रयत शिक्षण संस्था,सातारा

  • Home
  • India
  • Satara
  • रयत शिक्षण संस्था,सातारा

रयत शिक्षण संस्था,सातारा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद !

:: रयत शिक्षण संस्था ::
ही देशातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे या संस्थेचे संस्थापक होते. संपूर्ण राज्यात या संस्थेच्या ६८९ शाखा असून ७१ वसतिगृहे आहेत. या संस्थेत के.जी.ते पदव्युत्तर पदवी पर्यंत विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. सध्या या संस्थेत १७,३६३ कर्मचारी कार्यरत असून जवळपास ४.४२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या संस्थची स्थापना सातारा जिल्ह्यात झाली आणि पहिली शाळा 'काले' या गावात सुरु झाली होती. मुख्य कार्यालय 'सातारा' शहरातच आहे.

🙏
22/09/2023

🙏

22/09/2022
सातारा रयत शिक्षण संस्थेची माहिती मुकी भिंत सांगू लागली...
27/02/2018

सातारा रयत शिक्षण संस्थेची माहिती मुकी भिंत सांगू लागली...

Artists of Rayat Shikshan Sanstha in Satara introduced the identity of Rayat on the wall.

कर्मवीर भाऊराव पाटीलयांचा महाराष्ट्राला माहितनसलेला इतिहास !कर्मवीर भाऊराव पाटील हे राजश्री शाहूमहाराजांच्या कोल्हापूर स...
30/01/2017

कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा महाराष्ट्राला माहित
नसलेला इतिहास !
कर्मवीर भाऊराव पाटील हे राजश्री शाहू
महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील जैन
वस्तीग्रहातील विद्यार्थी होते.त्या काळात
राजश्री शाहू महाराजांचे निकटचे
सहकारी ना.भास्करराव जाधव
यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात'राज
श्री शाहू सत्यशोधक समाज'या नावाने
महात्मा जोतीराव फुले
यांच्या मुळच्या'सत्यशोधक चळवळीचे'पुनर्जीवन
करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील या चळवळीतील एक
कट्टर आणि जहाल कार्यकर्ते म्हणून
उदयाला आले.स्वत: कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा एक'सत्यशोधकी जलसा'होता.ज्याद्वारे
ते महाराष्ट्रभर सत्यशोधक
समाजाच्या तत्वाचा प्रचार-प्रसार
करीत.कर्मवीर भाऊराव पाटील हे अत्यंत जहाल
वक्ते होते.त्याच्या या जहाल वकृत्वाचा एक
प्रसंग जो महाराष्ट्राला फारसा माहित
नाही तो आज मी आपणास सांगत आहे.
राजश्री शाहू महाराजांच्या नंतर
महाराष्ट्रातील'सत्यशोधक चळवळ'मंद झाली.व
कालांतराने यातील जेधे-जवळकर यांचे सारखे
सत्यशोधक
महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालील'र
ाष्ट्रीय स्वतंत्र्याच्या चळवळीत'सामील झाले
होते.त्यात कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा हि समावेश होता.
महात्मा गांधीजींचा नथुराम गोडसे
या पुण्यातील सावरकरांचा शिष्य
असणार्या व आर.एस.एस
चा कार्यकर्ता असणार्या व्यक्तीने
गोळ्या घालून खून केल्या नंतर देशभर व
महाराष्ट्रभर ब्राम्हण विरोधी लाट निर्माण
झाली.त्यातून अनेक
ठिकाणी ब्राम्हणाच्या मालमत्तेवर ? बहुजन
समाजाने साहजिक हल्ले केले.जीवित
हाणी झाली नाही.आणि जी संपत्ती लुटली गेली होती ती सुद्धा क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या मुळे ब्राम्हणांना परत
देण्यात आली.
या सगळ्या परिस्थितीने भयभीत
झालेल्या पुण्यातील ब्राम्हण समाजाला धीर
देण्यासाठी त्यावेळचे महाराष्ट्राचे अत्यंत
सनातनी आणि जातीयवादी मुख्यमंत्री बाळासाहेब
खेर यांनी पुण्यात'शनिवार वाडा'येथे
सभा घेतली.व बहुजन समाजाला दम
देण्याची भाषा वापरली.त्या सभेत
बाळासाहेब खेर म्हणाले,"पुण्या तीलच नव्हे तर
देशातील समस्त ब्राम्हण
समाजाला मी बाळासाहेब खेर आश्वासन
देतो कि,हा बाळासाहेब खेर अंगात
रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत ब्राम्हणांचे बहुजन
समाजातील गुंडान पासून रक्षण करेल."
बहुजन समाजाला'गुंड'म्
हणणाऱ्या सनातनी बाळासाहेब खेर
चा समाचार कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी सातार्यात
महात्मा गांधीजींच्या हत्येच्या निषेधात
घेतलेल्या सभेत घेतला.कर्मवीर भाऊराव पाटील
त्या वेळेस म्हणाले,"अरे.......बाळास ाहेब ! बहुजन
समाजाला'गुंड'म्हणून तुझ्या जात बांधवाने केलेले
कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू
नकोस.आणि तुझ्या अंगात असून असून किती रक्त
असणार ? आणि करून करून तू किती ब्राम्हणाचे
रक्षण करणार ? अरे........महात
्मा गांधीजींच्या खुनाची फळे
तुम्हा ब्राम्हणांच्या अनेक
पिढ्यांना भोगावी लागतील.तरी हि या अपराधातून
तुमची अजन्म सुटका होणार नाही !"
या सभेने चिडलेल्या मुख्यमंत्री बाळासाहेब खेर
यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या'रयत
शिक्षण संस्थेचे'शासकीय अनुदान बंद
केले.आणि रयत शिक्षण संस्थेची आर्थिक
कोंडी करण्याचा डाव टाकला.
हि घटना राष्ट्रसंत गाडगे महाराज
यांना समजली.मुख्यमंत् री बाळासाहेब खेर
पुण्यात आला असता गाडगे महाराज हातात
त्यांचा खराटा घेऊन थेट
त्यांच्या भेटीला गेले.आणि वरच्या मजल्यावर
बैठकीत बसलेल्या बाळासाहेब खेर ला खालीच
उभा राहून हाक मारली,"बाळासाहे ब ! तू
आधी बाहेर ये ! बाळासाहेबाने वरून खिडकीतून
हळूच पहिले.तर....... .! खाली गाडगे
बाबा हातात खराटा घेऊन आवेशात हाक मारत
होते.बाळासाहेब खेरची तर बोबडीच
वळली.बाळासाहेब गाडगे बाबांना न
भेटण्याचा प्रयत्न करू लागले.पण....... ! खालून
गाडगे बाबा च्या हाक सुरूच होत्या.बाकीचे
पुढारी गाडगे बाबांना शांत
करण्यासाठी धावले.पण....... !
बाबांच्या त्या रुद्ररुपाला आडवे
जाण्याची कुणाची हिंमत होई ना.शेवटी भीत
भीत बाळासाहेब खेर
खाली आले.आणि बाबांच्या पाया पडण्याचा प्रयत्न
करू लागला.तसे बाबा म्हणाले,"मागे हो !
आणि मला सांग....... का रे बाळा ! तू
त्या भाऊराव पाटलाच्या शाळांचे पैसे
का कापले ?"
आणि चांगले झाड झाड झाडले.त्यावर
बाळासाहेब खेर यांनी सातार्यात भाऊराव
पाटील माझ्या बद्दल असे असे बोलले म्हणून
सांगितले.त्यावर गाडगे बाबा म्हणाले,"तू
पुण्यात आधी काय दिवे पाजळले होते ?"यावर
बाळासाहेबांनी गाडगे
बाबांची माफी मागितली.आणि तेथेच रयत
शिक्षण संस्थेचे अनुदान परत सुरु करण्याचे पत्रच
गाडगे बाबांच्या हातात दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या अनुदान बंदच्या काळात
गाडगे
बाबांनी आणि त्यांच्या शिष्या संप्रदायाने
महाराष्ट्र भरातून
देणग्या गोळा केल्या होत्या.आणि क्रांतीसिंह
नाना पाटील यांनी हि धुळे ब्रिटीश
खजिन्यातील लुटीच्या रक्कमेतील काही रक्कम
देणगी म्हणून दिली होती.

