25/05/2019
आजचं झालेलं प्रधान सेवकांचं उद्बोधन म्हणजे कार्यकर्त्याने कसा प्रवास करावा, सामाजिक आणि राजकीय प्रवासादरम्यान आलेले मानाचे, सन्मानाचे क्षण, अपमानाचे क्षण कसे जगावे याचा घालून दिलेला अप्रतिम परिपाठ आहे.
जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला असताना पण, मित्र पक्षांची गरज अधोरेखित करून त्यांना सोबत घेऊन देश चालवणं का महत्वाचं आहे हे सांगणारे,कायदे मंडळामध्ये पहिल्यांदा रुजू झालेल्या सदस्यांनी काय काळजी घ्यावी हे इतक्या परिणामकारक रीतीने सांगणारे कदाचित ते पहिलेच नेते आहेत.आज पर्यंत का कोणत्या नेत्याने हे जाहीररित्या सांगितलं नाही असा प्रश्न पण मला या निमित्ताने पडला.
राष्ट्रीय आकांक्षा आणि राज्याच्या अस्मिता यांचा इतका चांगला समतोल साधणारा प्रधानसेवक देशाला मिळाला आहे आणि ज्याचा ते राष्ट्रीय मंचावरून पुनरुच्चार करतात,अशा परिस्थितीमध्ये राज्य अस्मिता टोकदार करून राजकीय फायदा उचलणारे येणाऱ्या काही वर्षांमध्ये निष्क्रिय होत जातील.
देशातील गरीब आणि गरजू लोकांपर्यंत थेट पोचण्याचा प्रयत्न म्हणून मागील सरकार ने केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी केला. त्याच वेळेस मागच्या सत्तर वर्षात देशातील अल्पसंख्याक जनतेमध्ये काही पक्षांनी निर्माण केलेल्या भीतीरुपी राक्षसाला थेट भिडण्याचा संकल्प पण बोलून दाखवला.
सर्वात शेवटी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा संकल्प भारताला विश्वगुरू पदापर्यंत नक्कीच घेऊन जाईल हा थेट संदेश आज देशातील १३० कोटी लोकांना देण्यात मोदी यशस्वी झाले आहेत.
आता गरज आहे सर्व जनतेनी आपली आपली योजून घेतलेली कामे प्रामाणिकतेने करणे.
जय हिंद.
DevB