02/08/2024
बहुजन समाजाच्या मागण्यांचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
बहुजन रयत परिषदेच्या वतीने दि. 21 जुलै ते 28 जुलै 2024 या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात संवाद अभियान दौरा काढण्यात आला. या दौऱ्यात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधल्यानंतर बहुजन समाजाचे अनेक गहन प्रश्न समोर आले. हे प्रश्न संघटनेच्या वतीने आम्ही शासनदरबारी मांडू, असा शब्द लोकांना दिला होता. त्यानुसार वंचित बहुजन समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील बहुजन समाजाच्या विविध महत्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्री. ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष ना. म. साठे, अजय साळुंखे आदी उपस्थित होते.