17/03/2022
The kashmir files पहिल्या नंतर पूर्ण देश काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार बद्दल हळ हळ व्यक्त करत आहेत, एक सत्य जे आज पर्यंत लपवलं गेलं, ह्या बद्दल आपल्या इतिहासात कधी नमूद केलं गेलं नाही ना ह्या बद्दल आज पर्यंत कोणी बोललं. ह्या मागे कारण म्हणजे निव्वळ conspiracy आहे हे प्रत्येक जाणकार ओळखून आहे.conspiracy हि की, शक्य तेवढं एका विशिष्ठ धर्माला target करणं आणि हळू हळू त्याचा नाश करणं, त्यामुळे या धर्मा च्या बाजूने काही बोलणं हे ह्या conspiracy करणाऱ्या लोकांना कधी शक्य च नव्हत.
अनेक लोकं The Kashmir files च्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत किंवा छातीठोक पणे सांगत आहेत आम्ही कशी हि movie बघणार नाही वगैरे.... ह्या लोकांना मला विचारावं असं वाटतं की, काय होतय नक्की तुम्हाला?.. एक मनुष्य म्हणुन दुसऱ्या मनुष्याचे हाल हाल होताना बघून, नरसंहार बघून (नरसंहार/genocide इतकं काही वाईट असू शकत नाही) मनात करुणा यायला हवी पण तुम्हाला काय होतय??.... विशिष्ठ धर्म द्वेष इतका टोकाला गेलाय का की बाकी सगळ्या भावना मेल्या आहेत ??... की आमची जात, आमचा धर्म ह्या अहंकाराने मर्यादा ओलांडल्या आहेत??.. की असुरक्षित वाटतंय की आम्ही आमचं victim card पुढे करू शकणार नाही?.. ही आपली माणुसकी आहे? जी धर्म बघून मग दाखवली जाते, ही आपली एकता आहे?..
सत्य स्वीकारायला हिंमत ही लागते आणि मनाचा मोठेपणा ही, जे तुमच्यात नाही...
आज पर्यंत ज्या ज्या समुदायावर अन्याय झाला आहे त्यांना मदत करणारे , त्यांच्या पाठीशी उभे राहणारे बुद्धिजीवी होते, इतिहासात त्यांच्या बद्दल वर्षानुवर्षे लिहिले गेले आहे.
पण काश्मीर पंडित आणि त्यांच्या वर झालेला इतका अन्याय हे इतके वर्ष कोणी समोर येऊ दिले नाही आणि आज ते निर्भिड पणे मांडले गेले हे च The Kashmir files आणि विवेक अग्निहोत्री च यश आहे.. आणि आमच्या सारखे nationalist त्याला पूर्ण पाठिंबा देणार.