06/03/2026
आज सभागृहात शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई जी यांनी मुंबईतील बिघडत चाललेला AQI आणि वाढते वायुप्रदूषण याबाबत सरकारला जाब विचारला.
वाहन व औद्योगिक प्रदूषणावर सरकारची ठोस आणि दीर्घकालीन कृती योजना काय आहे, याबाबत स्पष्ट उत्तर मागितले.
फक्त बांधकामे थांबवणे हा तात्पुरता उपाय असून प्रदूषणाविरुद्धची शाश्वत रणनीती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारची उत्तरे कागदावर चांगली वाटत असली तरी अपेक्षित गंभीरता दिसत नसल्याचे सांगत मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक जबाबदारीने हाताळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.