07/07/2026
रबाळे येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्यावतीने घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
घणसोली, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्यात आजही नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर (बीएमसी) दुसऱ्या क्रमांकाची, तसेच महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महानगरपालिका आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस आले असून त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
म्हणून श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हा आदिवासी पाडा येतो. मात्र, येथे आजही वीज नसून नागरिक अंधारात जीवन जगत आहेत आणि सार्वजनिक शौचालय मोडकळीस आलेली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे .म्हणून आज दिनांक 07/07/2026 रोजी घणसोली विभागाचे सहायक आयुक्त यांना खालील मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे पुढील मागण्या आहेत 1) लायटीची व्यवस्था करणे 2)गटार नूतनिकारण करणे 3)परिसरातील कचरा नियमित उचलण्यात यावे 4) धोकादायक झाडांची फांदया छाटणे 5)पाण्याची टाकी नियमित साफ करणे 6) मोकळ्या जागेत ब्लॉक्स टाकणे 7)समाज मंदिर बांधून देणे या सर्व प्रश्नांकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने तत्काळ लक्ष टाकून पूर्ण करण्यात यावे ही नम्र विनंती करण्यात आले.
वरील मागण्या पूर्ण न झाल्यास घणसोली F वॉर्डवर आदिवासी बांधवांना घेऊन वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडणार...असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, गणेश चौधरी, आकाश निमसरकार,महेश महाला, अनिकेत जाधव आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.