विचार सामान्यांचे-Vichar Samanyache

  • Home
  • India
  • Nagpur
  • विचार सामान्यांचे-Vichar Samanyache

विचार सामान्यांचे-Vichar Samanyache स्वाभिमानी माणसाचे बोलनं थोड कडवट असते पण ते नेहमीच सत्य असते Follow करा मराठी माणसाच्या हक्काचे

02/06/2026

अश्या प्रकारचा न्याय मिळाला तरच कुठे महाराष्ट्रतील गुन्हेगारीला आळा बसेल जरा राजकारण निवडणुका हयांतून आपल्या राज्यकर्त्यानी बाहेर येऊन लोकांच्या समस्या कडे पण जरा लक्ष द्यावं
महाराष्ट्रत सुद्धा न्यायाचा योगी पॅटर्न रबवावा.

विचार सामान्यांचे

* महाराष्ट्र FDA ने राज्यभर धाडी टाकून सुमारे ₹73.24 लाख किमतीची “misbranded” आणि भ्रामक जाहिरातींशी संबंधित औषधे जप्त क...
01/06/2026

* महाराष्ट्र FDA ने राज्यभर धाडी टाकून सुमारे ₹73.24 लाख किमतीची “misbranded” आणि भ्रामक जाहिरातींशी संबंधित औषधे जप्त केली.
* यातील सुमारे ₹51.41 लाख किमतीचा माल दिव्य फार्मसी (पतंजलीशी संबंधित कंपनी) चा असल्याचे सांगितले गेले.
* ही कारवाई Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act अंतर्गत करण्यात आली. काही उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या आरोग्यविषयक दाव्यांची चौकशी करण्यात आली.
* मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली.
* मुंडे यांनी “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सवलत नाही” असा इशाराही दिला आहे.

विचार सामान्यांचे

01/06/2026

चांगल्या मालिका बंद झाल्याने येणाऱ्या पिढीला महापुरुषांचे कार्य कसे समजेल

विचार सामान्यांचे

31/05/2026

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी

खबर नसते म्हणण्या पेक्षा तुम्हाला समजलंच असेल आम्हाला काय बोलायचे चौकीच्या बाजूच्या टपरीवर गुटखा मिळतोय हे प्रत्येक सामा...
30/05/2026

खबर नसते म्हणण्या पेक्षा तुम्हाला समजलंच असेल आम्हाला काय बोलायचे
चौकीच्या बाजूच्या टपरीवर गुटखा मिळतोय हे प्रत्येक सामान्य माणसाला माहिती आहे पण ज्यांना माहिती पाहिजे त्यांना माहिती नाही

विषारी दारू बनवली जातेय हातभट्ट्या चालवल्या जात आहेत,पेपर फुटले जात आहेत,दिवसा ढवळ्या कोयते नाचवले जात आहेत भर रस्त्यात चाकूणे वार करून हत्या होतं आहेत महिला सोडा चिमुकल्या सुद्धा सुरक्षित नाहीत कोणी रस्त्याने चाललं गळ्यातलं चैन ओढून घेऊन जातेय,पुणे प्रकारणतील आरोपी 2 निष्पाप जीवांना उडवून जामीन वर बाहेर येऊन नाचतोय हे सगळं up बिहार नाही आपल्या महाराष्ट्रात घडत आहे

तुम्ही कोणत्याही सामान्य माणसाला विचारा तो सांगेल पोलिसांना एरिया मधले सगळं माहिती असतं सगळं पाकिटं मारा पासून ते अट्टल गुन्हेगार कोण काय करतेय कुठं असतंय मग कारवाई का बरं होतं नसेल आणि जर पोलिसांनाच माहिती नसेल तर मग आपलं गृहखात नक्की काय काम करतंय

विचार सामान्यांचे

30/05/2026

कोणी तरी जबाबदारी घेतली तर पाहिजे सर्रास पणे जर राज्यात भेसळ युक्त अन्न मिळतंय तर दारू मिळणं काही मोठी गोष्ट नाही आज दारू पिणारे मेलेत उद्या चांगली माणसे भेसळ युक्त अन्न खाऊन मरतील किती दिवस पक्ष,राजकारण,फोडाफोडी आणि निवडणुकात व्यस्त राहणार राज्यातील सर्व सामान्य लोकांच्या पण काही समस्या आहेत त्याकडं कधी लक्ष देणार हे राज्यकर्ते

विचार सामान्यांचे

पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले आता पर्यंत एकूण *33 अटक* 27 आस्थापनं सील* 25 FIR* कोट्यवधींचा माल जप्त  कशावर कारवाई झा...
29/05/2026

पदभार स्विकारून फक्त 7 दिवस झाले आता पर्यंत एकूण
*33 अटक
* 27 आस्थापनं सील
* 25 FIR
* कोट्यवधींचा माल जप्त

कशावर कारवाई झाली?

* गुटखा आणि पान मसाला
* भेसळयुक्त दूध आणि तूप
* केमिकलने पिकवलेले आंबे
* अस्वच्छ खाद्य उत्पादन युनिट्स
* बनावट/अवैध औषध उत्पादक
* भ्रामक औषध जाहिराती

ठाणे मध्ये गुटखा, पान मसाला, तेल, तूप, नूडल्स इत्यादींवर कारवाई; 6 जण अटक
* नागपूरमध्ये भेसळयुक्त मसाले, पॅकेज्ड पाणी, पनीर, क्रीम यावर धाडी; सुमारे 6000 किलो माल जप्त

जवळ जवळ सगळ्या महाराष्ट्र भर धाडी पडल्या आहेत मग ह्याच्या अगोदरचे आयुक्त काय करत होते पैसा खाऊन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळात होते लाजा कशा वाटत नसतील हरामखोर अधिकाऱ्यांना किमान लोकांच्या जीवनाशी निगडित गोष्टी वर तरी लक्ष द्या

जे काम त्यांनी केलं नाही ते काम मुंडे साहेबांनी 7 च दिवसात केलं हयाच अर्थ काय भेसळ माफिया सेटिंग लावून मुंडे साहेबांची 26 वी बदली घडवून आणणार आणि आपले लाडके मुख्यमंत्री साहेब ह्यात तरबेज आहेतच

विचार सामान्यांचे

29/05/2026

मराठी होतकरू उद्योजकाला त्याच्या व्यवसायची जाहिरात आपल्या पेज वरून मोफत करून दिली जाईल

किती उपकार करून ठेवलेत मनगुंटीवर साहेबांनी ते वनमंत्री असताना 33 कोटी झाले लावण्याचा त्यानी संकल्प केला नसता तर आज महारा...
28/05/2026

किती उपकार करून ठेवलेत मनगुंटीवर साहेबांनी ते वनमंत्री असताना 33 कोटी झाले लावण्याचा त्यानी संकल्प केला नसता तर आज महाराष्ट्र गरमीन होरपाळून निघाला असता काय केलं असतं आपण अश्या कडक्याच्या गर्मीत पण साहेबांची दूरदृष्टी कामाला आली आणि त्यांनी जागतिक तापमान वाढ लक्षात घेता 7 वर्षा पूर्वीच महाराष्ट्रात 33 कोटी झाडे लावून ठेवलीत म्हणून आज महाराष्ट्रत आज युरोप सारखी थंडी आहे काय तापमान फक्त 25 डिग्री सेलसियस बाकी राज्यात बघा कस कडक ऊन पडलंय ते धन्यवाद साहेब

विचार सामान्यांचे

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विचार सामान्यांचे-Vichar Samanyache posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share