27/01/2017

या 'चारभिंतीं'वर विलसे दिव्य समाधी
हा शाहू नगराचा 'राजघाट' हो त्यागी,
ही मूर्ती देवो स्फूर्ति सतत विरागी,
स्वर्गस्थ सुरांची पुष्पवृष्टि दिनरात,
जो अमर जाहला "कर्मवीर" जगतात.
● शिलेदार

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले कार्य :साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासा...
09/05/2015

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेले कार्य :

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[१] श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.

सातार्यात येवून कर्मवीरांना वंदन होणारनाही असे बहुदा माझ्याकडून होत नाही.शिक्षणरूपी या ऋषिच्या चरणी नेहमीच लीनव्हावे.सात...
18/08/2014

सातार्यात येवून कर्मवीरांना वंदन होणार
नाही असे बहुदा माझ्याकडून होत नाही.
शिक्षणरूपी या ऋषिच्या चरणी नेहमीच लीन
व्हावे.

सातारा येथे
असलेली आण्णांची समाधी माझ्या सारख्या वेड्याला काशी मथुरापेक्षा कमी नाही.

या 'चारभिंतीं'वर विलसे दिव्य समाधी
हा शाहू नगराचा 'राजघाट' हो त्यागी,
ही मूर्ती देवो स्फूर्ति सतत विरागी,
स्वर्गस्थ सुरांची पुष्पवृष्टि दिनरात,
जो अमर जाहला "कर्मवीर" जगतात.
● शिलेदार

कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो.

19/05/2014

श्री. ह. रा.
महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी.
वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे
वर्णन केले आहे.

रयतेमधुनि नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे,वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनभाला पडतो आहे..
15/05/2014

रयतेमधुनि नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे,
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह
नभाला पडतो आहे..

माणूस जन्माने नाहीतर कर्मानेमोठा होतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजेकर्मवीर भाऊराव पाटील.
12/05/2014

माणूस जन्माने नाहीतर कर्माने
मोठा होतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे
कर्मवीर भाऊराव पाटील.

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रयत शिक्षण संस्था,सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share