्र येतो तेंव्हा समोरच्याचे 12 वाजतातच*.............
*ओबीसी मोर्च्या बाबतची आचारसंहिता*
OBC म्हणजे नेमकं कोण हे अगोदर हे आपण आपल्या सहवासातील मित्रांना समजून सांगण गरजेच आहे आपले कितीतरी मित्र जे वंजारी,धनगर ह्या जातीतिल आहेत ते आम्ही obc नसून NT आहोत अस म्हणतात त्यांचे अगोदर शंका समाधान करून त्यांना मोर्चात सामिल करून घेतला पाहिजे... नाहीतर महाराष्ट्रात ओबीसी म्हटल की फक्त माळी असाच काही लोकांचा समज आहे तो अगोदर जागृति करून आपन सर्वानी दूर केला पाहिजे.... तसेच आपल्या मोर्चाच्या अनुषंगाने चर्चा करताना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावनार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
आपण ओबीसी विद्यार्थ्याना उच्च शिक्षणातील शिष्यवृत्ति,मंडल आयोग, इ.विषयावर मोर्चाचे आयोजन करण्याचे योजले आहे .

*एक obc लाखाच्या बरोबर* ....!! *लक्षात ठेवा जन्मलो माती साठी पण एक दिवस जातीसाठी....!*

*नवे पर्व ओ बी सी सर्व* —

22/05/2015

"जय सावता "
" जय जोती "
"जय सावित्री "

मित्रांनो .....
आपल्या समाजामधे सातत्याने माळी समाजाचे सामाजिक विषय घेउन समाजाच्या ऊन्नती करिता चर्चा होत आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेतुन खालील ऊपक्रम राबवावे असे ठरले.

श्री.क्षेत्र अरण येथे
"सावता आयुर्वेदा & मेडिकल रिसर्च सेंटर"

आणि

"राष्ट्रपिता म. जोतीराव फुले स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मदत केंद्र"
स्थापन करणे.

त्यासाठी औरंगाबाद येथे रविवार दि.. ३१ मे
२०१५ रोजी बैठक आयोजित केली आहे.तरी समाजातिल समाज सेवी ; विचारवंत ; तद्न्य असे व विषयाची माहिती असलेले तसेच समाज कार्यासाठी स्वता:ला झोकू इछिनारे समाजातील जास्तित जास्त बंधु व बघिनीनी योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे.व बैठकिस उपस्थित राहुन आपल्या सम्पर्कातिल वरिल निकष पुर्ण करणार्या समाज बांधवाना सदर उपक्रमाची माहीती देउन उपस्थितीसाठी आवाहन करावे.

आपला
अखिल माळी समाज

टिप _- ही मीटिंग सर्व समाजातील विविध संघटना व विचारवंत यांच्या मार्गदर्शनखलि आयोजित असुन निसंकोच सर्वानी संघटन वाद व राजकारण बाजूला ठेवून सहभागी होण्याचे ठरवले आहे
तरी आपली उपस्तिथि प्रार्थनीय आह

प्रति,मा.सर्व समाज बांधव,मा.महोद्दय  / महोदया शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायीक, व राजकिय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व बंध...
20/01/2015

प्रति,
मा.सर्व समाज बांधव,

मा.महोद्दय / महोदया
शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायीक, व राजकिय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व बंधू-भगिनींना सप्रेम नमस्कार,बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९ चे आपण सर्वांनी मनापासुन स्वागत केले. या अधिनियमाने समाजातील शिक्षणापासुन वंचित घटकाला शिक्षणाचा हक्क कायद्याने प्राप्त झाला. मुलींना-तसेच समाजातील सर्व स्तरातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे हा आग्रह फारपुर्वी महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांनी धरला होता. १ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून ज्ञानदानाच्या पवित्र कार्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, रुजविली आणि वाढविली. ज्ञानगंगा समाजातील सर्व स्तरावर पोहचविण्याच्या कार्याबरोबरच अस्पृश्यता, बालविवाह, सतीची प्रथा, या अनिष्ठ रुढी परंपरा व विधवाविवाह, शेतकर्यांचे प्रश्न, सत्यशोधक समाज, प्लेगच्या रूग्णांची सेवा आदी विषयांवर या दोन महान विभुतींनी खडतर परिस्थितीत केलेले कार्य या छोट्याशा पत्र प्रपंच्यातुन मांडणे केवळ अशक्य आहे हे आपण जाणताच. महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याची, योगदानाची आणि कष्टाची तुलना याच क्षेत्रात कार्य करणार्या इतर कोणत्याही मान्यवरांशी होऊ शकत नाही. किंबहुना फुले दांपत्याचे कार्य सर्वाहुन श्रेष्ठ असेच आहे. असे असुनही भारत मातेची ही दोन रत्ने भारतरत्न या पुरस्काराने मरणोत्तरही सन्मानित होऊ शकली नाहीत हि मोठी शोकांतिकाच आहे.
ज्ञानदानाचा त्यांचा पवित्र वसा आपण सर्व आपल्या सेवेतुन पुढे नेत आहात, याचा आम्हाला आनंदच आहे. महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा हि आपल्या सर्वांच्याच मनातील तीव्र इच्छा. या भावना मा. शासनापर्यंत पोहचविण्यासाठी आपली साथ अत्यंत महत्वाची वाटते, आपणापैकी ज्यांना आमची भुमिका सकारात्मक वाटत असेल त्यांनी सोबतच्या फॉर्म द्वारे साथ द्यावी या अपेक्षेसह……….

आपण जी माहिती देत आहात त्या माहितीचा काही दुरुपयोग झाल्यास मी माळी परिवार त्यास सर्वस्वी जबाबदार राहील आपली माहिती हि गोपनीय व गुप्त ठेवली जाईल ती माहिती फक्त शासनास पत्र व्यवहार अथवा माहिती सादर करतानी देण्यात येईल.

आपला मी माळी परिवार
[email protected]

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

फुले दांमपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
31/12/2014

फुले दांमपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वो रस्सी आज भी संग्रहालय में हैजिस्से गांधी बकरी बांधा करते थेकिन्तु वो रस्सी कहां हैजिस पे भगत सिंह , सुखदेव और राजगुरु...
21/08/2014

वो रस्सी आज भी संग्रहालय में है
जिस्से गांधी बकरी बांधा करते थे
किन्तु वो रस्सी कहां है
जिस पे भगत सिंह , सुखदेव और राजगुरु हसते हुए झूले थे?

"हालात.ए.मुल्क देख के रोया न गया...
कोशिश तो की पर मूंह ढक के सोया न गया". देश मेरा क्या बाजार हो गया है ...
पकड़ता हु तिरंगा
तो लोग पूछते है कितने का है...

04/08/2014

प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे. समाजात शांती हवी असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. हे परिवर्तन केवळ विचारांमधील क्रांतीतुनच शक्य आहे. परिवर्तन आणण्यासाठी सपुंर्ण योगदान आपल्या विचारांचे असते. विचार माणसाच्या सपूंर्ण व्यक्तिमत्वाची ओळख देतात. आपले विचार आणि आचार काळानुसार बदलणे आवश्यक असते.मी माळी हा एक विचार आहे, समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा, ज्याची सुरुवात झालेली आहे. परंतु हा विचार तेंव्हाच पूर्ण होऊ शकतो जेंव्हा माळीसमाज परिवर्तन समजुन घेईल आणि अपेक्षित सहकार्य करेल. तर मग आपण एकत्र येऊन हे परिवर्तन करु शकतो, नक्कीच बदल घडवून आणू शकतो. आता आपण एकटे नाही आहोत संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे. चला तर मग आपल्या पासुन सुरुवात करु.

30/07/2014

Fan of the week is... क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान Krantisurya Yuva Pratisthan!

23/07/2014

Fan of the week is... Gorakh Dada Raut!

Address

Krantisurya Yuva Pratisthan, Mhalas Jaula
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to क्रांतिसुर्य युवा प्रतिष्ठान:

Share